शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्टोबर महिन्यात २२६ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात जून ते सप्टेंबरअखेर ४४९.७ मिलिमीटर, तर दि. १ ते १६ आॅक्टोबर या कालावधित ११२.३ मिलिमीटर पाऊस झाला असून, आॅक्टोबरच्या पावसाची टक्केवारी २२६ आहे. आॅक्टोबर महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची मागील दहा वर्षांतील ही पहिलीच घटना आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यातही समाधानकारक पाऊस ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात जून ते सप्टेंबरअखेर ४४९.७ मिलिमीटर, तर दि. १ ते १६ आॅक्टोबर या कालावधित ११२.३ मिलिमीटर पाऊस झाला असून, आॅक्टोबरच्या पावसाची टक्केवारी २२६ आहे. आॅक्टोबर महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची मागील दहा वर्षांतील ही पहिलीच घटना आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यातही समाधानकारक पाऊस झाल्यामुळे यंदा शेतकºयांची खºयाअर्थाने दिवाळी आनंदाची होत आहे.मान्सूनपूर्व पाऊस आणि मान्सूनचा सुरुवातीचा पाऊस फारसा समाधानकारक नसल्यामुळे शेतकºयांसह जिल्हा प्रशासनही चिंतेत होते. जुलै, आॅगस्ट महिन्यात दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु होते. चाºयाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकºयांनी पशुधनासह वाळवा, पलूस तालुक्याकडे स्थलांतर केले होते. दि. १५ आॅगस्टनंतर मात्र जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. सप्टेंबरअखेरपर्यंत चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकºयांची चिंता काही प्रमाणात मिटली होती. साधारणत: शासकीय दफ्तरी तर सप्टेंबरला पाऊस थांबतोच, असे चित्र आहे. पण यावर्षी शासकीय दफ्तरी पाऊस थांबला असला तरी, आॅक्टोबर महिन्यात झालेल्या विक्रमी पावसाने शेतकरी समाधानी आहे. आॅक्टोबर महिन्यात सरासरी ४९.७ मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता असताना, यावर्षी दि. १ ते १६ आॅक्टोबर या पंधरा दिवसांच्या कालावधित ११२.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाची टक्केवारी २२६ आहे. मिरज तालुक्यात सर्वाधिक २९६.७ टक्के, तर जत तालुक्यात २७३.५ टक्के पाऊस झाला आहे. आटपाडी, पलूस आणि शिराळा तालुक्यातच १०० ते १८३ टक्के पाऊस झाला असून उर्वरित तालुक्यात २०० टक्केहून जास्त पावसाची पाटबंधारे विभागाकडे नोंद झाली आहे.दुष्काळग्रस्तांना दिलासा : नदीकाठी नाराजीनेहमी आॅक्टोबर महिन्यात उष्णता असते. पण यावेळी याच महिन्यात सलग पंधरा दिवस पाऊस सुरु असल्यामुळे वातावरणात गारवा आहे. दुष्काळी तालुक्यातील तलावही तुडुंब भरले असून, सर्व परिसर हिरवागार झाला आहे. नदीकाठच्या भागातील सोयाबीन, भात, भुईमूग शेंगा काढणीचा हंगाम सुरू आहे. याच कालावधित सलग पंधरा दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे पिके कुजण्याच्या मार्गावर आहेत.