शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

त्या मोरपंखी दिवसांसाठी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 17:36 IST

आपल्या आजूबाजूची जळमटं दूर सारा आणि डोकवा थोडं बालपणात..

ठळक मुद्दे जगा की स्वत:साठी..जमवा मित्रांबरोबरच्या गप्पांच्या मैफली आणि अड्डे.काढा ती आपली जुनी विटीदांडू. मांडा तो पत्त्यांचा डाव पुन्हा एकदा.. उडू द्या आपले पतंग आकाशात..

- मयूर पठाडेआठवतंय तुम्हाला, यापूर्वी कधी तुम्ही तुमच्या स्वत:साठी, फक्त स्वत:साठी म्हणून एखादी गोष्ट केलीय?.. कसं आठवणार?.. कारण विसरुनच गेलोय आपण स्वत:साठी जगणं. कोणतीही गोष्ट आजवर आपण केलीय, ती कायम दुसºयासाठी. मग ती कधी कुटुंबासाठी असेल, कधी दुसºयांना चांगलं वाटावं म्हणून असेल, आपल्याशिवाय दुसरं कोणीच करणार नाही म्हणून असेल.. कितीतरी कारणं..पण.. माझ्या स्वत:साठी मी केलंय.. असं कधी आपल्या आयुष्यात दिसतच नाही.अगदी साध्या साध्या गोष्टी..लहानपणी तुम्हाला पतंग खेळायला खूप आवडायचं, गोट्या खेळतांना तर तुम्ही देहभान विसरून जायचात. लहानपणी गल्लीत छप्पापाणी, डब्बा गुल, आबाधोबी, लिंगोरचा.. कितीतरी खेळ.. पण अख्खा दिवस कसा मजेत जायचा.. मग कुठे गेली ही गंमत? कुठे गेले ते जवळचे सगळे मित्र?.. ज्यांच्याशिवाय आपल्याला एक क्षणही कधीच करमत नव्हतं?.. जीवाला जीव देत होतो आपण त्यांच्यासाठी.. मग आज काय झालंय?.. का संवाद त्यांच्याशी तुटलाय? विचार करा स्वत:शीच. खरंच आपण इतकी कामात असतो, खरंच आपल्याला इतका शिणवटा आलाय, की आपल्या जवळच्या मित्रमंडळींशी बोलायला.. भले नका प्रत्यक्ष भेटू, पण ज्यांच्यासोबत आयुष्याची सोनेरी स्वप्नं पाहिली, रंगवली त्या आपल्या सहकाºयांशी, मित्रांशी निदान सुरुवातीला फोनवर तर बोलता येईल की नाही?पहा एकदा बोलून. काढा त्या जुन्या खोल आठवणी. मनाच्या गाभाºयात खोल रुतून बसलेलं तुमचं तारुण्य पुन्हा फसफसून बाहेर येतं की नाही ते बघा..मनावर साचलेली सारी जळमटं झडून जाऊ द्या. करा आपल्या मनासारखं. आपल्याला जे आवडतं ते.. काढा ती आपली जुनी विटीदांडू. मांडा तो पत्त्यांचा डाव पुन्हा एकदा.. उडू द्या आपले पतंग आकाशात.. जमवा ती गॅँग पुन्हा एकदा.. आणि हसीमजाक करता करता दणाणून जाऊ द्या पुन्हा एकदा आसमंत..किमान दहा वर्षांनी तरुण झाल्यासारखं वाटतंय की नाही बघा..