शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

खानापूर तालुक्यात १८ जागा बिनविरोध

By admin | Updated: July 16, 2015 00:13 IST

ग्रामपंचायत निवडणूक : ९४ जागांसाठी १९८ उमेदवार रिंगणात; मंगरूळची बिनविरोध परंपरा खंडित

विटा : खानापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या ११४ पैकी १८ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ९४ जागांसाठी १९८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पारे ग्रामपंचायतीसाठी पहिल्यांदाच ११ पैकी ८ सदस्य बिनविरोध झाले आहेत, तर मंगरूळ ग्रामपंचायतीसाठी दोन गटात सरळ लढत होत असून या ग्रामपंचायतीची ४५ वर्षांपासून असलेली बिनविरोधची परंपरा यावेळी खंडित झाली आहे. तसेच खानापूर ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी तिरंगी लढत होत आहे.खानापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक, तर खानापूर ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी निवडणूक प्रक्रिया होत आहे. एकूण ११४ जागांसाठी ३४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी १२५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. नागेवाडी ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात असल्याने येथे दोन गटात सरळ लढत होत आहे. मंगरूळ येथेही ९ जागांसाठी १८ अर्ज राहिल्याने दुरंगी लढत होत आहे. तांदळगावात ७ जागांसाठी १४, देविखिंडीत ९ जागांसाठी १८, मेंगाणवाडीत ७ जागांसाठी १४, भिकवडी बुद्रुक येथे ९ जागांसाठी २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिल्याने दुरंगी लढत आहे.खंबाळे (भा.) येथे ९ पैकी ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित ५ जागांसाठी १० उमेदवार रिंगणात आहेत. माहुली येथे ११ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित ९ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात आहेत. पारे येथे ११ पैकी सर्वाधिक ८ जागा बिनविरोध करण्यात स्थानिक कार्यकर्त्यांना यश आले असून उर्वरित ३ जागांसाठी ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पोसेवाडीत ७ पैकी १ जागा बिनविरोध झाली असून उर्वरित ६ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. भडकेवाडीत ७ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या असून पाच जागांसाठी ६ उमेदवार रिंगणात आहेत. शेंडगेवाडीत ७ जागांसाठी १० उमेदवार निवडणूक लढवित आहेत, तर खानापूर पोटनिवडणुकीत एका जागेसाठी ३ उमेदवार रिंगणात असल्याने येथे तिरंगी लढत होत आहे. खानापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर होत असल्याने याठिकाणी मोठी चुरस निर्माण होणार आहे. (वार्ताहर)प्रतिष्ठेची लढतखानापूर तालुक्यातील मंगरूळ ग्रामपंचायतीची निवडणूक १९७० पासून बिनविरोध होत होती. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामरावदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगरूळने ही परंपरा अखंडित ठेवली होती. परंतु, यावेळी रामरावदादा पाटील यांना खा. संजय पाटील समर्थकांनी आव्हान दिल्याने बिनविरोधची परंपरा यावर्षी खंडित झाली आहे. ग्रामपंचायतीसाठी गावातील मतदारांना तब्बल ४५ वर्षांनंतर मतदान करण्याची संधी मिळाली आहे. परिणामी, ही निवडणूक रामरावदादा व संजयकाका या दोन्ही नेत्यांच्या प्रतिष्ठेची झाली आहे.बिनविरोध झालेले उमेदवारखानापूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीत १८ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. बिनविरोध सदस्यांमध्ये खंबाळे (भा.)- सुलक्षणा कांतिलाल मस्के, सिंधुताई बाळकृष्ण सुर्वे, प्रताप विलास पाटील, लक्ष्मीबाई भरत सुर्वे, पारे - लक्ष्मी बाळू एटमे, नजमा कमाल नदाफ, पवन संजय साळुंखे, सुनंदा वाल्मिक सूर्यवंशी, सुरेखा शहाजी साळुंखे, रूक्साना नजीर मुलाणी, धनाजी बाळासाहेब शेळके, तुकाराम पांडुरंग वलेकर. पोसेवाडी - पार्वती शंकर पिसाळ. माहुली - मीराबाई संतू बारसिंग, संगीता विपुल माने. रेणावी - हुसेन अहंमद शिकलगार. भडकेवाडी - तानाजी संभाजी कदम, उज्ज्वला उदयकुमार जाधव यांचा समावेश आहे.