शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

ढवळेश्वरात जंतनाशक गोळ्या खाल्ल्याने २५ बालकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कविटा : जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित मोफत जंतनाशक औषध वाटप मोहिमेचा भाळवणी (ता. खानापूर) गावात प्रारंभ होत असतानाच, तेथून पाच किलोमीटरवरील ढवळेश्वर येथे अंगणवाडीतील बालकांनी वाटप केलेल्या जंतनाशक गोळ्या खाल्ल्यानंतर, चक्कर, उलट्या, पोट दुखणे, असे त्रास सुरू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली.ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. त्यामुळे २५ ...

लोकमत न्यूज नेटवर्कविटा : जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित मोफत जंतनाशक औषध वाटप मोहिमेचा भाळवणी (ता. खानापूर) गावात प्रारंभ होत असतानाच, तेथून पाच किलोमीटरवरील ढवळेश्वर येथे अंगणवाडीतील बालकांनी वाटप केलेल्या जंतनाशक गोळ्या खाल्ल्यानंतर, चक्कर, उलट्या, पोट दुखणे, असे त्रास सुरू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली.ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. त्यामुळे २५ बालकांना विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यातील आठ बालकांना पुढील उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा प्रचंड हादरली असून, जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम तातडीने थांबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.जिल्हा परिषदेने राष्टÑीय जंतनाशक दिनानिमित्त दि. १८ व २३ आॅगस्ट या दोन दिवशी १ ते १९ वयोगटातील मुलांना शाळेत जाऊन मोफत जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवार, दि. १८ रोजी सकाळी भाळवणी येथील उर्दू शाळेत या मोहिमेचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी-पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. भाळवणी येथे हा कार्यक्रम सुरू असतानाच ढवळेश्वर येथील तीन अंगणवाड्यांतील मुलांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. त्या गोळ्या खाल्ल्यानंतर मुलांना पाच ते दहा मिनिटातच चक्कर येणे, उलट्या होणे, डोळ्यावर झापड येणे, अंग थरथरणे असे प्रकार सुरू झाले. काही लहान मुले जमिनीवर कोसळली. त्यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविकांची तारांबळ उडाली. या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ पालकांना दिल्यानंतर पालकांनी मिळेल त्या वाहनाने मुलांना विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश लोखंडे यांच्यासह शहरातील खासगी डॉक्टरांचे पथक तातडीने रुग्णालयात दाखल झाले. मुलांवर उपचार सुरू झाल्यानंतर नातेवाईकांची मोठी गर्दी झाली. आ. अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित राऊत, गोपीचंद पडळकर, संग्रामसिंह देशमुख, सुहास बाबर, तम्मणगौडा रवी-पाटील, ब्रह्मानंद पडळकर, नगराध्यक्षा सौ. प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, अमोल बाबर, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार सौ. रंजना उबरहंडे, सुहास पाटील, सौ. कविता घाडगे यांनी रुग्णालयात येऊन बालकांची विचारपूस केली.या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम थांबविण्यात आली आहे.आठ जणांना सांगलीला हलविलेसंग्राम सुभाष किर्दत, विश्वजित सुभाष पवार, विराज धनाजी किर्दत, गायत्री रमेश किर्दत, ऋतुराज भरत गुजले, अथर्व सुभाष थोरात, स्वरा किरण मंडले, नेहा रूपेश किर्दत या आठ बालकांना सांगलीच्या शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले आहे.