शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

संतांचे सामाजिक कार्य..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 17:45 IST

संतांनी आपल्या आचार-विचारांतून, तत्वज्ञानांतून, अभंग-संकीर्तनातून महाराष्ट्राच्या या शुष्क माळरानावर भक्तीचे नंदनवन फुलविले. जातिभेदाच्या तटभिंती उध्वस्त केल्या. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी लागणाऱ्या भागवत धर्माची पुनर्स्थापना केली आणि याच धर्माने जीवन जगण्याचे संदर्भ शिकवले..!

संतांनी आपल्या आचार-विचारांतून, तत्वज्ञानांतून, अभंग-संकीर्तनातून महाराष्ट्राच्या या शुष्क माळरानावर भक्तीचे नंदनवन फुलविले.  जातिभेदाच्या तटभिंती उध्वस्त केल्या. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी लागणाऱ्या भागवत धर्माची पुनर्स्थापना केली आणि याच  धर्माने  जीवन जगण्याचे संदर्भ शिकवले..!

महाराष्ट्र हे भाग्यवंत राज्य आहे. ते यासाठी की, या राज्यांत अनेक संत जन्माला आले. समजा, जर आपल्या या देशात संत अवतीर्णच झाले नसते तर  माणूस माणसासारखा वागला असता का..?

आज ही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सदाचार संपन्न आहे. इथे मानवता, बंधुता, दया, सौजन्य, परोपकार या मूल्यांचे आचरण आहे, याला एकमेव कारण इथे जन्माला आलेले 'संत' हेच आहे..!

खरं तर, जीवाला कैवल्य प्राप्त व्हावे, मानवी मनाची सर्वांगीण उन्नती व्हावी, समाजातील अज्ञान, अंधःकार दूर व्हावा, समाज हा सदाचाराला प्रवृत्त व्हावा आणि दुराचारापासून परावृत्त व्हावा, याच कार्यासाठी संत या जगात अवतीर्ण होतात. महाराष्ट्राच्या पवित्र पुण्यभूमीत असेच अनेक अवतीर्ण झाले.

संतांनी आपल्या अभंगांतून, संतसाहित्यातून नुसतीच तत्त्वज्ञानाची शुष्क चर्चा केली नाही तर ते जे तत्वज्ञान सांगत होते तसे स्वतः आधी जगत होते, वागत होते..!

आधी केले मग सांगितले..!

म्हणूनच तर त्यांच्या वाणीत आणि साहित्यात समाज परिवर्तनाचं सामर्थ्य होतं. सत्पुरुषांच्या जीवन चरित्रांनीच देशाचा इतिहास समृद्ध होतो म्हणून तर संतांचे जीवन चरित्र हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा अविभाज्य भाग बनला आहे..!

महापुरुष काही आकाशातून पडत नाहीत तर त्यासाठी वैचारिक क्रांती निर्माण व्हावी लागते. महाराष्ट्रातील संतमालिकेत जगद्गुरु तुकोबांचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. तुकोबा म्हणजे साक्षात् भागवत धर्माचा कळसच..!

तुकोबांच्या अभंगवाणीमध्ये ज्याप्रमाणे आर्ततेने केलेला हितोपदेश आहे, त्याचप्रमाणे दांभिकतेवर केलेला प्रहारही आहे..! तुकोबांच्या काळात भक्ती क्षेत्रात सोंग-ढोंग, बुवाबाजी, कर्मकांड याला ऊत आलेला होता. खरी भक्ती लोप पावली जात होती. समाज जीवनात असहिष्णुता बळावली होती. अशा परिस्थितीत -

 

बुडते हे जन न देखवे डोळा ।

येतो कळवळा म्हणूनिया ॥

 

या अखंड तळमळीने तुकोबांनी आपले लक्ष समाजाच्या उद्धाराकडे वळविले आणि यासाठीच त्यांनी आपला देह चंदनासारखा झिजविला..!

 

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

((लेखक ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी हे युवा कीर्तनकार आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी- ८७ ९३ ०३ ०३ ०३.))

टॅग्स :spiritualअध्यात्मिक