शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

या मुलांना ‘शिकवायचं’ तरी कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 13:01 IST

संयम आणि चिकाटीबरोबर पालकांकडे या गोष्टही हव्यात..

ठळक मुद्देमुलांचे प्रश्न कोणतेही असोत, योग्य ती उत्तरं मुलांना मिळायलाच हवीत.दृष्य प्रतिमा, गोष्टी.. यासारख्या माध्यमांतून जर मुलांना काही गोष्टी समजावता आल्या तर मुलांच्या मनावर त्या लवकर ठसतात आणि त्या त्यांच्या लक्षातही राहतात.लक्ष एकाग्र करता येऊ शकतील अशा गोष्टींचा चातुर्यानं वापर केला तर मुलांचा अटेन्शन स्पॅन वाढू शकतो.कोणतीही गोष्ट घाईघाईनं शिकवण्यापेक्षा सोप्याकडून अवघडकडे असाच प्रवास असला पाहिजे. काठिण्यपातळी हळूहळू वाढवत नेली पाहिजे.

- मयूर पठाडेआपल्या मुलांशी आपण कसं बोलतो? कायम वसावसा त्यांच्या अंगावर ओरडत असतो कि त्यांच्याशी प्रेमानं, त्यांना समजून घेऊन त्यांच्याशी संवाद साधत असतो? मुलांची आकलनक्षमता उत्तम असेल तर एकवेळ ठीक, पण मुलांचा आयक्यू जर कमी असेल, सर्वसाधारण मुलांपेक्षा त्यांची शिकण्याची गती कमी असेल, तर या मुलांसाठी असं वागणं फारच धोक्याचं ठरू शकतं. कारण त्यांची शिकण्याची क्षमता, इच्छा आणखीच कमी होऊ शकते.मुलांशी कायम त्याच भाषेत बोललं पाहिजे, जी त्यांना समजेल. यावर काही जण असंही म्हणतील, आजकालच्या पोरांना माराचीच भाषा समजते, त्याशिवाय ते वठणीवर येत नाहीत, पण धाकदपटशा कधीच कामाला येत नाही आणि त्याचा फारसा उपयोगही होत नाही. त्या वेळेपुरता कदाचित त्याचा ‘सकारात्मक’ परिणाम दिसू शकेल, पण अंतिमत: मुलांसाठी आणि पालकांसाठीही ते घातकच आहे, असा इशारा संशोधकांनी, अभ्यसकांनीही देऊन ठेवलाय.मुलांचे कोणतेही प्रश्न असोत, ते अगदीच किरकोळ असोत किंवा अवघड, आपल्यालाही न समजणारे.. ते टाळण्यापेक्षा त्यांची योग्य ती उत्तरं मुलांपर्यंतं पोहोचवणं मुलांच्या भवितव्यासाठी फारच उपयुक्त असतात. योग्य ती उत्तरं मुलांना मिळायलाच हवीत.दृष्य प्रतिमा, गोष्टी.. यासारख्या माध्यमांतून जर मुलांना काही गोष्टी समजावता आल्या तर मुलांच्या मनावर त्या लवकर ठसतात आणि त्या त्यांच्या लक्षातही राहतात.मुलांचा, त्यातही लहान मुलांचा आणि ही मुलं जर सर्वसाधारण मुलांपेक्षा कमी आयक्यू असलेली असतील, तर त्यांचा अटेन्शन स्पॅन, म्हणजे लक्ष एकाग्र करण्याची क्षमता खूपच कमी असते. त्यासाठी त्यांचे लक्ष एकाग्र करता येऊ शकतील अशा गोष्टींचा चातुर्यानं वापर केला तर त्यांचा अटेन्शन स्पॅनही वाढू शकतो.कोणतीही गोष्ट घाईघाईनं शिकवण्यापेक्षा सोप्याकडून अवघडकडे असाच प्रवास असला पाहिजे. काठिण्यपातळी हळूहळू वाढवत नेली पाहिजे.ज्यांची शैक्षणिक गती कमी आहे, ज्यांचा कमी आयक्यू आहे, अशा मुलांना बºयाचदा आपल्या बुटाच्या नाड्याही व्यवस्थित बांधता येत नाहीत. पण त्यावर चिडण्यापेक्षा त्यांची ही क्षमता विकसित करून मग तुलनेनं अधिक गोष्टी शिकवण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यासाठी संयम हवा आणि चिकाटीही. त्याला पर्याय नाही.