शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मुलं जितक्या लवकर परिसरात मिसळतील, तेवढ्या लवकर त्यांचा मेंदू होईल विकसित..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 16:06 IST

आपलं मूल कोणाशी खेळतंय, यापेक्षाही ते बाहेर जाऊन खेळतं की नाही याकडे द्या अधिक लक्ष..

ठळक मुद्देआपलं मूल कोणत्या मुलांमध्ये खेळतं, कोणाबरोबर राहतं, त्या मुलांचा दर्जा काय, या खरं तर दुय्यम गोष्टी आहेत.घरातले चांगले संस्कार आणि ‘आदर्श’ मुलांना नेहमीच चुकीच्या मार्गापासून दूर राखतात.मुलं जितक्या लवकर परिसरात मिसळतील, तितक्या लवकर ते अधिकाधिक गोष्टी शिकतील.

- मयूर पठाडेमुलं कोणताही खेळ खेळत असो, पण लहानपणापासून ती खेळली पाहिजेत. घराबाहेर पडली पाहिजेत. त्यासाठी त्यांनी अगदी ग्राऊंडवर जाऊन आणि एखादा खेळ सिरिअसली शिकला पाहिजे आणि फॉलो केला पाहिजे असं नाही, पण अगदी गल्लीत का होईना, त्यांनी नियमितपणे आपल्या बरोबरच्या मुलांबरोबर, मित्रांबरोबर खेळलं पाहिजे. ज्या अनेक गोष्टी आपण मुलांना घरात शिकवू शकत नाही, कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी आपण त्यांच्या मनावर बिंबवू शकत नाही अशा अनेक गोष्टी मुलं मित्रांमध्ये शिकतात.शिक्षणतज्ञांचं तर म्हणणं आहे, आपलं मूल कोणत्या मुलांमध्ये खेळतं, कोणाबरोबर राहतं, त्या मुलांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दर्जा काय आहे, या खरं तर दुय्यम गोष्टी आहेत. तुमच्या घरात जर चांगले संस्कार असतील, मुलांशी जर तुम्ही ‘आदर्श’ पद्धतीनं वागत असाल आणि त्यांच्या समोर किंवा नकळत काही चुकीच्या गोष्टी तुम्ही करीत नसाल, तर अशा पालकांना घाबरण्याची काहीच गरज नाही. ‘वाईट’ मुलांच्या संगतीत आपली मुलं बिघडतील असा धोकाही त्यामुळे फारसा उद्भवत नाही. खरंतर कोणतंच मूल वाईट नसतं आणि प्रत्येकांत काही ना काही गुण असतातच.मुलांशी आपले संबंध मात्र खेळीमेळीचे असले पाहिजेत आणि त्यांच्यापासून पालकांनी काही लपवूनही ठेवायला नको. जितक्या लहान वयात मुलं घराबाहेर पडतील, तितक्या लकवर ते सोशल होतीलच, पण अनेक प्रकारच्या गोष्टी ते शिकतील, जे त्यांच्या भविष्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल.संशोधनानं सिद्ध झालं आहे की, जी मुलं लवकर घराबाहेर, मित्रमंडळींमध्ये मिसळतात, त्यांच्यात अनेक प्रकरची स्किल्स डेव्हलप होतात, त्यांची मोटर स्किल्सही इतरांपेक्षा अधिक समृद्ध झालेली असतात. त्यांचा मेंदूही लवकर विकसित होतो आणि त्याचा सुयोग्य प्रकारे वापर करायलाही ती पटकन शिकतात.त्यामुळे आपलं मूल कोणाबरोबर खेळतं यापेक्षाही ते बाहेर जाऊन खेळतं की नाही याकडे जास्त लक्ष द्या. अर्थातच मूल कुठलं चुकीचं पाऊल उचलत असेल, तर त्याकडेही आपलं लक्ष असायलाच हवं..