शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

टेंभू योजनेचे ३५ कोटी वीजबिल थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 11:59 IST

टेंभू योजनेची सध्या ३५ कोटी रुपये वीजबिल थकबाकी आहे. टंचाई काळात टंचाई उपाययोजना निधीमधून दिलेल्या आवर्तनाची १५ कोटी, तर साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या उसबिलातून कपात करून घेतलेली ५ कोटी ५० लाख रुपये पाणीपट्टी येणेबाकी आहे.

ठळक मुद्देटेंभू योजनेचे ३५ कोटी वीजबिल थकीत टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करण्याची गरज

प्रताप महाडिक कडेगाव : टेंभू योजनेची सध्या ३५ कोटी रुपये वीजबिल थकबाकी आहे. टंचाई काळात टंचाई उपाययोजना निधीमधून दिलेल्या आवर्तनाची १५ कोटी, तर साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या उसबिलातून कपात करून घेतलेली ५ कोटी ५० लाख रुपये पाणीपट्टी येणेबाकी आहे.वीजबिलाच्या ८१:१९ फॉर्म्युल्याप्रमाणे ८१ टक्के वीजबिलाची रक्कम राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून मिळते. त्यामुळे उर्वरित १५ कोटी रुपये वीजबिल भरण्याची व्यवस्था होईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.या महिन्यात टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करण्याची गरज भासणार आहे.

सध्या अस्तरीकरण आणि बंद पाईपलाइनची कामे वेगात सुरू आहेत. आवर्तन सुरू केले तर, ही कामे बंद ठेवावी लागतील. यामुळे थोडा उशीर झाला तरी चालेल, पण आवर्तन अखंडित देण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने ठेकेदारांना कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.टेंभू योजनेच्या आवर्तनातून कडेगाव, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी व सांगोला तालुक्यातील जवळपास ४० हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांना पाणी मिळणार आहे. यावर्षी भरपूर पाऊस झाला आहे. अजूनही विहिरी आणि तलावांमध्ये पुरेसे पाणी आहे. परंतु केवळ टेंभू योजनेवर अवलंबून असलेल्या शेतीपिकांना लवकरच आवर्तनाचे पाणी द्यावे लागणार आहे. यामुळे संबंधित शेतकरी आवर्तन कधी सुरू होणार, याबाबत अधिकाºयांकडे विचारणा करीत आहेत. परंतु संबंधित शेतकºयांनी पाणी मागणी अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Tembhu Projectटेंभू धरणSangliसांगली