शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सांगली शेतकºयांच्या खात्यावर शंभर कोटी वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 01:12 IST

सांगली : कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदान योजनेअंतर्गत ३२ हजार ४४६ शेतकºयांसाठी ९९ कोटी ५ लाख रुपये जिल्हा बँकांच्या विविध शाखांकडे सोमवारी वर्ग करण्यात आले.

ठळक मुद्देकर्जमाफी योजना : ३२ हजार ४४६ शेतकºयांना लाभ; जिल्हा बँकेकडून ३६ कोटीची मागणी कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान तात्काळ जमा करण्याचे आदेश सरकारने जिल्हा बँकेला दिले

सांगली : कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदान योजनेअंतर्गत ३२ हजार ४४६ शेतकºयांसाठी ९९ कोटी ५ लाख रुपये जिल्हा बँकांच्या विविध शाखांकडे सोमवारी वर्ग करण्यात आले. आजअखेर जिल्ह्यातील शेतकºयांना २२0 कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी १४१ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

जिल्हा बँकेने आणखी ३६ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे.आजअखेर जिल्ह्यातील पात्र शेतकºयांच्या तीन याद्या जाहीर झाल्या आहेत. दीड लाखाच्या आतील थकीत शेतकरी, दीड लाखावरील एकरकमी कर्ज परतफेड करणारे शेतकरी व नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी असे वर्गीकरण केले आहे. कर्जमाफीसाठी वारंवार शासनाने नियमात बदल केल्यामुळे रक्कम मिळण्यास विलंब झाला. दिवाळीपूर्वी होणारी कर्जमाफी आता डिसेंबरपर्यंत लांबणीवर गेली.

शासनाने कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकºयांची यादी आणि रक्कम थेट बँकांना पाठविली आहे.जिल्ह्यासाठी ८९ हजार ७९0 शेतकºयांसाठी २२0 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी १४१ कोटी ३८ लाख रुपये जिल्हा बँकेला प्राप्त झाले. कर्जमाफीच्या पहिल्या यादीत १ हजार ३४६ शेतकºयांसाठी ६ कोटी ५२ लाखांच्या कर्जमाफीचा समावेश होता. दुसºया यादीत १९ हजार ७७६ शेतकºयांचा समावेश होता. त्यांना ७२ कोटी १९ लाखांची कर्जमाफी मिळाली होती.

मागील बुधवारी तिसरी यादी शासनाने जाहीर केली होती. त्यामध्ये ३ हजार ३६ शेतकºयांच्या कर्जमाफीचे ७ कोटी ६६ लाख, तर ५९ हजार ८९२ शेतकºयांसाठी ५४ कोटी ९९ लाख रुपये प्रोत्साहन अनुदान मिळाले. शेतकºयांना कर्जमाफीचा दिलासा मिळत असला तरी, अजूनही नियमांमुळे वंचित राहिलेले हजारो शेतकरी शासनाकडून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.जिल्हा बँकेकडून सोमवारी रात्री उशिरापर्यंत ३२ हजार ४४६ शेतकºयांसाठी ९९ कोटी ५ लाख रुपये वर्ग केले. जिल्ह्यातील १0 हजार ६१३ शेतकºयांच्या खात्यावर १८ कोटी २0 हजार रुपये जमा झाले आहेत. कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान तात्काळ जमा करण्याचे आदेश सरकारने जिल्हा बँकेला दिले आहेत.

या कारणांनी महिन्याचा दुसरा शनिवार असूनही बँकेचे कामकाज सुरु होते. रविवारीही कर्जमाफीची रक्कम जमा करण्यासाठी शाखा सुरु राहिल्या.जिल्हा बँकेचे अधिकारी, शाखांचे निरीक्षक, शाखाधिकारी व सोसायट्यांचे सचिव यांच्याकडून कर्जमाफीची कार्यवाही केली जात असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी आणि सहकार विभागाचे मुख्य सचिव एस. एस. संधू वारंवार जिल्हा बँकांकडून आढावा घेत आहेत.