शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

शाळांसह अंगणवाड्यांच्या १४९ इमारती धोकादायक; शासकीय इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट चालू

By अशोक डोंबाळे | Updated: July 21, 2023 17:15 IST

जिल्हा परिषद प्रशासनाकडून इमारतीचा वापर न करण्याच्या सूचना

सांगली : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत इमारतींसह अन्य शासकीय इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट बांधकाम विभागाकडून चालू आहे. यामध्ये १४९ इमारती धोकादायक असल्याचा अहवाल बांधकाम विभागाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. त्यानुसार प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांनी धोकादायक इमारतीचा वापर करू नये, अशा सूचना मुख्याध्यापक, ग्रामसेवकांना दिल्या आहेत.

जिल्ह्यात संभाव्य पूरपरिस्थिती व अतिवृष्टी विचारात घेऊन नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये, म्हणून जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर विविध विभागांकडून धोकादायक इमारतींचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायत इमारत आणि सामाजिक सभागृह असे मिळून १४९ धोकादायक इमारती असल्याचे आढळून आले.

यापैकी ५७ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण आहे. उर्वरित ९२ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट प्रस्ताव तात्काळ सादर करण्याबाबत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी उपकार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत. प्राथमिक पाहणीत ९२ इमारती सुद्धा धोकादायकच असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील धोकादायक इमारतीमध्ये जत तालुक्यात सर्वाधिक ५५ इमारतींचा समावेश आहे. त्यापाठोपाठ खानापूर तालुक्यात २३ तर वाळवा २, पलूस २२, कडेगाव ६, आटपाडी ८, तासगाव ३, मिरज तालुक्यातील २०, कवठेमहांकाळ तालुक्यातील १० धोकादायक इमारतींचा समावेश असल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले. ज्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण आहे, त्या इमारतींमध्ये सुरक्षेसाठी आवश्यक त्या दुरुस्त्या आणि निर्लेखन तात्काळ करण्याबाबतच्या सूचना बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता भारती बिराजे यांनी उपकार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत.

धोकादायक इमारतीचा वापर केल्यास कारवाई : निखिल ओसवाल

ज्याठिकाणी इमारत धोकादायक आहेत. तिथे संबंधित इमारत धोकादायक असल्याचा फलक इमारतीवर लावण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. धोकादायक इमारत असतानाही कोण वापर करत असेल तर संबंधित दोषी शिक्षक, ग्रामसेवक, मुख्याध्यापकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांनी दिला आहे.