शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

का वाटतो मुलांना एकटेपणा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 17:55 IST

बोला मुलांशी. अनेक गोष्टी तुम्हाला समजून येतील..

ठळक मुद्देमुलांना एकवेळ सगळ्या गोष्टी नाही मिळाल्या, तरी चालतील, पण त्यांच्याशी संवाद, त्यांच्या जगात काय चाललं आहे, हे पालकांनी त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहिजे.आत्महत्येसारखे विचार त्यांच्या मनात येताहेत का हे जाणून घेतलं पाहिजे. अशा गोष्टी मुलांशी बोलल्या गेल्या म्हणजे त्यांच्या मनात जर खरोखरच आत्महत्येचे विचार येत असतील तर ते त्यापासून दूर होतील, मोकळे होतील.आपली मुलं जर एकटी राहात असतील, कारणं काहीही असोत, पण त्यांना जर त्याची सवय लागली असेल, तर ती सोशल कशी होतील, याकडे लक्ष दिलं पाहिजे.

- मयूर पठाडेआनंदी असणं, राहाणं हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि त्यासाठी प्रत्येकानं सजगही राहायला हवं. आपली मुलंही आनंदी असावीत, त्यांच्यामागे टेन्शनचा भुंगा नको, असं आपल्याला कितीही वाटत असलं, तरी आपणही त्यासाठी दक्षता घेण्याची गरज आहे..आजच्या फास्ट जगात प्रत्येकाचीच मुलांकडून इतकी काही अपेक्षा आहे की त्यासाठी मुलांना धावाधाव करावीच लागते. या चक्रात गुरफटल्यानंतर त्यातून वेळीच बाहेर पडता नाही आलं किंवा त्याला तोंड देता नाही आलं तर मुलांना नैराश्य येतं आणि त्यात मग ते होरपळून निघतात.आजकाल मुलंही खूप टेन्शनमध्ये दिसतात. त्यामागे अनेक कारणं आहेतच, पण त्या कारणांचा निचराही करता येऊ शकतो. पालकांनी याबाबत दक्ष राहाणं गरजेचं आहे.काय करता येईल?१- मुलांशी पालकांचा संवाद असलाच पाहिजे. प्रत्येक टप्प्यावर पालकांनी मुलांशी अर्थपूर्ण संवाद केला पाहिजे. मुलांना सगळं काही घेऊन दिलं, त्यांना पाहिजे तिथे अ‍ॅडमिशन मिळाली, ती शाळा, कॉलेजात जाताहेत, म्हणजे सारं काही आलबेल आहे, आणि आपली जबाबदारी संपली असं नाही. मुलांना एकवेळ सगळ्या गोष्टी नाही मिळाल्या, तरी चालतील, पण त्यांच्याशी संवाद, त्यांच्या जगात काय चाललं आहे, हे पालकांनी मुलांशी संवाद साधून त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहिजे.२- आणखी एक आत्यंतिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांशी सुसायडल टेन्डन्सीबद्दल बोललंही पाहिजे. आत्महत्येसारखे विचार त्यांच्या मनात येताहेत का हे जाणून घेतलं पाहिजे. अनेकांना वाटतं, मुलांशी आत्महत्येसारख्या गोष्टींवर बोलणं म्हणजे त्यांना स्वत:हून त्या गोष्टीची ‘आयडिया’, जाणीव करुन देणं. पण अभ्यासकांचं म्हणणं आहे, उलट अशा गोष्टी मुलांशी बोलल्या गेल्या म्हणजे त्यांच्या मनात जर खरोखरच आत्महत्येचे विचार येत असतील तर ते त्यापासून दूर होतील, मोकळे होतील.३- मुलांचा एकटेपणा घालवायला हवा. आपली मुलं जर एकटी राहात असतील, कारणं काहीही असोत, पण त्यांना जर त्याची सवय लागली असेल, तर ती सोशल कशी होतील, याकडे लक्ष दिलं पाहिज. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. मुलं बाहेर जातील, मित्रमंडळीत रमतील यासाठी तसं वातावरण निर्माण करायला हवं.४- अभ्यासकांचं म्हणणं आहे, नैराश्य येण्याचं वय हळूहळू खूपच खाली येत चाललंय आणि अगदी बारा वर्षाच्या आतील मुलंही आता आत्महत्या करू लागलीत. त्याचंही प्रमाण बरंच मोठं आहे. त्यामुळे आपल्या मुलाला नैराश्य येऊच शकत नाही, या गैरसमजातून आपण बाहेर यायला हवं.