शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

वाहतुकीदरम्यान ३०० क्विंटल सोयाबीन बियाणे भिजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST

कृषी विभाग व महाबीजकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाणे उपलब्ध होणार होते. बियाणे इंदूर ते सांगली वाहतुकीदरम्यान पावसात ...

कृषी विभाग व महाबीजकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाणे उपलब्ध होणार होते. बियाणे इंदूर ते सांगली वाहतुकीदरम्यान पावसात भिजल्याने उपलब्ध झाले नाही, असे कृषी विभाग व महाबीजच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यास मिळणारे ३०० क्विंटल सोयाबीन बियाणे वाहतुकीदरम्यान संपूर्ण कसे भिजले, वाहतुकीदरम्यान योग्य उपाययोजना का केली नाही, याची चौकशी होणे गरजेचे आहे. या बियाणांची परस्पर विक्री किंवा काळाबाजार करून शेतकरी व शासनाची फसवणूक होत आहे का? याचीही चाैकशी करावी. सध्या सोयाबीनला चांगला भाव असल्याने लागवडीसाठी सोयाबीन बियाणांची मागणी वाढली आहे. महाबीजचे ३० किलो बियाणे २००० ते २२०० रुपयांना मिळतात. खासगी कंपनीच्या तीस किलो बियाणांची किंमत ३००० ते ३५०० रुपये आहे. त्यामुळे संबंधित पुरवठादाराने काळ्याबाजारात बियाणे विक्री केल्याची शक्यता आहे. या गंभीर प्रकारामुळे शेतकऱ्यांचे लागवडीचे नियोजन कोलमडून एकरी हजार ते बाराशे रुपये अधिकचा खर्च करावा लागणार आहे. या घटनेची सखोल चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रोहित चिवटे, रविकांत साळुंखे, शहराध्यक्ष रमेश मेंढे, अनिल हारगे, शंकर इसापुरे, महावीर किनिंगे, महावीर कर्वे, किशोर चंदुरे, अनुप पेटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.