शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सांगली जिल्ह्यातील शेतकºयांना ३६ कोटींचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:49 IST

सांगली : रेंगाळलेली कर्जमाफीची प्रक्रिया आता गतिमान झाली असून, सोमवारी नियमित कर्ज फेडणाºया २१ हजार ८५ शेतकºयांसाठी ३६ कोटी ३८ लाखांचे प्रोत्साहन अनुदान प्राप्त झाले आहे. दीड लाखापर्यंतचे आणि दीड लाखावरील शेतकºयांनाही कर्जमाफीची रक्कम मंजूर झाली असून, जिल्ह्यातील ४० हजार शेतकºयांना १०६ कोटी २५ लाख ४३ हजार रुपयांचा लाभ या ...

ठळक मुद्देखात्यावर १२ कोटी वर्ग : सर्व गटातील ४० हजार शेतकºयांना लाभसांगली जिल्ह्यात कर्जमाफीसाठी १ लाख ८६ हजार कुटुंबांचे अर्ज दाखल झाले

सांगली : रेंगाळलेली कर्जमाफीची प्रक्रिया आता गतिमान झाली असून, सोमवारी नियमित कर्ज फेडणाºया २१ हजार ८५ शेतकºयांसाठी ३६ कोटी ३८ लाखांचे प्रोत्साहन अनुदान प्राप्त झाले आहे. दीड लाखापर्यंतचे आणि दीड लाखावरील शेतकºयांनाही कर्जमाफीची रक्कम मंजूर झाली असून, जिल्ह्यातील ४० हजार शेतकºयांना १०६ कोटी २५ लाख ४३ हजार रुपयांचा लाभ या योजनेअंतर्गत होणार आहे.

सांगली जिल्ह्यात कर्जमाफीसाठी १ लाख ८६ हजार कुटुंबांचे अर्ज दाखल झाले होते. यातील १ लाख ७१ हजार कर्जदारांची माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा बँकेला, तर ५१ हजार कर्जदारांची माहिती देण्याचे आदेश अन्य बँकांना दिले होते. छाननीमध्ये यातील अनेकजण एकाच कुटुंबातील असल्यामुळे ही संख्या कमी झाली. जिल्ह्यातील ७६३ सोसायट्यांची माहिती अपलोड करून ती शासनाच्या आयटी विभागाला पाठविली होती. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा १ हजार शेतकºयांचे अर्ज सोसायट्यांमधील माहितीशी पडताळणी करण्यासाठी प्राप्त झाले होते. आठवड्यात फेरपडताळणी करून ती शासनाकडे पाठविली होती.

फेरपडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीच्या रेंगाळलेल्या प्रक्रियेला आता गती प्राप्त झाली आहे. योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४० हजार शेतकºयांना १०६ कोटी २५ लाख ४३ हजार ५७४ रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. यात दीड लाखांपर्यंत कर्ज असणाºया १९ हजार शेतकºयांचा सात-बारा कोरा झाला असून, त्यांना एकूण ७० कोटी १४ लाख १८ हजार ९६४ रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. नियमित कर्ज भरणाºया २१ हजार ८५ शेतकºयांना ३६ लाख ३८ हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान प्राप्त झाले आहे. यासंदर्भातील यादी शुक्रवारी संकेतस्थळावर जाहीर झाली होती.

सोमवारी जिल्हा बॅँकेला याबाबतची माहिती आणि आकडेवारी प्राप्त झाली. दीड लाखांच्या आतील शेतकºयांची मंजूर झालेली रक्कम जिल्हा बॅँकेने शनिवारी संबंधित सोसायट्यांच्या खात्यांवर वर्ग केल्याने सोसायटी स्तरावरही आता या प्रक्रियेस गती प्राप्त झाली आहे. बहुतांश शेतकºयांचा सात-बारा कोरा झाल्याचे सांगितले. शेतकºयांच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी फेरपडताळणी करण्यात आली होती. त्याबाबतची मंजुरी सोमवारी जिल्हा बॅँकेला प्राप्त झाल्याने आता हा प्रश्नही निकालात निघाला आहे.जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांनी सांगितले की, आजवर शेतकºयांच्या खात्यावर १२ कोटीच्या रकमा वर्ग झाल्या असून, प्रक्रिया गतीने सुरू आहे.

टॅग्स :Governmentसरकारagricultureशेती