शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

जिल्हा बँकेसाठी २२०७ मतदार पात्र

By admin | Updated: March 26, 2015 00:01 IST

अंतिम यादी जाहीर : मिरज, वाळव्याचे वर्चस्व; वैयक्तिक गट रद्द

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज, बुधवारी अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली. या निवडणुकीसाठी २२०७ मतदार पात्र ठरले असून एकूण मतदारसंख्येत ५० मतदारांची नव्याने भर पडली आहे. वाळवा व मिरज या दोन्ही तालुक्यात पन्नास टक्के मतदार असल्याने त्यांचेच वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले. येत्या दहा दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून मतदान मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल, असे संकेत आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदारयादीत २१५६ मतदार होते. या यादीवर काही संस्थांनी आक्षेप घेत ठराव सादर केले होते. नव्याने ठराव सादर करण्यास दोन मार्चची मुदत होती. या कालावधित ५० संस्थांनी ठराव दिले. आज जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव यांनी अंतिम मतदारयादी जाहीर केली. त्यात २२०७ मतदार पात्र ठरले आहेत. बँकेच्या निवडणुकीसाठी वैयक्तिक गट यावेळी रद्द करण्यात आला आहे. या गटातील सभासदांचा समावेश क (३) मध्ये करण्यात आला आहे. मतदारांची संख्या अशी : आटपाडी १५०, कवठेमहांकाळ १५४, खानापूर १२७, जत १६६, तासगाव १७९, मिरज ४१८, वाळवा ४९५, शिराळा १९८, पलूस १७७, कडेगाव १४३. मिरज व वाळवा या दोन तालुक्यात मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत या दोन्ही तालुक्यांचेच वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. या दोन्ही तालुक्यात मदन पाटील व आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. या दोन तालुक्यात उमेदवारीवरून मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)