शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

महापालिका इमारती, रस्त्यांचे १८५ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सर्वाधिक फटका सांगली शहराला बसला आहे. ६० टक्के शहर पाण्याखाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सर्वाधिक फटका सांगली शहराला बसला आहे. ६० टक्के शहर पाण्याखाली होते. या महापुरामुळे महापालिकेच्या इमारती, रस्त्यांचे १८५ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. २०१९च्या महापुरातही महापालिकेचे २०८ कोटींचे नुकसान झाले होते.

गेल्या दोन वर्षात सांगलीकर सातत्याने संकटांशी सामना करत आहेत. ऑगस्ट २०१९मध्ये आलेल्या प्रलयंकारी महापुराने नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२०पासून कोरोनाशी लढा सुरू आहे. गेले वर्षभर महापालिकेची यंत्रणा कोरोनाशी संघर्ष करत असताना यंदा महापुराने संकटात नवी भर टाकली. त्यात महापालिकेची आर्थिक घडी आधीच विस्कटलेली आहे. दरवर्षी ७५० कोटींचा अर्थसंकल्प केला जात असला तरी प्रत्यक्षात महापालिकेचे उत्पन्न २५० कोटींच्या घरातच आहे. खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ घालताना प्रशासनाला कसरत करावी लागते. त्यात यंदाच्या महापुराने महापालिकेला मोठा झटका दिला आहे.

कृष्णेच्या महापुराचा सर्वाधिक फटका सांगलीला बसतो. यंदा ५५ फुटांपर्यंत पाणीपातळी गेली होती. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह ६० टक्के नागरी वस्ती पुराने बाधित झाली होती. दीड लाख लोकांनी स्थलांतर केले. त्यांच्या निवारा, जेवणाची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली होती. त्यातच आता महापालिकेच्या इमारती, रस्त्यांनाही महापुराचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सांगली-मिरजेतील जवळपास ५० ते ५५ किलोमीटरचे रस्ते खराब झाले आहेत. पुराचे पाणी या रस्त्यांवर थांबल्याने वाहतूक सुरळीत होताच त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय महापालिका इमारतींना पुराचा फटका बसला आहे. महापालिकेचे मुख्यालय दोन ते तीन दिवस पाण्याखाली होते. गावभाग, जामवाडी परिसरातील आरोग्य केंद्र, शाळा, आमराई, प्रतापसिंह, शाहू, शास्त्री उद्यान, पाणी पुरवठा विभागाकडील जॅकवेल, पपिंग स्टेशन, मलनि:स्सारणाची यंत्रणा, विद्युत खांब व साहित्य अशा विविध बाबींचे मोठे नुकसान झाले आहे. महापालिकेचे १८५ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, तसा अहवालही शासनाला सादर करण्यात आला आहे.

चौकट

यंदा तरी मदत मिळणार का?

२०१९च्या महापुरात महापालिकेच्या इमारती, रस्ते, पाणी पुरवठा, विद्युत, ड्रेनेज विभागाचे २०८ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. या नुकसानापोटी मदतीचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला होता. पण दोन वर्षात एक रुपयांची भरपाई मिळालेली नाही. आताही १८५ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दोन वर्षात महापालिकेचे जवळपास ३९३ कोटींचे नुकसान झाले. त्यामुळे यंदा तरी शासनाकडून महापालिकेला मदतीचा हात दिला जाणार की प्रस्ताव पुन्हा धूळखात पडणार, याची चिंता प्रशासनाला लागली आहे.