शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

 तुमची मुलं सुद्धा जास्त वेळ ऑनलाईन असतात? वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 17:14 IST

सध्याच्या काळात सगळ्याच वयोगटातील  मुलांच्या हातात मोबाईल असतात.

(image credit- bbc)

सध्याच्या काळात सगळ्याच वयोगटातील  मुलांच्या हातात मोबाईल असतात. कारण काही घरातील पालकांनीच मुलांना फोनची सवय अगदी लहानपणापासून लावलेली असते. समजा एखादं  लहान मुलं खाण्यापिण्याच्या बाबतीत पालकांना त्रास देत असेल तर ते त्याला व्हिडीओ बघत बघत जेवण्याची सवय लावतात. इथपासून सुरूवात होत जाते. त्यानंतर  त्या मुलांना मोबाईलचं वेड  लागतं.   शरीराने फक्त ते  घरातल्यामध्ये मिसळलेले असातात पण सगळं लक्ष त्यांच मोबाईलमध्ये असतं.

सध्या मुलांचं मानसिक  आरोग्य आणि त्यांचा मेंदूवर होणारा मोबाईलच्या अतिवापराचा परीणाम यांसंबंधी एक रिसर्च समोर आला आहे. यात ७० टक्के पालकांनी हे स्वीकारलं आहे की ते  गरजेपेक्षा जास्तवेळ ऑनलाईन असतात.  ७२ टक्के लोक या गोष्टींशी सहमत आहेत की इंटरनेट आणि  मोबाईचा अतिवापर केल्याचा परिणाम कुटूंबावर पडत आहे. जास्त वेळ ऑंनलाईन असल्याचा नकारात्मक परिणाम होऊन  कौटुंबिक समस्या उद्भवत आहे.

या सर्वेत असं दिसून आलं की ४० टक्के पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांच्या ऑनलाईन राहण्याच्या वेळेला रोखायला हवे. कारण दिवसेंदिवसं  सायबर क्राईम्सच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. इंटरनेटचा वापर हा  मुलांच्या मेंदूवर ताबा मिळवत असतो.  मोबाईल आणि इंटरनेट वापराच्या  सगळी साधनं मुलांना आकर्षीत करत असतात.

(image credit- phys,org)

जर तुम्हाला तुमच्या पाल्यांच्या इंटरनेट वापराबद्दल चिंता होत असेल तर आधी तुम्ही स्वतःच मोबाईलचा वापर  आणि ऑनलाईन असण्याचे प्रमाण यांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. या रिसर्चनुसार ७० टक्के  लोकांनी ही गोष्ट  मान्य केली आहे. की  त्यांना  सोशल मिडीया आणि इंटरनेटच्या वापराचे व्यसन आहे. 

(Image credit-doodles.msths.com)

५१ टक्के  लोकं हे  स्वतःच्या वागणूकीतून मुलांचा माध्यमांचा अतिवापर करण्यासाठी प्रभावित करत असतात. जर तुम्हाला मुलं सोशल मिडियाच्या विळख्यात  अडकू नयेत. असं जर तुम्हाला वाटतं असेल  तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही पासवर्ड मोबाईलला ठेवत असाल तर  तो मुलांना कळणार नाही याची काळजी घ्या. तसंच  मुलांसमोर मोबाईलचा वापर टाळा. सोशल मिडियावर काहिही पोस्ट करण्याआधी विचार करून कृती करा.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिप