शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
4
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
5
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
6
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
7
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
8
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
9
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
10
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
11
पुतीन परतले, पुढे...?
12
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
13
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
15
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
16
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
17
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
18
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
19
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
20
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

टेंभू योजनेचे ३५ कोटी वीजबिल थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 11:59 IST

टेंभू योजनेची सध्या ३५ कोटी रुपये वीजबिल थकबाकी आहे. टंचाई काळात टंचाई उपाययोजना निधीमधून दिलेल्या आवर्तनाची १५ कोटी, तर साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या उसबिलातून कपात करून घेतलेली ५ कोटी ५० लाख रुपये पाणीपट्टी येणेबाकी आहे.

ठळक मुद्देटेंभू योजनेचे ३५ कोटी वीजबिल थकीत टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करण्याची गरज

प्रताप महाडिक कडेगाव : टेंभू योजनेची सध्या ३५ कोटी रुपये वीजबिल थकबाकी आहे. टंचाई काळात टंचाई उपाययोजना निधीमधून दिलेल्या आवर्तनाची १५ कोटी, तर साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या उसबिलातून कपात करून घेतलेली ५ कोटी ५० लाख रुपये पाणीपट्टी येणेबाकी आहे.वीजबिलाच्या ८१:१९ फॉर्म्युल्याप्रमाणे ८१ टक्के वीजबिलाची रक्कम राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून मिळते. त्यामुळे उर्वरित १५ कोटी रुपये वीजबिल भरण्याची व्यवस्था होईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.या महिन्यात टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करण्याची गरज भासणार आहे.

सध्या अस्तरीकरण आणि बंद पाईपलाइनची कामे वेगात सुरू आहेत. आवर्तन सुरू केले तर, ही कामे बंद ठेवावी लागतील. यामुळे थोडा उशीर झाला तरी चालेल, पण आवर्तन अखंडित देण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने ठेकेदारांना कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.टेंभू योजनेच्या आवर्तनातून कडेगाव, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी व सांगोला तालुक्यातील जवळपास ४० हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांना पाणी मिळणार आहे. यावर्षी भरपूर पाऊस झाला आहे. अजूनही विहिरी आणि तलावांमध्ये पुरेसे पाणी आहे. परंतु केवळ टेंभू योजनेवर अवलंबून असलेल्या शेतीपिकांना लवकरच आवर्तनाचे पाणी द्यावे लागणार आहे. यामुळे संबंधित शेतकरी आवर्तन कधी सुरू होणार, याबाबत अधिकाºयांकडे विचारणा करीत आहेत. परंतु संबंधित शेतकºयांनी पाणी मागणी अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Tembhu Projectटेंभू धरणSangliसांगली