शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

महापालिका क्षेत्रात १३८ धोकादायक इमारती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:31 IST

सांगली : पावसाळापूर्वी धोकादायक इमारतीचा सर्व्हे करण्यात आला असून महापालिका क्षेत्रात १३८ इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. या ...

सांगली : पावसाळापूर्वी धोकादायक इमारतीचा सर्व्हे करण्यात आला असून महापालिका क्षेत्रात १३८ इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. या मिळकतधारकांना महापालिकेच्यावतीने नोटिसा बजाविल्या जाणार आहेत. धोकादायक इमारती तत्काळ उतरवून घ्याव्यात, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

धोकादायक इमारत अथवा धोकादायक भाग उतरवून घ्यावा. अतिधोकादायक इमारत तत्काळ रिकामी करून उतरवून घ्यावी. धोकादायक भाग उतरवण्यापूर्वी बाजूच्या इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जरुरीप्रमाणे टेके द्यावेत. कोणासही धोका पोहोचणार नाही, अशा दृष्टीने सर्व उपाययोजना व तजवीज करावी, असे आवाहन महापालिका प्रभाग समितींच्या सहायक आयुक्तांनी केले आहे.

दरम्यान, महापालिकेने धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजाविण्याचे काम सुरू केले आहे. या नोटिसीत जुलै आणि ऑगस्ट २०१९ मध्ये झालेली अतिवृष्टी व कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे ज्यांच्या इमारती, घरे राहण्यास अत्यंत धोकादायक झालेले आहेत, अशा मिळकतधारकांनी धोकादायक इमारती, घरे तत्काळ उतरवून घ्यावीत. त्याबाबत कार्यवाही न केल्यास व जीवित व वित्तहानी झाल्यास संबंधित मिळकतधारक जबाबदार राहतील. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. खटला भरण्याचा महानगरपालिकेस अधिकार राहील, असे म्हटले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धोकादायक, मोडकळीस आलेल्या खासगी इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरित करावयाची जबाबदारी पोलीस विभागाची आहे. त्यानुसार पोलीस यंत्रणेने ही कार्यवाही करावी, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.

चौकट

धोकादायक इमारतींचे पुढे काय?

सध्या महापालिकेने धोकादायक व अतिधोकादायक इमारतींना नोटिसा बजाविण्यास सुरुवात केली आहे. नोटिसीनंतर धोकादायक इमारती निष्काशित करण्याची कारवाई केली जाते. जागामालकाने इमारत उतरवून घेतली नाही, तर महापालिकेकडून ती पाडण्यात येते व त्याचा खर्च जागा मालकांकडून वसूल केला जातो.