शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

खानापूर तालुक्यात १८ जागा बिनविरोध

By admin | Updated: July 16, 2015 00:13 IST

ग्रामपंचायत निवडणूक : ९४ जागांसाठी १९८ उमेदवार रिंगणात; मंगरूळची बिनविरोध परंपरा खंडित

विटा : खानापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या ११४ पैकी १८ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ९४ जागांसाठी १९८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पारे ग्रामपंचायतीसाठी पहिल्यांदाच ११ पैकी ८ सदस्य बिनविरोध झाले आहेत, तर मंगरूळ ग्रामपंचायतीसाठी दोन गटात सरळ लढत होत असून या ग्रामपंचायतीची ४५ वर्षांपासून असलेली बिनविरोधची परंपरा यावेळी खंडित झाली आहे. तसेच खानापूर ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी तिरंगी लढत होत आहे.खानापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक, तर खानापूर ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी निवडणूक प्रक्रिया होत आहे. एकूण ११४ जागांसाठी ३४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी १२५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. नागेवाडी ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात असल्याने येथे दोन गटात सरळ लढत होत आहे. मंगरूळ येथेही ९ जागांसाठी १८ अर्ज राहिल्याने दुरंगी लढत होत आहे. तांदळगावात ७ जागांसाठी १४, देविखिंडीत ९ जागांसाठी १८, मेंगाणवाडीत ७ जागांसाठी १४, भिकवडी बुद्रुक येथे ९ जागांसाठी २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिल्याने दुरंगी लढत आहे.खंबाळे (भा.) येथे ९ पैकी ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित ५ जागांसाठी १० उमेदवार रिंगणात आहेत. माहुली येथे ११ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित ९ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात आहेत. पारे येथे ११ पैकी सर्वाधिक ८ जागा बिनविरोध करण्यात स्थानिक कार्यकर्त्यांना यश आले असून उर्वरित ३ जागांसाठी ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पोसेवाडीत ७ पैकी १ जागा बिनविरोध झाली असून उर्वरित ६ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. भडकेवाडीत ७ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या असून पाच जागांसाठी ६ उमेदवार रिंगणात आहेत. शेंडगेवाडीत ७ जागांसाठी १० उमेदवार निवडणूक लढवित आहेत, तर खानापूर पोटनिवडणुकीत एका जागेसाठी ३ उमेदवार रिंगणात असल्याने येथे तिरंगी लढत होत आहे. खानापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर होत असल्याने याठिकाणी मोठी चुरस निर्माण होणार आहे. (वार्ताहर)प्रतिष्ठेची लढतखानापूर तालुक्यातील मंगरूळ ग्रामपंचायतीची निवडणूक १९७० पासून बिनविरोध होत होती. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामरावदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगरूळने ही परंपरा अखंडित ठेवली होती. परंतु, यावेळी रामरावदादा पाटील यांना खा. संजय पाटील समर्थकांनी आव्हान दिल्याने बिनविरोधची परंपरा यावर्षी खंडित झाली आहे. ग्रामपंचायतीसाठी गावातील मतदारांना तब्बल ४५ वर्षांनंतर मतदान करण्याची संधी मिळाली आहे. परिणामी, ही निवडणूक रामरावदादा व संजयकाका या दोन्ही नेत्यांच्या प्रतिष्ठेची झाली आहे.बिनविरोध झालेले उमेदवारखानापूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीत १८ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. बिनविरोध सदस्यांमध्ये खंबाळे (भा.)- सुलक्षणा कांतिलाल मस्के, सिंधुताई बाळकृष्ण सुर्वे, प्रताप विलास पाटील, लक्ष्मीबाई भरत सुर्वे, पारे - लक्ष्मी बाळू एटमे, नजमा कमाल नदाफ, पवन संजय साळुंखे, सुनंदा वाल्मिक सूर्यवंशी, सुरेखा शहाजी साळुंखे, रूक्साना नजीर मुलाणी, धनाजी बाळासाहेब शेळके, तुकाराम पांडुरंग वलेकर. पोसेवाडी - पार्वती शंकर पिसाळ. माहुली - मीराबाई संतू बारसिंग, संगीता विपुल माने. रेणावी - हुसेन अहंमद शिकलगार. भडकेवाडी - तानाजी संभाजी कदम, उज्ज्वला उदयकुमार जाधव यांचा समावेश आहे.