शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

‘तासगाव’मधील १९ ग्रामपंचायतीत सत्तांतर

By admin | Updated: November 4, 2015 00:08 IST

३६ ग्रामपंचायतींचा निकाल : राष्ट्रवादीच्या तोडीस तोड भाजपचे यश, कार्यकर्त्यांचा जल्लोष

तासगाव : तासगाव तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींचा मंगळवारी निकाल लागला. मतदारांनी १९ ग्रामपंचायतींत विद्यमान कारभाऱ्यांना हादरा देत सत्तांतर घडवून आणले. गतवेळच्या तुलनेत या निवडणुकीत राष्ट्रवादीची काही प्रमाणात पिछेहाट झाली, मात्र गड शाबूत ठेवण्यात यश मिळाले. भाजपला अपेक्षित यशाने हुलकावणी दिली असली तरी, राष्ट्रवादीच्या तोडीसतोड वर्चस्व मिळण्यात यश मिळवले. दोन्ही पक्षांना संमिश्र यश मिळाले. निकालानंतर विजयी कार्यकर्त्यांनी गुलालाच्या उधळणीत जल्लोष साजरा केला.तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींचा निकाल भाजप आणि राष्ट्रवादीला संमिश्र यश देणारा ठरला. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पश्चात होत असलेल्या या निवडणुकीला यावेळी विशेष महत्त्व आले होते. तालुक्यात होत असलेल्या राजकीय उलथापालथींमुळे ग्रामपंचायतीत सत्तेचा पट कोणाचा असणार? याची उत्सुकता लागून राहिली होती. तालुक्यावर वर्चस्व कोणाचे? याचा फैसला या निकालाने होणार असल्यामुळे राष्ट्रवादीकडून आमदार सुमनताई पाटील आणि भाजपकडून खासदार संजयकाका पाटील यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले होते.मंगळवारी सकाळी आठ वाजता तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्याच फेरीत ११ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. पहिल्या निकालापासून गुलालाची उधळण आणि घोषणांनी तहसीलदार कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. निकाल जाहीर होतील, तसे विजयी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते जल्लोष करत गावाकडे रवाना होत होते. चार फेरीत मतमोजणी झाली. तालुक्यातील ३६ पैकी तब्बल १९ गावांतील मतदारांनी विद्यमान कारभाऱ्यांना झिडकारल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. शिरगाव (वि.), हातनोली, गोटेवाडी, धोंडेवाडी, नरसेवाडी, डोर्ली, येळावी, राजापूर, वाघापूर आणि वडगाव दहा ग्रामपंचायतींची सत्ता आबा गटाकडून काका गटाकडे गेली, तर निंबळक, बोरगाव, पेड, धामणी, लोकरेवाडी, धुळगाव या सहा ग्रामपंचायतींची सत्ता काका गटाकडून आबा गटाकडे आली. तालुकास्तरावरील आणि नेत्यांच्या राजकारणापेक्षा स्थानिक समीकरणांचाच या निवडणुकीत पगडा राहिला. त्यामुळे दोन्ही गटांना त्याचा फटका बसला. येळावीत बाजार समितीचे माजी सभापती अनिल पाटील यांना जबरदस्त हादरा बसला. त्यांच्या पॅनेलला एकही जागा मिळवता आली नाही. काँग्रेसने अटीतटीची झुंज दिली. मात्र काका गटाने वर्चस्व मिळवले. विसापुरातील निवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. राष्ट्रवादी पॅनेलविरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील यांनी काका गटाशी हातमिळवणी करून पॅनेल उभा केले होते. मात्र सूतगिरणीचे उपाध्यक्ष पतंगबापू माने आणि अर्जुन पाटील यांनी जोराची झुंज देत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला शाबूत ठेवला. मांजर्डे ग्रामपंचायतीची निवडणूक दिनकरदादा पाटील यांच्याविरोधात भाजप असेच चित्र रंगले होते. या ठिकाणी राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी झाले असले तरी, बालेकिल्ला कायम राखण्यात यश मिळाले. पेडमध्ये भाजपचे आमदार सुरेश खाडे यांचे बंधू दत्तूअण्णा खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता काबीज करण्यात राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य प्रभाकर पाटील यांना यश मिळाले. सावळजमध्ये राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर उनउने आणि वसंत सावंत यांनी भाजपशी हातमिळवणी करून ताकद एकवटली. तेथे सत्ता परिवर्तन करून चंद्रकांत पाटील यांना हादरा दिला.निवडणूक निकालानंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या समर्थक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर चांगलाच गुलाल उधळला होता. कोणाच्या गटाच्या किती ग्रामपंचायती, कोणाचे किती सदस्य यावरून सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच श्रेयवाद सोशल मीडियावर सुरू होता. विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा आनंदही सोशल मीडियाच्या माध्यमातून ओसंडून वाहत होता. (वार्ताहर)तीन उमेदवारांना समान मते, धामणीत निर्णायक सत्तांतर धुळगाव, डोर्ली, सिध्देवाडी आणि धामणीतील प्रत्येकी एका जागेसाठी समान मते मिळाल्यामुळे लहान मुलाच्या हातून चिठ्ठी काढण्याचा निर्णय झाला. धुळगावमध्ये उज्वला सुरेश सुतार आणि नगिना रमजान मुलाणी यांना २६३ मते मिळाली. उज्वला सुतार यांना विजयी घोषित केले. डोर्लीत दशरथ विठ्ठल जाधव आणि रामगौंडा मलगौंडा पाटील यांना प्रत्येकी १२१ मते मिळाली. चिठ्ठीतून रामगौंडा पाटील यांना विजयी घोषित केले, तर धामणीत भाजप आणि राष्ट्रवादीला समान तीन जागा मिळाल्या होत्या. अन्य एका जागेसाठी सिंधुताई भारत शिंदे आणि रमाबाई भरत सपकाळ यांना प्रत्येकी १२० मते मिळाली. चिठ्ठीतून रमाबाई सपकाळ यांना विजयी घोषित करण्यात आले. सिध्देवाडीत आप्पासाहेब देवाप्पा चव्हाण आणि किशोर माणिक चव्हाण यांना प्रत्येकी २८३ मते मिळाली. चिठ्ठीतून आप्पासाहेब चव्हाण यांना विजयी घोषित केले.येळावी, मांजर्डे येथेलागली उत्कंठा पणाला येळावी आणि मांजर्डे या दोन मोठ्या गावांच्या मतमोजणीस शेवटी सुरुवात झाली. दोन्ही गावांच्या पहिल्या दोन फेऱ्यानंतर येळावीत भाजप आणि काँग्रेसला, तर मांजर्डेत राष्ट्रवादी आणि भाजपला समसमान प्रत्येकी सहा-सहा जागांवर विजय मिळाला. शेवटच्या फेरीतील जागांच्या निकालावरच सत्तेचे समीकरण अवलंबून असल्याने सर्वच गटाच्या कार्यकर्त्यांची उत्कंठा पणाला लागली होती. येळावीत शेवटच्या फेरीत भाजपने बाजी मारून वर्चस्व मिळवले, तर मांजर्डेत राष्ट्रवादीने बाजी मारून वर्चस्व मिळवले.सात ग्रामपंचायतींत एकहाती सत्ता मिळविल्या... तालुक्यातील यमगरवाडी, गव्हाण येथे राष्ट्रवादीने, तर जरंडी, वडगाव, आळते, हातनोली, वाघापूर येथे भाजपने एकतर्फी विजय मिळवला. कौलगे, डोंगरसोनी, सिध्देवाडी, बोरगाव, पेड येथे राष्ट्रवादीने, तर गोटेवाडी, गौरगाव, नरसेवाडी, ढवळी या ग्रामपंचायतींत भाजपने काटावर सत्ता मिळाली.धक्का : आजी-माजी पदाधिकाऱ्यांना३६ गावांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काही गावांत नेतृत्व केले होते; मात्र या पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवता आले नसल्याने हादरा बसला आहे. त्यामध्ये पंचायत समितीचे सदस्य चंद्रकांत पाटील, माजी पंचायत समिती सभापती संजय पाटील, बाजार समितीचे संचालक अजित जाधव, विवेक शेंडगे, बाजार समितीचे माजी सभापती अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील पाटील, पंचायत समितीचे सदस्य जयवंत माळी यांचा समावेश आहे.