शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

१२६ प्राणांतिक वाहन

By admin | Updated: December 1, 2014 00:06 IST

चौपदरीकरणाची मागणी : जिल्ह्यात घडलेल्या अपघातानंतर बोध घ्या

प्रकाश वराडकर - रत्नागिरी -जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यांच्या काळात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व जिल्ह्यातील इतर मार्गांवर झालेल्या १२६ प्राणांतिक वाहन अपघातात १४३ जणांचा मृत्यू झाला. मुंबई - गोवा महामार्गावर सर्वाधिक ७६ अपघात झाले असून, त्यात ९२ जणांना प्राण गमवावा लागल्याने हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे या महामार्गाचे लवकरात लवकर चौपदरीकरण होण्याची मागणी सुरू झाली आहे.राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी अरुंद पूल, अरूंद रस्ते तसेच तीव्र चढ-उतारांबरोबरच धोकादायक वळणे, रस्त्यावर असलेले खड्डे यामुळे या रस्त्याची माहिती नसलेल्या तसेच बेदरकारपणे वाहने हाकणाऱ्या चालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय महामार्गावर जानेवारी २०१४ ते आॅक्टोबर २०१४ या दहा महिन्यांत झालेल्या ७६ अपघातात ७० पुरुष व २२ महिला मिळून ९२ जणांचा मृत्यू झाला, तर ७९ अपघातात २४० पुरुष व ६५ महिलांसह ३०५ जण गंभीर जखमी झाले. ९१ अपघातांत ४८९ जण किरकोळ जखमी झाले. राज्य महामार्गावर याच दहा महिन्यात झालेल्या १४ अपघातात १२ पुरुष व २ महिलांसह १४ जणांचा मृत्यू झाला. २५ अपघातात ४५ पुरुष व १० महिलांसह ५५ जण गंभीर जखमी झाले. याच कालावधीत राज्य महामार्गावर ८ अपघातात २३ जण किरकोळ जखमी झाले. दहा महिन्यांत ३६ अपघातात ३५ पुरुष व २ महिलांसह ३७ जणांचा बळी गेला. ६० अपघातात ९४ पुरुष व २६ महिलांसह १२० जणांना प्राणास मुकावे लागले. भीषण अपघाताला कारणीभूत...मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या दहा महिन्यात झालेल्या भीषण अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले. मात्र, चौपदरीकरणाचे कवित्व सुरूच आहे. रस्ते अपघात का घडतात, कसे घडतात, त्यातून संबंधित शासनप्रणालीने या विषयात गंभीर दखल घेऊन यावर योग्य उपाय योजले पाहिजेत. रस्त्यावरील भीषण अपघातानंतर मागे उरलेले सत्य आपण पाहतो. मात्र, हे सत्य जबाबदारी का स्वीकारीत नाहीत, असा प्रश्न विचारला जात असला तरी महामार्गावरील अनेक कारणे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. अनेक नेत्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या घोषणा केल्या. मात्र, त्या कमी प्रमाणात येत आहेत. कोकणी माणसाने यापूर्वी रेल्वेचे स्वप्न पाहिले, अथक प्रयत्नांनंतर व सततच्या रेट्यानंतर ते सत्यात उतरले आहे. आता चौपदरीकरणाला सुरूवात झाली आहे. मात्र, हे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न ज्याच्या तोंडी कायम आहे. अधिकारी, पत्रकार, समाजसेवक, लोकप्रतिनिधी, मंत्री यांनी यात जातीने लक्ष घालायलाच हवे, असे मत आता व्यक्त होत ्आहे. पाच वर्षातील अपघातवर्ष अपघात मृत्यू20099481232010957169201196814920129011602013145 662014126143सावर्डे - येथे सन २००९मध्ये पाचजण ठार झाले होते. खेडमध्ये २०१० साली झालेल्या लक्झरी बस व कार अपघातात दहाजणांचा बळी बळी गेला, तर नोव्हेंबर २0१२मध्ये नीता ट्रॅव्हल्सच्या गाडीला सावर्डे येथे झालेल्या अपघातात सहाजण दगावले होते. देवळे अपघातात पाचजण मृत्यूमुखी पडले होते.