शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

महापुरामुळे सांगलीत ४००० कोटींचे नुकसान; ९०% बाजारपेठ बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 05:10 IST

नेहमीच गर्दीने फुलणारी सांगलीची गणपतीपेठ महापुराच्या पाण्यात पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे.

सांगली : अभूतपूर्व अशा महापुरात जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रांचे सुमारे ४,००० कोटींचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकच नव्हेतर, सर्वसामान्य माणूनही उद्ध्वस्त झाला आहे.नेहमीच गर्दीने फुलणारी सांगलीची गणपतीपेठ महापुराच्या पाण्यात पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे. दुकानातील चिखल, पाण्याने भिजलेला माल काढण्यामध्येच व्यापारी व्यग्र आहेत. काही छोट्या दुकानदारांनी व्यवहार सुरू केले असले तरी नव्वद टक्के बाजारपेठ बंदच आहे. केवळ धान्य व्यापाऱ्यांचेच अंदाजे २५० कोटींवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे.गणपती पेठेत धान्याचे मोठे व्यापारी असून, त्यांची गोदामेही तेथेच आहेत. शिवाय मसाले, कॉस्मेटिक व इतर साहित्याची दोनशेहून अधिक दुकाने आहेत. पुरामध्ये सर्वांत मोठे नुकसान गणपती पेठेचे झाले आहे. मिठापासून धान्यापर्यंत सारे काही पुराच्या पाण्यात भिजले आहे. धान्य कुजण्यास सुरुवात झाली आहे. कडधान्यांना कोंब फुटले आहेत. मसाल्याच्या पदार्थांचेही मोठे नुकसान झाले आहे. पेठेतील व्यापारी दुकाने आणि गोदामांमधील घाणीची स्वच्छता करण्यातच व्यग्र होते. किरकोळ दुकानदारांनी स्वच्छता करून व्यवहार सुरू केले आहेत. पण, त्यांचे प्रमाण केवळ १० टक्केच होते. सोमवारपासून येथील व्यवहार सुरळीत होतील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.धान्य व्यापारी व चेंबर आॅफ कॉमर्सचे संचालक अण्णासाहेब चौधरी म्हणाले, गणपती पेठेतील धान्य व्यापाºयांचेच जवळपास २५० कोटींचे नुकसान झाले आहे. हजारो क्विंटल गहू, ज्वारी, तांदूळ, कडधान्य भिजले आहे. उर्वरित व्यापाºयांच्या नुकसानीचा आकडा हजार कोटीपर्यंत जाईल. सर्वेक्षणानंतरच नुकसानीचे खरे आकडे समोर येणार आहेत. कृष्णा, वारणा नद्यांच्या महापुरामुळे वाळवा, पलूस, मिरज, शिराळा तालुक्यातील ६९०० एकरावरील भाजीपाला १५ दिवस पाण्यात राहिल्याने पूर्णत: सडला आहे. यात उत्पादकांचे सुमारे ७० कोटींचे नुकसान झाले.

३५०० कोटींचा फटका : संजय पाटीलमहापुरामुळे विविध क्षेत्रांतील नुकसान अंदाजे साडेतीन हजार कोटींच्या घरात आहे. ते पूर्ण भरून निघणार नसले तरी, पूरग्रस्तांना दिलासादायक मदत देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करून तातडीने निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी दिली.रस्त्यांचे मोठे नुकसानमहापुराने सांगली जिल्ह्यात वीज, पाणीपुरवठा, संपर्क यंत्रणांसह रस्त्यांचीही मोठी हानी झाली. सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या रस्त्यांचे एकूण सुमारे २५0 कोटी रुपयांचे नुकसान झाले.महावितरणची ४७ कोटींची हानीमहापुराचा महापालिकेसह जिल्ह्यातील १०४ गावांना फटका बसला. चार तालुक्यांतील १६ उपकेंद्रांसह चार हजारांहून अधिक रोहित्रे, मीटर पाण्यात बुडाल्यामुळे बंद पडली होती. महावितरणचे ४७ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूर