शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

जिल्हा बँकेसाठी २२०७ मतदार पात्र

By admin | Updated: March 26, 2015 00:01 IST

अंतिम यादी जाहीर : मिरज, वाळव्याचे वर्चस्व; वैयक्तिक गट रद्द

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज, बुधवारी अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली. या निवडणुकीसाठी २२०७ मतदार पात्र ठरले असून एकूण मतदारसंख्येत ५० मतदारांची नव्याने भर पडली आहे. वाळवा व मिरज या दोन्ही तालुक्यात पन्नास टक्के मतदार असल्याने त्यांचेच वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले. येत्या दहा दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून मतदान मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल, असे संकेत आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदारयादीत २१५६ मतदार होते. या यादीवर काही संस्थांनी आक्षेप घेत ठराव सादर केले होते. नव्याने ठराव सादर करण्यास दोन मार्चची मुदत होती. या कालावधित ५० संस्थांनी ठराव दिले. आज जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव यांनी अंतिम मतदारयादी जाहीर केली. त्यात २२०७ मतदार पात्र ठरले आहेत. बँकेच्या निवडणुकीसाठी वैयक्तिक गट यावेळी रद्द करण्यात आला आहे. या गटातील सभासदांचा समावेश क (३) मध्ये करण्यात आला आहे. मतदारांची संख्या अशी : आटपाडी १५०, कवठेमहांकाळ १५४, खानापूर १२७, जत १६६, तासगाव १७९, मिरज ४१८, वाळवा ४९५, शिराळा १९८, पलूस १७७, कडेगाव १४३. मिरज व वाळवा या दोन तालुक्यात मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत या दोन्ही तालुक्यांचेच वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. या दोन्ही तालुक्यात मदन पाटील व आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. या दोन तालुक्यात उमेदवारीवरून मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)