शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

सांगलीतील तुंगच्या जात पंचायतीचे १३ पंच न्यायालयात हजर, कुटुंबास बहिष्कृत करुन वाळीत टाकल्याचे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 19:43 IST

आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याच्या मुलाच्या विवाहास पाठींबा दिला म्हणून तुंग (ता. मिरज) येथील पांडूरंग तमाण्णा चौगुले-नंदीवाले यांच्या कुटुंबास बहिष्कृत करुन वाळीत टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले नंदीवाले जात पंच शुक्रवारी न्यायालयात शरण आले.

सांगली, दि. 15 - आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याच्या मुलाच्या विवाहास पाठींबा दिला म्हणून तुंग (ता. मिरज) येथील पांडूरंग तमाण्णा चौगुले-नंदीवाले यांच्या कुटुंबास बहिष्कृत करुन वाळीत टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले नंदीवाले जात पंच शुक्रवारी न्यायालयात शरण आले. चार दिवसापूर्वी त्यांच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. शंकर यल्लाप्पा चौगुले, रावसाहेब शंकर चौगुले, पांडूरंग लक्ष्मण चौगुले, गजानन राजाराम चौगुले, शिवाजी राजाराम चौगुले, दिलीप श्रीपती चौगुले, सोपान लक्ष्मण चौगुले, ज्ञानदेव लक्ष्मण चौगुले, अशोक ज्ञानदेव चौगुले, विलास शिन्नाप्पा चौगुले, आप्पासाहेब शिन्नाप्पा चौगुले, महेश तुकाराम चौगुले, नितीन तुकाराम चौगुले, (सर्व रा. नंदीवाले वसाहत, तुंग) अशी न्यायालयात शरण आलेल्या नंदीवाले जात पंचायतीच्या पंचांची नावे आहेत. पांडूरंग चौगुले यांनी दहा वर्षापूर्वी आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याच्या मुलाच्या विवाहास पाठींबा दिला होता. त्यामुळे नंदीवाले जात पंचायतीने चौगुले कुटूंबास समाजातून बहिष्कृत करुन त्यांना वाळीत टाकले होते. त्यांना समाजातील धार्मिक कार्यक्रम, लग्न तसेच कोणाचे निधन झाले तरी बोलाविले जात नव्हते. जात पंचायतीने या कुटूंबाचे जगणे मुश्किल करुन सोडले होते. कोणीही नातेवाईक व समाजातील व्यक्ती त्यांच्याशी संबंध ठेवत नव्हते. गेली दहा वर्षे हे कुटूंब अपमानित होऊन जगत होते. जात पंचायतीच्या त्रासामुळे त्यांना गाव सोडण्याची वेळ आली होती. जात पंचायतीच्या या अन्यायाविरुद्ध पाडूरंग चौगुले यांनी अंधश्रद्धा निर्मृलन समितीच्या समितीकडे लेखी तक्रार केली होती. त्यानुसार अंनिसचे कार्यकर्ते राहूल थोरात, संजय बनसोडे, प्रा. सतीश चौगुले, अवधूत कांबळे, अजय भालकर, प्रा. अनंतरकुमार पोळ यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांची भेट घेऊन चौगुले कुटूंबावर गेली दहा वर्षे झालेल्या अन्यायाची माहिती दिली. तसेच राज्य शासनाने नुकताच पारित केलेल्या सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यांतर्गत नंदीवाले जात पंचायतीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. अंनिसच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तुंग गावाला भेट देऊन चौकशी केली. ग्रामस्थांकडून माहिती घेतली. त्यानंतर जात पंचायतीच्या १३ पंचाविरुद्ध सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी सर्व संशयित न्यायालयात हजर झाले. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी न्यायालयात धाव घेतली.

टॅग्स :Courtन्यायालय