शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
3
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
5
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
6
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
7
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
8
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
9
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
10
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
11
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
12
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
13
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
14
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
15
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
16
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
17
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
18
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
19
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
20
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली

Relation : ‘या’ शुल्लक कारणांनी बिघडते पती-पत्नीचे नाते !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 16:32 IST

नात्यात प्रेम टिकण्यासाठी तसा दोघांनी प्रयत्न करायला हवा. यासाठी आपल्यात येणाऱ्या लहान-सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवे. जाणून घेऊया कोणत्या शुल्लक कारणांनी दोघांत दूरावा निर्माण होतो.

-रवींद्र मोरे आपले नाते मजबूत ठेवण्यासाठी पती-पत्नी दोघेही खूप प्रयत्न करतात. त्यासाठी ते एकमेकांना गिफ्ट देतात, बाहेर फिरायला जातात मात्र बऱ्याचदा अगदी शुल्लक कारणांनी दोघांत भांडण-तंटे होतात आणि नात्यात दूरावा निर्माण होतात. नात्यात प्रेम टिकण्यासाठी तसा दोघांनी प्रयत्न करायला हवा. यासाठी आपल्यात येणाऱ्या लहान-सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवे. जाणून घेऊया कोणत्या शुल्लक कारणांनी दोघांत दूरावा निर्माण होतो. * तुलना करणे  लग्नानंतर बरीच वर्ष झाल्यानंतर पती-पत्नी एकमेकांच्या चुका काढून दुसºयाशी तुलना करु लागतात. विशेषत: महिला आपल्या पतीच्या कामाच्या आणि पर्सनॅलिटीच्या बाबतीत आपल्या भावाशी किंवा अन्य व्यक्तीसोबत तुलना करते ज्यामुळे वेळोवेळी तंटे होतात.  * पैशांवर चर्चा  घर खर्चासाठी पैशांची आवश्यकता असते. मात्र जेव्हा महिला नेहमीच आपल्या पतीशी पैशांच्या बाबतीत चर्चा करीत असेल आणि पैशांनाच जास्त महत्त्व देत असेल तर नाते बिघडू शकते. नात्यात प्रेम टिकवून ठेवायचे असेल तर कधी पैशांना मध्ये येऊ देऊ नका.  * संताप करणे आॅफिसमध्ये काम करताना मानसिक तणाव येत असतो ज्याकारणाने बऱ्याचदा घरी आल्यानंतर पतीची कोणाशी बोलण्याची इच्छा होत नाही, मात्र महिला ही गोष्ट समजत नाही आणि पूर्ण दिवसाच्या सर्व गोष्टी आपल्या पतीला ऐकवायला बसते, ज्याकारणाने पती रागाच्या भरात काहीतरी बोलतो आणि भांडणाला सुरुवात होते. अशावेळी महिलांनी कोणत्या वेळेस कोणती गोष्ट करावी याचे भान ठेवावे, मात्र पुरुषांनाही आपल्या आॅफिसचा ताण घरापर्यंत न आणता आपल्या मुलांसाठी आणि पत्नीसाठीही वेळ काढावा.   * दिवसाची सुरुवात बहुतांश महिलेस सकाळी खूप कामाचा व्याप असतो, त्यात मुले व पतीसाठी ब्रेकफास्ट तयार करणे, स्वत:ची तयारी करणे आणि घराची साफसफाई करणे, मात्र या कामांसाठी तिच्याकडे पुरेसा वेळ नसतो, ज्यामुळे तिची चिडचिड होते. याच चिडचिडसोबत ती जेव्हा पतीशी बोलते तेव्हा दोघांत वाद निर्माण होतो.   * रुची संपणे नव्याचे नऊ दिवस असे म्हणतात, त्यानुसार लग्नाच्या सुरुवातीलाच दोघांत रुची दिसून येते मात्र लग्नाच्या काही वर्षानंतर दोघांत एकमेकांबद्दलची रुची कमी होऊ लागते. यामुळेच नात्यात दूरावा निर्माण होऊ लागतो.