शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

२५ जणांना गॅस्ट्रोसदृश लागण

By admin | Updated: November 9, 2014 23:41 IST

मिरजेतील घटना : भारतनगरला दूषित पाण्याचा फटका

मिरज : मिरजेतील भारतनगर परिसरात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण झाल्याने सुमारे २५ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या जलवाहिनीत सांडपाणी मिसळून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने उलट्या व जुलाबाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भारतनगर, हडको कॉलनी, ईदगाहनगर, उस्मानिया मोहल्ला परिसरात गेले चार दिवस नळाद्वारे दूषित पाणी येत आहे. या परिसरात ड्रेनेजसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. खोदकाम करताना जलवाहिन्यांना मोठ्याप्रमाणात गळती लागली आहे. मात्र जलवाहिन्यांची दुरूस्ती न करताच ड्रेनेज वाहिन्यांचे काम आटोपण्यात आल्याने, मोठ्याप्रमाणात सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. परिसरातील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले असून त्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दूषित पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार स्थानिक नागरिक इलियास शेख यांनी केली. गेले चार दिवस उलट्या व जुलाबाची लक्षणे असलेल्या सुमारे २५ रूग्णांवर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आठ ते दहाजणांना शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रूग्णांमध्ये बालके, महिला व वृध्दांचा समावेश आहे. दूषित पाण्यामुळे उलट्या व जुलाबाच्या तक्रारी असलेल्या रूग्णांवर दररोज उपचार सुरू असल्याचे स्थानिक डॉक्टर इम्तियाज मुल्ला यांनी सांगितले. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना, महापालिका प्रशासनाने व आरोग्य विभागाने याबाबत दखल घेतली नसल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. (वार्ताहर)अनेकांना उलट्या व जुलाबशहरातील गुरुवार पेठ, सरवर मोहल्ला, पीर नालसाब चौक परिसरातही दूषित पाण्यामुळे उलट्या व जुलाबाची अनेकांना लागण झाली आहे. येथील रूग्णांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दूषित पाणी पुरवठ्याची आरोग्य व पाणीपुरवठा विभागाने दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.