शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीमधील जेल फोडण्याच्या क्रांतिकारी घटनेला ७६ वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:00 IST

या घटनेला बुधवारी २४ जुलै रोजी ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिन शौर्यदिन म्हणून साजरा करण्याचे नियोजन पुरोगामी संघटनांच्यावतीने करण्यात आले आहे.

ठळक मुद्देऐतिहासिक स्मृतींना उजाळा : पुरोगामी संघटनांच्यावतीने शौर्य दिनाचे आयोजननव्या पिढीसमोर मांडली जाणार वसंतदादा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांची शौर्यगाथा

सांगली : क्रांतीची मशाल मनात पेटवून ब्रिटिशांविरोधात आंदोलनाचे अग्निकुंड पेटविणाºया सांगलीतील क्रांतिकारकांनी देशात इतिहास घडविला. त्यांनी गाजविलेल्या अनेक शौर्याच्या घटनांनी ब्रिटिश साम्राज्याला हादरवले. यामध्ये वसंतदादा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगलीचा जेल फोडण्याची घटना सर्वाधिक गाजली. या घटनेला बुधवारी २४ जुलै रोजी ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिन शौर्यदिन म्हणून साजरा करण्याचे नियोजन पुरोगामी संघटनांच्यावतीने करण्यात आले आहे.

वसंतदादा पाटील यांनी त्यावेळी क्रांतिकारकांच्या फळीचे नेतृत्व केले होते. ही घटना इतिहासातील सर्वात गाजलेली घटना म्हणून ओळखली जाते. २४ जुलै १९४३ रोजी सांगलीचा जेल फोडून वसंतदादा व त्यांच्या सहकाºयांनी ब्रिटिशांविरोधात आंदोलन तीव्र केले. सांगलीच्या जुन्या किल्ल्यात त्यावेळी उभारण्यात आलेले जेल आजही त्याचठिकाणी या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार म्हणून उभे आहे. सभोवताली भक्कम तटबंदी व त्यापलीकडे खंदक... जागोजागी सशस्त्र पोलिसांचा पहारा... असे त्यावेळचे जेलचे चित्र होते. वसंतदादा पाटील यांना स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले होते व त्यांच्यावर विशेष पाळत होती. दिवसातून दोनवेळा शौचासाठी म्हणून त्यांना बाहेर आणले जात होते. त्यांच्याबरोबर त्यावेळी जेलमध्ये हिंदुराव पाटील, गणपतराव कोळी, जयराम कुष्टे, जिनपाल खोत, सातलिंग शेटे, महादेवराव बुटाले, वसंत सावंत, मारुती आगलावे, अण्णासाहेब पत्रावळे, बाबूराव जाधव, विठ्ठल शिंदे, जयराम बेलवलकर, दत्तात्रय पाटील, नामदेव कराडकर, कृष्णा पेंडसे, बाबूराव पाचोरे, तात्या सोनीकर हे सहकारी होते.

एका चित्रपटातील कथेला शोभेल यापद्धतीने जेल फोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. अण्णासाहेब पत्रावळे आणि बाबूराव जाधव हे त्यावेळी अल्पवयीन होते, त्यामुळे त्यांना तुरुंगात थोडीफार मोकळीक असायची. वसंतदादा पाटील आणि हिंदुराव पाटील यांच्या डोक्यातून बनलेले सांकेतिक भाषेतील संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करत होते. नियोजन ठरले आणि तारीखही ठरविण्यात आली. २४ जुलैरोजी दुपारी अडीच वाजता वसंतदादांना शौचासाठी बाहेर आणल्यानंतर सांकेतिक भाषेत क्रांतिकारकांनी एकमेकांना संदेश दिला आणि त्याठिकाणच्या पोलिसांना मारुन बंदुका घेऊन क्रांतिकारी पळू लागले. तटावरून पाण्याने भरलेल्या खंदकात सर्वप्रथम जिनपाल खोत यांनी उडी मारली. इतर क्रांतिकारकांनीही उड्या मारल्या.

हिंदुराव पाटील तटावर पाय रोवून उभे होते. सर्व क्रांतिकारक तटावरून उतरेपर्यंत एकाही पोलिसाला पुढे येऊ दिले नाही.सगळ्यात शेवटी त्यांनी खंदकात उडी मारली; मात्र दुर्दैवाने त्यांची उडी चुकली व काठावरच्या दगडाचा मार त्यांना लागला. तसेच उठून पळण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले होते. दोन क्रांतिकारक वगळता अन्य सर्वजण पोलिसांना सापडले. यात दोघेजण शहीद झाले. या घटनेला बुधवारी ७६ वर्षे पूर्ण होत आहेत.कार्यकर्त्यांकडून जागर...सांगलीच्या ‘कष्टकºयांची दौलत’ येथे बुधवार, दि. २४ जुलै रोजी दुपारी २ वाजता शौर्यदिन कार्यक्रम होणार आहे. अ‍ॅड. के. डी. शिंदे प्रमुख वक्ते म्हणून, तर प्रा. शरद पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत. भाई व्ही. वाय. आबा पाटील, अ‍ॅड. भाई सुभाष पाटील, प्राचार्य डॉ. अमर पांडे, प्रा. संपतराव गायकवाड, नामदेवराव करगणे, साथी सदाशिव मगदूम, साथी विकास मगदूम, प्रा. आर. एस. चोपडे, चंद्रकांत लोंढे आदी उपस्थित राहणार आहेत.घटनेचे स्मारक व चौकाच्या नामकरणाची प्रतीक्षाक्रांतिकारकांच्या उडीच्या अमृतमहोत्सवानिमित्त गतवर्षी ‘लोकमत’ने या घटनेवर प्रकाशझोत टाकताना या ऐतिहासिक घटनेचे स्मारक तसेच एखाद्या चौकाला ‘२४ जुलै’ असे नाव देण्याच्या सूचनेचा उल्लेख केला होता. शौर्यदिनाच्या कार्यक्रमातून आता पहिले पाऊल सांगलीत टाकण्यात आले असले तरी, स्मारक व चौक नामकरणाचे महत्त्वाचे पाऊल अद्याप पडलेले नाही. सांगलीतील लोकप्रतिनिधी, महापालिका व संघटनांनी त्यासाठी पुढाकार घेऊन नव्या पिढीसाठी हे पाऊल उचलणे गरजेचे आहे.

टॅग्स :Vasantdada Patilवसंतदादा पाटीलSangliसांगली