शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेसाठी पहिले बक्षीस ५० लाख रुपये, जिल्ह्यात ९४ गावांचा सहभाग

By संतोष भिसे | Updated: April 16, 2023 17:00 IST

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने ही माहिती दिली.

सांगली : अटल भूजल योजनेंतर्गत लोकसहभागातून भूजल व्यवस्थापनासाठी भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा आयोजित केली आहे. जिल्ह्यातील ६४ गावे स्पर्धेत सहभागी झाली आहेत. विजेत्या पहिल्या क्रमांकाच्या गावाला ५० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने ही माहिती दिली. पुण्याच्या वनराई संस्थेमार्फत या गावांत भूजल समृद्धीसाठी प्रबोधन केले जात आहे. जिल्हा व राज्यस्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना प्रोत्साहन निधी, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. सन २०२२-२३ व २०२३-२४ या दोन वर्षांसाठी स्पर्धा आहे. भूजल उपसा नियंत्रित करुन भूजल स्तर उंचावण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून केला जाईल. अतिशोषित, शोषित आणि अंशत: शोषित वर्गवारीतील गावांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. नगदी पिकांसाठी बेसुमार उपशामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. विंधन विहिरीद्वारे उपशामुळे भूजलाच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. त्यावर नियंत्रणासाठी जिल्ह्यातील ९४ गावांत अटल भूजल योजना राबवण्यात येत आहे.

२५ एप्रिलपर्यंत मुदत

अटल भूजल योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व गावांनी स्पर्धेत सहभागासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या ठरावाच्या प्रतींसह जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्याकडे २५ एप्रिलपर्यंत प्रस्ताव द्यायचे आहेत.

राज्यस्तरावर एक कोटींचे बक्षीस

दोन्ही वर्षांसाठी स्वतंत्र पारितोषिके आहेत. जिल्हास्तरावर विजेत्या गावाला ५० लाखांचे बक्षीस आहे. या गावाला पुढे राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेता येईल. जिल्हास्तरावर द्वितीय बक्षीस ३० लाख व तृतीय बक्षीस २० लाख रुपये आहे. राज्यस्तरावरील विजेत्यासाठी पहिले बक्षीस तब्बल एक कोटी रुपये आहे.

 

टॅग्स :Sangliसांगली