शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

जतमधील मरिआई कुटुबांवरील बहिष्कार मागे ४० वर्षांनंतर न्याय : अंनिस व भटक्या विमुक्त समाज संघटनेच्या प्रयत्नाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 23:17 IST

जात पंचायतीची परवानगी न घेता लग्न केल्याप्रकरणी ठोठावलेला दंड न भरल्यामुळे जत येथील मारुती मुकिंदा कोळी (वय ७०) यांच्या कुटुंबावर जात पंचायतीने गेल्या ४० वर्षांपासून टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात आला.

सांगली : जात पंचायतीची परवानगी न घेता लग्न केल्याप्रकरणी ठोठावलेला दंड न भरल्यामुळे जत येथील मारुती मुकिंदा कोळी (वय ७०) यांच्या कुटुंबावर जात पंचायतीने गेल्या ४० वर्षांपासून टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात आला. याप्रकरणी कोळी कुटुंबाने अंधश्रद्धा निर्मूलन समिती व भटक्या विमुक्त हक्क परिषदेची मदत घेऊन जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांच्याकडे धाव घेतली होती. पोलिसांनी जातपंचायतीला सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचा बडगा दाखविला होता.

मारुती कोळी (रा. जत) यांना त्यांच्या मरिआई (कडकलक्ष्मी) समाजाने तब्बल ४० वर्षे बहिष्कृत केले होते.अंनिस व भटक्या समाज संघटनेच्या प्रयत्नांमुळे जत पोलिसांनी जातपंचांना बोलावून घेतले. त्यांना सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचा बडगा दाखवला. तेव्हा पंचांनी नरमाईची भूमिका घेऊन मारुती यांना समाजात सामावून घेण्याचा निर्णय घेतला. पंचांच्याहस्ते पान-सुपारी देऊन मारुती कोळी यांच्या कुटुंबास मरिआई समाजात ४० वर्षांनी घेतले. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते.

मारुती कोळी जतमधील स्टिल कॉलनीत बुद्धवा व नागव्वा या दोन पत्नींसह मुलगी शीतल, सोनल, मुले राहुल, बालाप्पा, भीमाण्णा यांच्यासह राहतात. मरिआईचा (कडकलक्ष्मी) गाडा घेऊन गावोगावी देवीचा महिमा सांगून अंगावर आसूडाचे फटके मारुन धान्य व पैसे गोळा करतात. लग्नापूर्वी त्यांची पहिली पत्नी बुद्धवा यांच्या वडिलांना रिवाजाप्रमाणे पाच हजारांची दक्षिणा दिली होती; पण जात पंचायतीस काही दिले नाही; तसेच लग्न करण्याची परवानगीही घेतली नव्हती. त्यामुळे पंचायतीने त्यांना एक लाखाचा दंड केला. हा दंड त्यांनी भरलाही, पण पंचायतीने आणखी दोन लाखाच्या दंडाची मागणी केली. कोळी यांनी पैसे नसल्याचे सांगताच, पंचायतीने त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. तो ४० वर्षे कायम होता.

कोळी यांनी या अन्यायाविरोधात अंधश्रध्दा निर्मूलन समिती व भटक्या विमुक्त हक्क परिषदेशी संपर्क साधला. अंनिसने त्यांना घेऊन जिल्हा पोलीसप्रमुखांकडे तक्रार दिली. त्यांनी जत पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. बुधवारी जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजू तासीलदार यांनी जात पंचायतीच्या पंचांना बोलावून घेतले. त्यांना सामाजिक बहिष्कार कायद्याची माहिती दिली.या कायद्याचा बडगा दाखविताच पंचांनीही नरमाईची भूमिका घेत बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला. कोळी यांचा पंचांच्याहस्ते पानसुपारी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांचा ४० वर्षांचा वनवास गुरुवारी संपला. भटक्या विमुक्त हक्क परिषदेचे विकास मोरे, गणेश निकम, नितीन मोरे, अतुल कांबळे, दयानंद मोरे, हवालदार विजय वीर, अंनिसचे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, कार्यवाह राहुल थोरात यांच्या प्रयत्नांना अखेर यश येऊन कुटुंबाला न्याय मिळाला.जात पंचायत नरमलीसामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीस, कोणत्याही कारणाने स्वजातीतून बहिष्कृत करता येत नाही. पोलिसांनी जात पंचायतीच्या पंचांना या कायद्याचा बडगा दाखविताच त्यांनी नरमाईची भूमिका घेऊन मारूती कोळी यांच्या कुटुंबावरील बहिष्कार उठवला. दोन्ही मुलींची लग्ने समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे पार पाडू, कोळी यांच्या कुटुंबास समाजाच्या सर्व धार्मिक कार्यक्रमात योग्य तो मान देऊ, असेही पंचांनी लेखी दिले.