शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

शहरात पाईपलाईन लिकेजवर वर्षाला ५० लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:22 IST

सांगली : महापालिका क्षेत्रात मुबलक व शुद्ध पाणीपुरवठ्यावरून नेहमीच ओरड सुरू असते. त्यात पाईपलाईनची गळती व विविध कारणांमुळे जवळपास ...

सांगली : महापालिका क्षेत्रात मुबलक व शुद्ध पाणीपुरवठ्यावरून नेहमीच ओरड सुरू असते. त्यात पाईपलाईनची गळती व विविध कारणांमुळे जवळपास २५ टक्के पाणी वाया जाते. गळती व इतर दुरूस्तीसाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. गेल्या काही वर्षांत शहराचा विस्तार वाढला. नव्याने पाईपलाईन टाकल्या गेल्या. पाण्याच्या टाक्या उभारल्या, पण या साऱ्याची देखभाल दुरुस्ती करणारी यंत्रणा मात्र उभी करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे.

महापालिका क्षेत्रात अमृत पाणी योजनेसह विविध प्रकल्प सुरू आहेत. नव्याने १४ ते १५ पाण्याच्या टाक्या उभारल्या गेल्या. कुपवाडसाठी नवीन पाणी योजनाही अस्तित्वात आली. शहरातील जलवाहिन्याही बदलण्यात आल्या. तरीही अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यात पाण्याच्या गळतीचे प्रमाणही अधिक आहे. गळती काढण्याचे काम करण्यासाठीही अपुरी यंत्रणा आहे.

चौकट

लिकेजमुळे २५ टक्के पाणी वाया

महापालिकेकडून सांगली व मिरज या दोन शहरासाठी दररोज ११५ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा केला जातो. या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी सांगलीत दोन, तर मिरजेत एक जलशुद्धीकरण केंद्रे आहेत. पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यासह शहरातील ठिकठिकाणच्या गळतीद्वारे जवळपास २५ टक्के पाणी वाया जाते. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.

चौकट

कोट

महापालिका क्षेत्राचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे सध्याच्या यंत्रणेवर ताण पडतो. उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारावर लवकरात लवकर लिकेज काढण्याचे काम केले जाते. सध्या मानधनावरील कर्मचाऱ्याकडून कामे करून घेतली जात आहेत. तर मोठ्या पाईलपाईनचे लिकेज काढण्याचे काम खासगी एजन्सीकडे आहे. - आर. जी. रजपूत, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग.

चौकट

शहरातील पाणीपुरवठ्याचे वर्षाचे बजेट : ३६ कोटी ६५ लाख

पाणीपुरवठ्याचे वर्षाचे वीजबिल : १२ कोटी

पाणीपुरवठ्यासंदर्भातील एकूण कर्मचारी : २७५

फोटो ओळी :- २५ शीतल ०१ - शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील दांडेकर मार्गावर गेल्या कित्येक महिन्यापासून जलवाहिनीला गळती लागली होती. व्हाॅल्व्हमधूनच पाणी रस्त्यावर येत होते. आता महापालिकेने खड्डा खोदून दुरुस्ती हाती घेतली आहे.

२५ शीतल ०२- मिरजेतील शास्त्री चौक परिसरात महिन्याभरापासून जलवाहिनीला गळती होती. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर आता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनी दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे.

२५शीतल ०३ - काळी खणजवळील महिन्याभरापासून मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. महापालिकेने जलवाहिनी दुरूस्तीसाठी खड्डा खणला आहे. पण अजून त्याची दुरूस्ती केलेली नाही. त्यामुळे पाणी वाया जात आहे.