शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

पिकल्या पानाचा दर की हो भलता!, खाऊच्या पिवळ्या पानांना सोन्याचा भाव

By श्रीनिवास नागे | Updated: March 22, 2023 15:29 IST

उन्हाळ्यात फक्त कळीच्या पानांनाच मागणी

सांगली : उन्हाळ्याची धग वाढत असताना पानबाजारात मात्र पिवळ्या खाऊच्या पानांना सोन्याचा भाव मिळत आहे. पान व्यवसायातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते.मिरज तालुक्यात पानमळ्याचे २५० हेक्टर क्षेत्र आहे. या व्यवसायावर लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून आहे. पान उत्पादक शेतकरी, खुडेकरी, वेल बांधणारे वेलके, पान वखारदार, वाहतूकदार, पान टपरीवाले अशा क्षेत्रांचा मागोवा घेतला तर यामध्ये अनेक बेरोजगारांच्या हातांना काम मिळाले आहे. पान व्यवसाय जरी नाशवंत मालाची विक्री करणारा असला तरी दररोज यातून लाखो रुपयांची उलाढाल होते. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, रत्नागिरी, मालवण, फोंडा, चिपळूण, खेड, सांगोला, पंढरपूर आदी प्रमुख पान बाजारपेठेतून पानांची विक्री होते.सध्या पानबाजारात ३०० पिवळ्या पानांच्या एका कवळीची किंमत २०० ते २५० रुपये आहे. हा दर पिवळ्या मोठवड पानांनाच मिळत आहे. एका केळीने लपेटलेल्या पान डप्प्यात (गठ्ठ्यात) तीन हजार पाने विशिष्ट पद्धतीने लावून बाजारात विक्रीसाठी आणली जातात. पानांमध्ये फाफडा व कळी असे दोन प्रकार पडतात. उन्हाळ्यात फक्त कळीच्या पानांनाच मागणी असते.फापड्याच्या पानांना जूनपासून पुढे मागणी येते; कारण याचवेळी फापडा खुडण्यास येतो. पानमळ्यास उन्हाळ्यात पाणी जास्त लागते. मळ्यात नेहमी गारवा असावा लागतो; तरच पाने मोठवड व पिवळी फुटतात. सध्या १० कवळीच्या ३००० पानांच्या एका डप्प्याची किंमत दोन हजार ते अडीच हजार रुपये आहे. हा दर असाच टिकून राहिल्यास पान उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगली