शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील २२0७ विद्यार्थी संख्या घटली-शिक्षकांची शंभर पदे होणार रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:07 IST

सांगली : मागील दीड वर्षापासून प्रलंबित असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची संचमान्यता अखेर पूर्ण झाली. जानेवारी २०१८ अखेर विद्यार्थी संख्येनुसार संचमान्यता करण्यात आली

ठळक मुद्देशिक्षण उपसंचालकांकडून संचमान्यता निश्चित, अतिरिक्त शिक्षकांची रिक्त जागी वर्णी लागणार

सांगली : मागील दीड वर्षापासून प्रलंबित असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची संचमान्यता अखेर पूर्ण झाली. जानेवारी २०१८ अखेर विद्यार्थी संख्येनुसार संचमान्यता करण्यात आली असून, दोन हजार २०७ विद्यार्थी संख्या घटल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जवळपास शंभर शिक्षकांची पदे कमी होणार आहेत.

जिल्हा परिषदेतील विद्यार्थी संख्येनुसार दरवर्षी सप्टेंबरअखेर पट निश्चिती केली जाते. चालू शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये निश्चिती झाली नव्हती. त्यानुसार संचमान्यताही रखडली होती. गेल्या तीन महिन्यांपासून संचनिश्चिती करण्याचे काम सुरू होते. अखेर जानेवारी २०१८ च्या पटसंख्येच्या विद्यार्थी संख्येनुसार संचमान्यता देण्यात आली. सप्टेंबर २०१६ मध्ये करण्यात आलेल्या पटसंख्येत एक लाख २६ हजार विद्यार्थी संख्या होती, ती एक लाख २३ हजार ७९३ आहे. दीड वर्षात दोन हजार २०७ विद्यार्थी संख्या घटल्याचे स्पष्ट झाले.

विद्यार्थी संख्या घटत चालल्यामुळे सुमारे शंभर शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. या शिक्षकांना रिक्त पदांवर नियुक्त्या दिल्या जाणार आहेत.

शिक्षक, मुख्याध्यापकांची सहा हजार ४३१ पदे असून, पाच हजार ८०६ कार्यरत आहेत. संचमान्यतेनुसार ५२५ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामध्ये उपशिक्षकांची पाच हजार २४ पदे मंजूर आहेत. सध्या चार हजार ६४५ पदे कार्यरत आहेत. पदवधीर शिक्षक एक हजार ४९ असून, ९३१ कार्यरत, तर मुख्याध्यापकांची ३५८ पदे मंजूर असली तरी, २२० कार्यरत आहेत. संचमान्यता निश्चित झाल्याने शिक्षक समायोजन प्रक्रिया होणार आहे. मात्र ही समायोजन प्रकिया शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला करावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नये, असे यापूर्वीचे आदेश आहेत. त्यामुळे समायोजन प्रक्रिया तात्काळ पूर्ण होणार का? याबाबत शिक्षकांत उत्सुकता असणार आहे.खासगी शाळांचा झेडपीच्या शाळांना फटकाखासगी अनुदानित शाळा १८०, विनाअनुदानित शाळा २२, कायम विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळा ८६ आणि स्वयंअर्थसहाय्यता शाळा १२४ अशा २३१ शाळांची संख्या झाली आहे. खासगी शाळांची संख्या वाढत चालल्याचा सर्वाधिक फटका जिल्हा परिषद शाळांना बसत असून, वर्षाला शंभर शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. भविष्यात या शिक्षकांच्या नोकऱ्याही टिकणे कठीण होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.