शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

महापालिका क्षेत्रात १३८ धोकादायक इमारती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:31 IST

सांगली : पावसाळापूर्वी धोकादायक इमारतीचा सर्व्हे करण्यात आला असून महापालिका क्षेत्रात १३८ इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. या ...

सांगली : पावसाळापूर्वी धोकादायक इमारतीचा सर्व्हे करण्यात आला असून महापालिका क्षेत्रात १३८ इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. या मिळकतधारकांना महापालिकेच्यावतीने नोटिसा बजाविल्या जाणार आहेत. धोकादायक इमारती तत्काळ उतरवून घ्याव्यात, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

धोकादायक इमारत अथवा धोकादायक भाग उतरवून घ्यावा. अतिधोकादायक इमारत तत्काळ रिकामी करून उतरवून घ्यावी. धोकादायक भाग उतरवण्यापूर्वी बाजूच्या इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जरुरीप्रमाणे टेके द्यावेत. कोणासही धोका पोहोचणार नाही, अशा दृष्टीने सर्व उपाययोजना व तजवीज करावी, असे आवाहन महापालिका प्रभाग समितींच्या सहायक आयुक्तांनी केले आहे.

दरम्यान, महापालिकेने धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजाविण्याचे काम सुरू केले आहे. या नोटिसीत जुलै आणि ऑगस्ट २०१९ मध्ये झालेली अतिवृष्टी व कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे ज्यांच्या इमारती, घरे राहण्यास अत्यंत धोकादायक झालेले आहेत, अशा मिळकतधारकांनी धोकादायक इमारती, घरे तत्काळ उतरवून घ्यावीत. त्याबाबत कार्यवाही न केल्यास व जीवित व वित्तहानी झाल्यास संबंधित मिळकतधारक जबाबदार राहतील. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. खटला भरण्याचा महानगरपालिकेस अधिकार राहील, असे म्हटले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धोकादायक, मोडकळीस आलेल्या खासगी इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरित करावयाची जबाबदारी पोलीस विभागाची आहे. त्यानुसार पोलीस यंत्रणेने ही कार्यवाही करावी, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.

चौकट

धोकादायक इमारतींचे पुढे काय?

सध्या महापालिकेने धोकादायक व अतिधोकादायक इमारतींना नोटिसा बजाविण्यास सुरुवात केली आहे. नोटिसीनंतर धोकादायक इमारती निष्काशित करण्याची कारवाई केली जाते. जागामालकाने इमारत उतरवून घेतली नाही, तर महापालिकेकडून ती पाडण्यात येते व त्याचा खर्च जागा मालकांकडून वसूल केला जातो.