शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
5
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
6
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
7
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
8
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
9
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
10
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
11
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
12
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
13
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
14
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
15
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
16
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
17
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
18
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
19
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
20
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग

या मुलांना ‘शिकवायचं’ तरी कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 13:01 IST

संयम आणि चिकाटीबरोबर पालकांकडे या गोष्टही हव्यात..

ठळक मुद्देमुलांचे प्रश्न कोणतेही असोत, योग्य ती उत्तरं मुलांना मिळायलाच हवीत.दृष्य प्रतिमा, गोष्टी.. यासारख्या माध्यमांतून जर मुलांना काही गोष्टी समजावता आल्या तर मुलांच्या मनावर त्या लवकर ठसतात आणि त्या त्यांच्या लक्षातही राहतात.लक्ष एकाग्र करता येऊ शकतील अशा गोष्टींचा चातुर्यानं वापर केला तर मुलांचा अटेन्शन स्पॅन वाढू शकतो.कोणतीही गोष्ट घाईघाईनं शिकवण्यापेक्षा सोप्याकडून अवघडकडे असाच प्रवास असला पाहिजे. काठिण्यपातळी हळूहळू वाढवत नेली पाहिजे.

- मयूर पठाडेआपल्या मुलांशी आपण कसं बोलतो? कायम वसावसा त्यांच्या अंगावर ओरडत असतो कि त्यांच्याशी प्रेमानं, त्यांना समजून घेऊन त्यांच्याशी संवाद साधत असतो? मुलांची आकलनक्षमता उत्तम असेल तर एकवेळ ठीक, पण मुलांचा आयक्यू जर कमी असेल, सर्वसाधारण मुलांपेक्षा त्यांची शिकण्याची गती कमी असेल, तर या मुलांसाठी असं वागणं फारच धोक्याचं ठरू शकतं. कारण त्यांची शिकण्याची क्षमता, इच्छा आणखीच कमी होऊ शकते.मुलांशी कायम त्याच भाषेत बोललं पाहिजे, जी त्यांना समजेल. यावर काही जण असंही म्हणतील, आजकालच्या पोरांना माराचीच भाषा समजते, त्याशिवाय ते वठणीवर येत नाहीत, पण धाकदपटशा कधीच कामाला येत नाही आणि त्याचा फारसा उपयोगही होत नाही. त्या वेळेपुरता कदाचित त्याचा ‘सकारात्मक’ परिणाम दिसू शकेल, पण अंतिमत: मुलांसाठी आणि पालकांसाठीही ते घातकच आहे, असा इशारा संशोधकांनी, अभ्यसकांनीही देऊन ठेवलाय.मुलांचे कोणतेही प्रश्न असोत, ते अगदीच किरकोळ असोत किंवा अवघड, आपल्यालाही न समजणारे.. ते टाळण्यापेक्षा त्यांची योग्य ती उत्तरं मुलांपर्यंतं पोहोचवणं मुलांच्या भवितव्यासाठी फारच उपयुक्त असतात. योग्य ती उत्तरं मुलांना मिळायलाच हवीत.दृष्य प्रतिमा, गोष्टी.. यासारख्या माध्यमांतून जर मुलांना काही गोष्टी समजावता आल्या तर मुलांच्या मनावर त्या लवकर ठसतात आणि त्या त्यांच्या लक्षातही राहतात.मुलांचा, त्यातही लहान मुलांचा आणि ही मुलं जर सर्वसाधारण मुलांपेक्षा कमी आयक्यू असलेली असतील, तर त्यांचा अटेन्शन स्पॅन, म्हणजे लक्ष एकाग्र करण्याची क्षमता खूपच कमी असते. त्यासाठी त्यांचे लक्ष एकाग्र करता येऊ शकतील अशा गोष्टींचा चातुर्यानं वापर केला तर त्यांचा अटेन्शन स्पॅनही वाढू शकतो.कोणतीही गोष्ट घाईघाईनं शिकवण्यापेक्षा सोप्याकडून अवघडकडे असाच प्रवास असला पाहिजे. काठिण्यपातळी हळूहळू वाढवत नेली पाहिजे.ज्यांची शैक्षणिक गती कमी आहे, ज्यांचा कमी आयक्यू आहे, अशा मुलांना बºयाचदा आपल्या बुटाच्या नाड्याही व्यवस्थित बांधता येत नाहीत. पण त्यावर चिडण्यापेक्षा त्यांची ही क्षमता विकसित करून मग तुलनेनं अधिक गोष्टी शिकवण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यासाठी संयम हवा आणि चिकाटीही. त्याला पर्याय नाही.