शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
2
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
3
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
4
"माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
5
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
6
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
7
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
8
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
9
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
10
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
11
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
12
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
13
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
15
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
16
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
17
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
18
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
19
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
20
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्टोबर महिन्यात २२६ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात जून ते सप्टेंबरअखेर ४४९.७ मिलिमीटर, तर दि. १ ते १६ आॅक्टोबर या कालावधित ११२.३ मिलिमीटर पाऊस झाला असून, आॅक्टोबरच्या पावसाची टक्केवारी २२६ आहे. आॅक्टोबर महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची मागील दहा वर्षांतील ही पहिलीच घटना आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यातही समाधानकारक पाऊस ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात जून ते सप्टेंबरअखेर ४४९.७ मिलिमीटर, तर दि. १ ते १६ आॅक्टोबर या कालावधित ११२.३ मिलिमीटर पाऊस झाला असून, आॅक्टोबरच्या पावसाची टक्केवारी २२६ आहे. आॅक्टोबर महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची मागील दहा वर्षांतील ही पहिलीच घटना आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यातही समाधानकारक पाऊस झाल्यामुळे यंदा शेतकºयांची खºयाअर्थाने दिवाळी आनंदाची होत आहे.मान्सूनपूर्व पाऊस आणि मान्सूनचा सुरुवातीचा पाऊस फारसा समाधानकारक नसल्यामुळे शेतकºयांसह जिल्हा प्रशासनही चिंतेत होते. जुलै, आॅगस्ट महिन्यात दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु होते. चाºयाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकºयांनी पशुधनासह वाळवा, पलूस तालुक्याकडे स्थलांतर केले होते. दि. १५ आॅगस्टनंतर मात्र जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. सप्टेंबरअखेरपर्यंत चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकºयांची चिंता काही प्रमाणात मिटली होती. साधारणत: शासकीय दफ्तरी तर सप्टेंबरला पाऊस थांबतोच, असे चित्र आहे. पण यावर्षी शासकीय दफ्तरी पाऊस थांबला असला तरी, आॅक्टोबर महिन्यात झालेल्या विक्रमी पावसाने शेतकरी समाधानी आहे. आॅक्टोबर महिन्यात सरासरी ४९.७ मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता असताना, यावर्षी दि. १ ते १६ आॅक्टोबर या पंधरा दिवसांच्या कालावधित ११२.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाची टक्केवारी २२६ आहे. मिरज तालुक्यात सर्वाधिक २९६.७ टक्के, तर जत तालुक्यात २७३.५ टक्के पाऊस झाला आहे. आटपाडी, पलूस आणि शिराळा तालुक्यातच १०० ते १८३ टक्के पाऊस झाला असून उर्वरित तालुक्यात २०० टक्केहून जास्त पावसाची पाटबंधारे विभागाकडे नोंद झाली आहे.दुष्काळग्रस्तांना दिलासा : नदीकाठी नाराजीनेहमी आॅक्टोबर महिन्यात उष्णता असते. पण यावेळी याच महिन्यात सलग पंधरा दिवस पाऊस सुरु असल्यामुळे वातावरणात गारवा आहे. दुष्काळी तालुक्यातील तलावही तुडुंब भरले असून, सर्व परिसर हिरवागार झाला आहे. नदीकाठच्या भागातील सोयाबीन, भात, भुईमूग शेंगा काढणीचा हंगाम सुरू आहे. याच कालावधित सलग पंधरा दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे पिके कुजण्याच्या मार्गावर आहेत.