शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

मुलं सारखे हट्ट का करतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 11:51 IST

पालक आपला वेळ न देता, वस्तू द्यायला लागले तर मुलं तेच मागणार!

ठळक मुद्देमुलांचे मित्र होणं अवघड असलं तरी एकमेकांशी खुलेपणानं बोला तरी!

-योगिता तोडकरअजिंक्यचे वडील माझ्याकडे आले, ते सांगत होते कॉलेजमध्ये गेल्यापासून अजिंक्यचं वागणं पार बदलून गेलय. तो रोज नवीन वस्तू मागत असतो. आता तर त्याच्या इतर मित्रांप्रमाणे एक भव्य फ्लॅट घेऊ म्हणून मागे लागलाय. त्यांना शक्य होतं, तर आपल्याला का नाही असे काहीतरी प्रश्न विचारून भंडावून सोडतो. आम्ही दोघे ऑफिसमधून घरी आलो की याची भुणभुण सुरुच. त्याला रोज या नाही त्या प्रकारे समजावतो पण विशेष काही बदलच नाही. कामाचा ताण त्यात  घरी येताच चिरंजीव असे मागण्या करतात.  वैतागून गेलोय अगदी. त्यानंतर अजिंक्यशी व त्याच्या वडिलांशी स्वतंत्न चर्चा केल्यावर काही ठळक गोष्टी निदर्शनास आल्या. अजिंक्यचे आई व वडील नोकरी करतात. त्यामुळे तो आजी आजोबांनाबरोबर वाढला. आठवड्यातून एकदा ते फिरायला, जेवायला जातात, एवढाच वेळ ते एकत्न घालवतात. मग अजिंक्यासारखी मुलं घराबाहेर जास्त वेळ घालवू पाहतात. त्यांना आकर्षित करतील अशा अनेक गोष्टी बाहेरच्या जगात असतात. जिथे ते रमतात. त्यांना नवीन अनुभव घ्यावेसे वाटतात. त्यात मग त्यांना नवीन मित्न मैत्रिणी भेटत असतात. घरी कोणी वेळ द्यायला नसल्याने या मंडळींबरोबर जास्त वेळ घालवायला सुरवात होते. जास्त वेळ एकत्न घालवल्याने मित्न मंडळींचे विचार आपलेसे वाटू लागतात. आणि  त्यानुसार निर्णय प्रक्रि या चालू होते. सुरवातीला आपल्याला वाटतं, व्हायचंच. हे असं वागणं बोलणं, वयच तसं असतं. हळू हळू मुलं सैरभैर व्हायला लागली कि मग आपण याचा गंभरतीने विचार करायला लागतो. आपल्या मुलांच्या वागण्यात, विचारप्रक्रियेत निर्णयप्रक्रियेत बदल होण्याची आपण वाट का पाहावी?मुळात आपल्या मुलांमध्ये व आपल्यामध्ये जवळीकतेचे संबंध हवेत.  त्यांच्यात व तुमच्यात सुसंवाद हवा. आपल्या घराची व त्यांना उपयोगी पडणारी मूल्य यांची ओळख तुम्ही त्यांना करून द्यायला हवी. आपण मुलांना किती व कसा वेळ देतो हे महत्वाचं म्हणूनच असतं.त्याचप्रमाणेआपल्या मुलांच्या मित्न मैत्रिणींची ओळख करून घ्यावी. त्यांना आपल्या घराचे दरवाजे उघडे ठेवावेत. या गोष्टींमुळे आपली मुलं कोणामध्ये वावरतात त्यामुळे आपल्या मुलांमध्ये काय बदल घडू शकतील, त्याला आपण कशी दिशा देऊ शकू हे लक्षात येते. मुलांना मित्न निवडायचं स्वातंत्र्य नक्की द्या, त्या निवडी स्वीकारा, त्याचा आदरदेखील करा. त्याबरोबरीने मित्न कसे निवडावेत त्यांच्याबरोबर नाते संबंध कसे ठेवावेत हेही समजावून सांगा. नात्याबरोबर भरकटणे आणि ते जपणे यातला फरक समजावून सांगा. म्हणजे कोणतेही निर्णय घेताना मित्न मैत्रिणीच्या प्रभावापेक्षा त्याच्या स्वतर्‍च्या विचारांचा प्रभाव जास्त असेल .    या वयात तुम्ही खरोखर मुलांचे मित्नमैत्रिणी बना, म्हणजे एक मित्न त्याच्यासाठी जे करतो ते सगळं करा त्यामुळे  मुलांच्या विचारांना, निर्णयांना व वर्तनाला योग्य दिशा मिळू शकेल.( लेखिका समुपदेशक आहेत.)