शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

१२६ प्राणांतिक वाहन

By admin | Updated: December 1, 2014 00:06 IST

चौपदरीकरणाची मागणी : जिल्ह्यात घडलेल्या अपघातानंतर बोध घ्या

प्रकाश वराडकर - रत्नागिरी -जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यांच्या काळात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व जिल्ह्यातील इतर मार्गांवर झालेल्या १२६ प्राणांतिक वाहन अपघातात १४३ जणांचा मृत्यू झाला. मुंबई - गोवा महामार्गावर सर्वाधिक ७६ अपघात झाले असून, त्यात ९२ जणांना प्राण गमवावा लागल्याने हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे या महामार्गाचे लवकरात लवकर चौपदरीकरण होण्याची मागणी सुरू झाली आहे.राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी अरुंद पूल, अरूंद रस्ते तसेच तीव्र चढ-उतारांबरोबरच धोकादायक वळणे, रस्त्यावर असलेले खड्डे यामुळे या रस्त्याची माहिती नसलेल्या तसेच बेदरकारपणे वाहने हाकणाऱ्या चालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय महामार्गावर जानेवारी २०१४ ते आॅक्टोबर २०१४ या दहा महिन्यांत झालेल्या ७६ अपघातात ७० पुरुष व २२ महिला मिळून ९२ जणांचा मृत्यू झाला, तर ७९ अपघातात २४० पुरुष व ६५ महिलांसह ३०५ जण गंभीर जखमी झाले. ९१ अपघातांत ४८९ जण किरकोळ जखमी झाले. राज्य महामार्गावर याच दहा महिन्यात झालेल्या १४ अपघातात १२ पुरुष व २ महिलांसह १४ जणांचा मृत्यू झाला. २५ अपघातात ४५ पुरुष व १० महिलांसह ५५ जण गंभीर जखमी झाले. याच कालावधीत राज्य महामार्गावर ८ अपघातात २३ जण किरकोळ जखमी झाले. दहा महिन्यांत ३६ अपघातात ३५ पुरुष व २ महिलांसह ३७ जणांचा बळी गेला. ६० अपघातात ९४ पुरुष व २६ महिलांसह १२० जणांना प्राणास मुकावे लागले. भीषण अपघाताला कारणीभूत...मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या दहा महिन्यात झालेल्या भीषण अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले. मात्र, चौपदरीकरणाचे कवित्व सुरूच आहे. रस्ते अपघात का घडतात, कसे घडतात, त्यातून संबंधित शासनप्रणालीने या विषयात गंभीर दखल घेऊन यावर योग्य उपाय योजले पाहिजेत. रस्त्यावरील भीषण अपघातानंतर मागे उरलेले सत्य आपण पाहतो. मात्र, हे सत्य जबाबदारी का स्वीकारीत नाहीत, असा प्रश्न विचारला जात असला तरी महामार्गावरील अनेक कारणे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. अनेक नेत्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या घोषणा केल्या. मात्र, त्या कमी प्रमाणात येत आहेत. कोकणी माणसाने यापूर्वी रेल्वेचे स्वप्न पाहिले, अथक प्रयत्नांनंतर व सततच्या रेट्यानंतर ते सत्यात उतरले आहे. आता चौपदरीकरणाला सुरूवात झाली आहे. मात्र, हे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न ज्याच्या तोंडी कायम आहे. अधिकारी, पत्रकार, समाजसेवक, लोकप्रतिनिधी, मंत्री यांनी यात जातीने लक्ष घालायलाच हवे, असे मत आता व्यक्त होत ्आहे. पाच वर्षातील अपघातवर्ष अपघात मृत्यू20099481232010957169201196814920129011602013145 662014126143सावर्डे - येथे सन २००९मध्ये पाचजण ठार झाले होते. खेडमध्ये २०१० साली झालेल्या लक्झरी बस व कार अपघातात दहाजणांचा बळी बळी गेला, तर नोव्हेंबर २0१२मध्ये नीता ट्रॅव्हल्सच्या गाडीला सावर्डे येथे झालेल्या अपघातात सहाजण दगावले होते. देवळे अपघातात पाचजण मृत्यूमुखी पडले होते.