शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

महापालिका इमारती, रस्त्यांचे १८५ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सर्वाधिक फटका सांगली शहराला बसला आहे. ६० टक्के शहर पाण्याखाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सर्वाधिक फटका सांगली शहराला बसला आहे. ६० टक्के शहर पाण्याखाली होते. या महापुरामुळे महापालिकेच्या इमारती, रस्त्यांचे १८५ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. २०१९च्या महापुरातही महापालिकेचे २०८ कोटींचे नुकसान झाले होते.

गेल्या दोन वर्षात सांगलीकर सातत्याने संकटांशी सामना करत आहेत. ऑगस्ट २०१९मध्ये आलेल्या प्रलयंकारी महापुराने नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२०पासून कोरोनाशी लढा सुरू आहे. गेले वर्षभर महापालिकेची यंत्रणा कोरोनाशी संघर्ष करत असताना यंदा महापुराने संकटात नवी भर टाकली. त्यात महापालिकेची आर्थिक घडी आधीच विस्कटलेली आहे. दरवर्षी ७५० कोटींचा अर्थसंकल्प केला जात असला तरी प्रत्यक्षात महापालिकेचे उत्पन्न २५० कोटींच्या घरातच आहे. खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ घालताना प्रशासनाला कसरत करावी लागते. त्यात यंदाच्या महापुराने महापालिकेला मोठा झटका दिला आहे.

कृष्णेच्या महापुराचा सर्वाधिक फटका सांगलीला बसतो. यंदा ५५ फुटांपर्यंत पाणीपातळी गेली होती. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह ६० टक्के नागरी वस्ती पुराने बाधित झाली होती. दीड लाख लोकांनी स्थलांतर केले. त्यांच्या निवारा, जेवणाची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली होती. त्यातच आता महापालिकेच्या इमारती, रस्त्यांनाही महापुराचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सांगली-मिरजेतील जवळपास ५० ते ५५ किलोमीटरचे रस्ते खराब झाले आहेत. पुराचे पाणी या रस्त्यांवर थांबल्याने वाहतूक सुरळीत होताच त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय महापालिका इमारतींना पुराचा फटका बसला आहे. महापालिकेचे मुख्यालय दोन ते तीन दिवस पाण्याखाली होते. गावभाग, जामवाडी परिसरातील आरोग्य केंद्र, शाळा, आमराई, प्रतापसिंह, शाहू, शास्त्री उद्यान, पाणी पुरवठा विभागाकडील जॅकवेल, पपिंग स्टेशन, मलनि:स्सारणाची यंत्रणा, विद्युत खांब व साहित्य अशा विविध बाबींचे मोठे नुकसान झाले आहे. महापालिकेचे १८५ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, तसा अहवालही शासनाला सादर करण्यात आला आहे.

चौकट

यंदा तरी मदत मिळणार का?

२०१९च्या महापुरात महापालिकेच्या इमारती, रस्ते, पाणी पुरवठा, विद्युत, ड्रेनेज विभागाचे २०८ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. या नुकसानापोटी मदतीचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला होता. पण दोन वर्षात एक रुपयांची भरपाई मिळालेली नाही. आताही १८५ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दोन वर्षात महापालिकेचे जवळपास ३९३ कोटींचे नुकसान झाले. त्यामुळे यंदा तरी शासनाकडून महापालिकेला मदतीचा हात दिला जाणार की प्रस्ताव पुन्हा धूळखात पडणार, याची चिंता प्रशासनाला लागली आहे.