शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

आॅक्टोबर महिन्यात २२६ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात जून ते सप्टेंबरअखेर ४४९.७ मिलिमीटर, तर दि. १ ते १६ आॅक्टोबर या कालावधित ११२.३ मिलिमीटर पाऊस झाला असून, आॅक्टोबरच्या पावसाची टक्केवारी २२६ आहे. आॅक्टोबर महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची मागील दहा वर्षांतील ही पहिलीच घटना आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यातही समाधानकारक पाऊस ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात जून ते सप्टेंबरअखेर ४४९.७ मिलिमीटर, तर दि. १ ते १६ आॅक्टोबर या कालावधित ११२.३ मिलिमीटर पाऊस झाला असून, आॅक्टोबरच्या पावसाची टक्केवारी २२६ आहे. आॅक्टोबर महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची मागील दहा वर्षांतील ही पहिलीच घटना आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यातही समाधानकारक पाऊस झाल्यामुळे यंदा शेतकºयांची खºयाअर्थाने दिवाळी आनंदाची होत आहे.मान्सूनपूर्व पाऊस आणि मान्सूनचा सुरुवातीचा पाऊस फारसा समाधानकारक नसल्यामुळे शेतकºयांसह जिल्हा प्रशासनही चिंतेत होते. जुलै, आॅगस्ट महिन्यात दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु होते. चाºयाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकºयांनी पशुधनासह वाळवा, पलूस तालुक्याकडे स्थलांतर केले होते. दि. १५ आॅगस्टनंतर मात्र जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. सप्टेंबरअखेरपर्यंत चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकºयांची चिंता काही प्रमाणात मिटली होती. साधारणत: शासकीय दफ्तरी तर सप्टेंबरला पाऊस थांबतोच, असे चित्र आहे. पण यावर्षी शासकीय दफ्तरी पाऊस थांबला असला तरी, आॅक्टोबर महिन्यात झालेल्या विक्रमी पावसाने शेतकरी समाधानी आहे. आॅक्टोबर महिन्यात सरासरी ४९.७ मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता असताना, यावर्षी दि. १ ते १६ आॅक्टोबर या पंधरा दिवसांच्या कालावधित ११२.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाची टक्केवारी २२६ आहे. मिरज तालुक्यात सर्वाधिक २९६.७ टक्के, तर जत तालुक्यात २७३.५ टक्के पाऊस झाला आहे. आटपाडी, पलूस आणि शिराळा तालुक्यातच १०० ते १८३ टक्के पाऊस झाला असून उर्वरित तालुक्यात २०० टक्केहून जास्त पावसाची पाटबंधारे विभागाकडे नोंद झाली आहे.दुष्काळग्रस्तांना दिलासा : नदीकाठी नाराजीनेहमी आॅक्टोबर महिन्यात उष्णता असते. पण यावेळी याच महिन्यात सलग पंधरा दिवस पाऊस सुरु असल्यामुळे वातावरणात गारवा आहे. दुष्काळी तालुक्यातील तलावही तुडुंब भरले असून, सर्व परिसर हिरवागार झाला आहे. नदीकाठच्या भागातील सोयाबीन, भात, भुईमूग शेंगा काढणीचा हंगाम सुरू आहे. याच कालावधित सलग पंधरा दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे पिके कुजण्याच्या मार्गावर आहेत.