शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

महापुरामुळे सांगलीत ४००० कोटींचे नुकसान; ९०% बाजारपेठ बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 05:10 IST

नेहमीच गर्दीने फुलणारी सांगलीची गणपतीपेठ महापुराच्या पाण्यात पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे.

सांगली : अभूतपूर्व अशा महापुरात जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रांचे सुमारे ४,००० कोटींचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकच नव्हेतर, सर्वसामान्य माणूनही उद्ध्वस्त झाला आहे.नेहमीच गर्दीने फुलणारी सांगलीची गणपतीपेठ महापुराच्या पाण्यात पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे. दुकानातील चिखल, पाण्याने भिजलेला माल काढण्यामध्येच व्यापारी व्यग्र आहेत. काही छोट्या दुकानदारांनी व्यवहार सुरू केले असले तरी नव्वद टक्के बाजारपेठ बंदच आहे. केवळ धान्य व्यापाऱ्यांचेच अंदाजे २५० कोटींवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे.गणपती पेठेत धान्याचे मोठे व्यापारी असून, त्यांची गोदामेही तेथेच आहेत. शिवाय मसाले, कॉस्मेटिक व इतर साहित्याची दोनशेहून अधिक दुकाने आहेत. पुरामध्ये सर्वांत मोठे नुकसान गणपती पेठेचे झाले आहे. मिठापासून धान्यापर्यंत सारे काही पुराच्या पाण्यात भिजले आहे. धान्य कुजण्यास सुरुवात झाली आहे. कडधान्यांना कोंब फुटले आहेत. मसाल्याच्या पदार्थांचेही मोठे नुकसान झाले आहे. पेठेतील व्यापारी दुकाने आणि गोदामांमधील घाणीची स्वच्छता करण्यातच व्यग्र होते. किरकोळ दुकानदारांनी स्वच्छता करून व्यवहार सुरू केले आहेत. पण, त्यांचे प्रमाण केवळ १० टक्केच होते. सोमवारपासून येथील व्यवहार सुरळीत होतील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.धान्य व्यापारी व चेंबर आॅफ कॉमर्सचे संचालक अण्णासाहेब चौधरी म्हणाले, गणपती पेठेतील धान्य व्यापाºयांचेच जवळपास २५० कोटींचे नुकसान झाले आहे. हजारो क्विंटल गहू, ज्वारी, तांदूळ, कडधान्य भिजले आहे. उर्वरित व्यापाºयांच्या नुकसानीचा आकडा हजार कोटीपर्यंत जाईल. सर्वेक्षणानंतरच नुकसानीचे खरे आकडे समोर येणार आहेत. कृष्णा, वारणा नद्यांच्या महापुरामुळे वाळवा, पलूस, मिरज, शिराळा तालुक्यातील ६९०० एकरावरील भाजीपाला १५ दिवस पाण्यात राहिल्याने पूर्णत: सडला आहे. यात उत्पादकांचे सुमारे ७० कोटींचे नुकसान झाले.

३५०० कोटींचा फटका : संजय पाटीलमहापुरामुळे विविध क्षेत्रांतील नुकसान अंदाजे साडेतीन हजार कोटींच्या घरात आहे. ते पूर्ण भरून निघणार नसले तरी, पूरग्रस्तांना दिलासादायक मदत देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करून तातडीने निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी दिली.रस्त्यांचे मोठे नुकसानमहापुराने सांगली जिल्ह्यात वीज, पाणीपुरवठा, संपर्क यंत्रणांसह रस्त्यांचीही मोठी हानी झाली. सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या रस्त्यांचे एकूण सुमारे २५0 कोटी रुपयांचे नुकसान झाले.महावितरणची ४७ कोटींची हानीमहापुराचा महापालिकेसह जिल्ह्यातील १०४ गावांना फटका बसला. चार तालुक्यांतील १६ उपकेंद्रांसह चार हजारांहून अधिक रोहित्रे, मीटर पाण्यात बुडाल्यामुळे बंद पडली होती. महावितरणचे ४७ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूर