शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

लग्नानंतरही बायको माहेरचंच आडनाव लावतेय? -याचा काय अर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 16:15 IST

एक नवीन अभ्यास म्हणतोय की, लग्नानंतरही बायकोनं आडनाव बदललं नाही तर लोक त्या लग्नाकडे, नात्याकडे, त्यातल्या सत्ताविभाजनाकडे अजूनही जुनाट नजरांनीच पाहतात. पत्नी पतीला डॉमिनेट करते असं लोकांना वाटतं.

ठळक मुद्देआपण आधुनिक काळात राहत असलो तरी जगभरात आजही बायकोनं लग्नानंतर पडतं घेणंच समाजाला अभिप्रेत आहे का?

लग्न  होतं. लग्नानंतर बायकोनं नाव बदलायचं ही पिढय़ांपिढय़ाची रीत आहे. जगभर आहे. पण आजकाल अनेकजणी लग्नानंतर आडनाव बदलत नाही. किंवा माहेर-सासर दोन्ही आडनावं लावतात. आपल्या समाजात तर लग्नानंतर नाव न बदलणं हे अजूनही त्रासदायकच होतं. अनेक ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट घेऊन फिरावं लागतं. त्यातही कागदोपत्री नाव न बदलणं, नवर्‍याचं आणि मुलांचं आडनाव वेगळं असणं आणि बायकोचं आडनाव वेगळं असणं याचा समाजाला भयंकर त्रास होतो. हे वास्तव आपल्या समाजातलं आहेच पण जगात पुढारलेल्या म्हणवणार्‍या देशांतही हेच चित्र आहे. अमेरिकेतल्या नेवाडा विद्यापीठानं प्रसिद्ध केलेला अभ्यासच तसं सांगतोय. सेक्स रोल्स नावाच्या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. इंग्लंड आणि अमेरिका या दोन देशात केलेल्या अभ्यासातून काही निष्कर्ष त्यांनी जगासमोर ठेवले आहेत.पाश्चिमात्य देशातही लग्नानंतर महिलेने स्वेच्छेने पतीचे आडनाव लावणे ही समाजरीत आहे. बरीच जुनीही आहे. आजही ती रीत अनेकजणी पाळतात. पण गेल्या काही दशकांत महिलांना असा प्रश्न पडू लागला की लग्नानंतर आपलं नाव बदलायची गरज आणि सक्ती काय आहे? नाव न बदलण्याचं प्रमाण बरंच वाढलं. पण नाव बदलणार्‍या महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन आणि नाव न बदलणार्‍या महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन यात मात्र फरक पडत गेला.या  नाव न बदलणार्‍या महिला अती महत्वाकांक्षी, स्वकेंद्री असतात अशी लेबलं समाजानं लावायला सुरुवात केली. त्या लग्नातही जास्त रुबाब करतात, नवर्‍यांना वरचढ असतात, डॉमिनेट करतात असं म्हणण्यार्पयत समाजाची मजल जाते. वैवाहिक नात्यात बायको वरचढ तर पती कमजोर ठरतात. बायकोनं कसं प्रेमळ, समजूतदार, नमतं घेणारी, फार रुबाब न करणारी असावं अशीच आजही समाजाची अपेक्षा आहे असं हा अभ्यास म्हणतो.काळ कितीही बदलला आणि समाज विकसीत झाला असं कितीही म्हटलं तरी स्त्रीपुरुष समानतेसंदर्भात अजून बरंच काम बाकी आहे याचं हे विदारक चित्र आहे.