शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

सांगलीतील ४० टक्के जलवाहिन्या जीर्ण, यंत्रणेत बदलाची गरज 

By अविनाश कोळी | Updated: July 17, 2024 23:54 IST

वारणा योजनेत नव्या पाईपलाईनचा समावेश

सांगली : शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेत अद्याप ४० टक्के जलवाहिन्या या पन्नास वर्षापूर्वीच्या आहे. त्या जीर्ण झाल्या असून त्या बदलल्यास पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम होऊ शकते. सातत्याने होत असलेले पाणी गळतीचे प्रकार रोखण्यासाठी जलवाहिन्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची आवश्यकता आहे.

गावठाणात बहुतांशी जुन्या लाईन आहेत. काहीठिकाणी १९७०च्या तर काहीठिकाणी १९५०च्या जलवाहिन्या आहेत. जुन्या जलवाहिन्यांमुळे वारंवार पाणीगळतीच्या समस्येचा सामना महापालिकेला करावा लागतो. दुरुस्तीच्या कामासाठी पुन्हा शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याची वेळ येते. या सर्व दुष्टचक्रातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेला ही यंत्रणा बदलण्याची गरज आहे. सांगलीतील माळबंगला येथील ५६ एमएलडीचा जुना प्रकल्पही कालबाह्य झाल्याने तोही बदलावा लागेल. यातून शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ शकत नाही.

९०० किलोमीटरचे अंतरसांगली, कुपवाड शहरातील जलवाहिन्या एकूण ९०० किलोमीटर अंतरात विस्तारल्या आहेत. त्यातील ४०० ते ४५० किलोमीटर अंतराच्या पाईपलाईन्स या पन्नास वर्षापूर्वीच्या जुन्या आहेत. त्या बदलण्याची आवश्यकता आहे.

वारणा योजनेत समावेशवारणा उद्भव योजनेचा २९० कोटीचा प्रस्ताव सध्या शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या योजनेतच जुन्या पाईपलाईन बदलणे, नव्या १५ टाक्या बांधणे तसेच अन्य कामांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेच्या मंजुरीची महापालिकेला प्रतीक्षा आहे.

...तर पाणीपुरवठा यंत्रणा सक्षमजुन्या जलवाहिन्या बदलण्यात आल्यास पाणीपुरवठा यंत्रणेचे सक्षमीकरण होणार आहे. पाणी गळतीचे प्रकार अत्यल्प होतील. विस्तारीत भागात आता चांगल्या जलवाहिन्या बसविण्यात आल्यामुळे गळतीचे प्रकार त्याठिकाणी दिसत नाहीत.

गावठाणातच अधिक समस्यासांगलीच्या गावभाग, खणभाग, फौजदार गल्ली, स्टँड परिसर, राजवाडा अशा गावठाणातच जुन्या जलवाहिन्या अधिक आहेत. त्यामुळे त्यांच्या गळतीनंतर पाण्याच्या समस्येला याच भागाला अनेकदा सामोरे जावे लागते. नव्या योजनेनंतर गावठाणातील समस्या दूर होऊ शकते.

टॅग्स :Sangliसांगली