शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

जतमधील मरिआई कुटुबांवरील बहिष्कार मागे ४० वर्षांनंतर न्याय : अंनिस व भटक्या विमुक्त समाज संघटनेच्या प्रयत्नाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 23:17 IST

जात पंचायतीची परवानगी न घेता लग्न केल्याप्रकरणी ठोठावलेला दंड न भरल्यामुळे जत येथील मारुती मुकिंदा कोळी (वय ७०) यांच्या कुटुंबावर जात पंचायतीने गेल्या ४० वर्षांपासून टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात आला.

सांगली : जात पंचायतीची परवानगी न घेता लग्न केल्याप्रकरणी ठोठावलेला दंड न भरल्यामुळे जत येथील मारुती मुकिंदा कोळी (वय ७०) यांच्या कुटुंबावर जात पंचायतीने गेल्या ४० वर्षांपासून टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात आला. याप्रकरणी कोळी कुटुंबाने अंधश्रद्धा निर्मूलन समिती व भटक्या विमुक्त हक्क परिषदेची मदत घेऊन जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांच्याकडे धाव घेतली होती. पोलिसांनी जातपंचायतीला सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचा बडगा दाखविला होता.

मारुती कोळी (रा. जत) यांना त्यांच्या मरिआई (कडकलक्ष्मी) समाजाने तब्बल ४० वर्षे बहिष्कृत केले होते.अंनिस व भटक्या समाज संघटनेच्या प्रयत्नांमुळे जत पोलिसांनी जातपंचांना बोलावून घेतले. त्यांना सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचा बडगा दाखवला. तेव्हा पंचांनी नरमाईची भूमिका घेऊन मारुती यांना समाजात सामावून घेण्याचा निर्णय घेतला. पंचांच्याहस्ते पान-सुपारी देऊन मारुती कोळी यांच्या कुटुंबास मरिआई समाजात ४० वर्षांनी घेतले. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते.

मारुती कोळी जतमधील स्टिल कॉलनीत बुद्धवा व नागव्वा या दोन पत्नींसह मुलगी शीतल, सोनल, मुले राहुल, बालाप्पा, भीमाण्णा यांच्यासह राहतात. मरिआईचा (कडकलक्ष्मी) गाडा घेऊन गावोगावी देवीचा महिमा सांगून अंगावर आसूडाचे फटके मारुन धान्य व पैसे गोळा करतात. लग्नापूर्वी त्यांची पहिली पत्नी बुद्धवा यांच्या वडिलांना रिवाजाप्रमाणे पाच हजारांची दक्षिणा दिली होती; पण जात पंचायतीस काही दिले नाही; तसेच लग्न करण्याची परवानगीही घेतली नव्हती. त्यामुळे पंचायतीने त्यांना एक लाखाचा दंड केला. हा दंड त्यांनी भरलाही, पण पंचायतीने आणखी दोन लाखाच्या दंडाची मागणी केली. कोळी यांनी पैसे नसल्याचे सांगताच, पंचायतीने त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. तो ४० वर्षे कायम होता.

कोळी यांनी या अन्यायाविरोधात अंधश्रध्दा निर्मूलन समिती व भटक्या विमुक्त हक्क परिषदेशी संपर्क साधला. अंनिसने त्यांना घेऊन जिल्हा पोलीसप्रमुखांकडे तक्रार दिली. त्यांनी जत पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. बुधवारी जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजू तासीलदार यांनी जात पंचायतीच्या पंचांना बोलावून घेतले. त्यांना सामाजिक बहिष्कार कायद्याची माहिती दिली.या कायद्याचा बडगा दाखविताच पंचांनीही नरमाईची भूमिका घेत बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला. कोळी यांचा पंचांच्याहस्ते पानसुपारी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांचा ४० वर्षांचा वनवास गुरुवारी संपला. भटक्या विमुक्त हक्क परिषदेचे विकास मोरे, गणेश निकम, नितीन मोरे, अतुल कांबळे, दयानंद मोरे, हवालदार विजय वीर, अंनिसचे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, कार्यवाह राहुल थोरात यांच्या प्रयत्नांना अखेर यश येऊन कुटुंबाला न्याय मिळाला.जात पंचायत नरमलीसामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीस, कोणत्याही कारणाने स्वजातीतून बहिष्कृत करता येत नाही. पोलिसांनी जात पंचायतीच्या पंचांना या कायद्याचा बडगा दाखविताच त्यांनी नरमाईची भूमिका घेऊन मारूती कोळी यांच्या कुटुंबावरील बहिष्कार उठवला. दोन्ही मुलींची लग्ने समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे पार पाडू, कोळी यांच्या कुटुंबास समाजाच्या सर्व धार्मिक कार्यक्रमात योग्य तो मान देऊ, असेही पंचांनी लेखी दिले.