शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

२५ जणांना गॅस्ट्रोसदृश लागण

By admin | Updated: November 9, 2014 23:41 IST

मिरजेतील घटना : भारतनगरला दूषित पाण्याचा फटका

मिरज : मिरजेतील भारतनगर परिसरात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण झाल्याने सुमारे २५ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या जलवाहिनीत सांडपाणी मिसळून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने उलट्या व जुलाबाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भारतनगर, हडको कॉलनी, ईदगाहनगर, उस्मानिया मोहल्ला परिसरात गेले चार दिवस नळाद्वारे दूषित पाणी येत आहे. या परिसरात ड्रेनेजसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. खोदकाम करताना जलवाहिन्यांना मोठ्याप्रमाणात गळती लागली आहे. मात्र जलवाहिन्यांची दुरूस्ती न करताच ड्रेनेज वाहिन्यांचे काम आटोपण्यात आल्याने, मोठ्याप्रमाणात सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. परिसरातील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले असून त्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दूषित पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार स्थानिक नागरिक इलियास शेख यांनी केली. गेले चार दिवस उलट्या व जुलाबाची लक्षणे असलेल्या सुमारे २५ रूग्णांवर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आठ ते दहाजणांना शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रूग्णांमध्ये बालके, महिला व वृध्दांचा समावेश आहे. दूषित पाण्यामुळे उलट्या व जुलाबाच्या तक्रारी असलेल्या रूग्णांवर दररोज उपचार सुरू असल्याचे स्थानिक डॉक्टर इम्तियाज मुल्ला यांनी सांगितले. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना, महापालिका प्रशासनाने व आरोग्य विभागाने याबाबत दखल घेतली नसल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. (वार्ताहर)अनेकांना उलट्या व जुलाबशहरातील गुरुवार पेठ, सरवर मोहल्ला, पीर नालसाब चौक परिसरातही दूषित पाण्यामुळे उलट्या व जुलाबाची अनेकांना लागण झाली आहे. येथील रूग्णांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दूषित पाणी पुरवठ्याची आरोग्य व पाणीपुरवठा विभागाने दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.