शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

ढवळेश्वरात जंतनाशक गोळ्या खाल्ल्याने २५ बालकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कविटा : जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित मोफत जंतनाशक औषध वाटप मोहिमेचा भाळवणी (ता. खानापूर) गावात प्रारंभ होत असतानाच, तेथून पाच किलोमीटरवरील ढवळेश्वर येथे अंगणवाडीतील बालकांनी वाटप केलेल्या जंतनाशक गोळ्या खाल्ल्यानंतर, चक्कर, उलट्या, पोट दुखणे, असे त्रास सुरू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली.ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. त्यामुळे २५ ...

लोकमत न्यूज नेटवर्कविटा : जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित मोफत जंतनाशक औषध वाटप मोहिमेचा भाळवणी (ता. खानापूर) गावात प्रारंभ होत असतानाच, तेथून पाच किलोमीटरवरील ढवळेश्वर येथे अंगणवाडीतील बालकांनी वाटप केलेल्या जंतनाशक गोळ्या खाल्ल्यानंतर, चक्कर, उलट्या, पोट दुखणे, असे त्रास सुरू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली.ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. त्यामुळे २५ बालकांना विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यातील आठ बालकांना पुढील उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा प्रचंड हादरली असून, जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम तातडीने थांबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.जिल्हा परिषदेने राष्टÑीय जंतनाशक दिनानिमित्त दि. १८ व २३ आॅगस्ट या दोन दिवशी १ ते १९ वयोगटातील मुलांना शाळेत जाऊन मोफत जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवार, दि. १८ रोजी सकाळी भाळवणी येथील उर्दू शाळेत या मोहिमेचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी-पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. भाळवणी येथे हा कार्यक्रम सुरू असतानाच ढवळेश्वर येथील तीन अंगणवाड्यांतील मुलांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. त्या गोळ्या खाल्ल्यानंतर मुलांना पाच ते दहा मिनिटातच चक्कर येणे, उलट्या होणे, डोळ्यावर झापड येणे, अंग थरथरणे असे प्रकार सुरू झाले. काही लहान मुले जमिनीवर कोसळली. त्यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविकांची तारांबळ उडाली. या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ पालकांना दिल्यानंतर पालकांनी मिळेल त्या वाहनाने मुलांना विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश लोखंडे यांच्यासह शहरातील खासगी डॉक्टरांचे पथक तातडीने रुग्णालयात दाखल झाले. मुलांवर उपचार सुरू झाल्यानंतर नातेवाईकांची मोठी गर्दी झाली. आ. अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित राऊत, गोपीचंद पडळकर, संग्रामसिंह देशमुख, सुहास बाबर, तम्मणगौडा रवी-पाटील, ब्रह्मानंद पडळकर, नगराध्यक्षा सौ. प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, अमोल बाबर, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार सौ. रंजना उबरहंडे, सुहास पाटील, सौ. कविता घाडगे यांनी रुग्णालयात येऊन बालकांची विचारपूस केली.या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम थांबविण्यात आली आहे.आठ जणांना सांगलीला हलविलेसंग्राम सुभाष किर्दत, विश्वजित सुभाष पवार, विराज धनाजी किर्दत, गायत्री रमेश किर्दत, ऋतुराज भरत गुजले, अथर्व सुभाष थोरात, स्वरा किरण मंडले, नेहा रूपेश किर्दत या आठ बालकांना सांगलीच्या शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले आहे.