शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

या मुलांना ‘शिकवायचं’ तरी कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 13:01 IST

संयम आणि चिकाटीबरोबर पालकांकडे या गोष्टही हव्यात..

ठळक मुद्देमुलांचे प्रश्न कोणतेही असोत, योग्य ती उत्तरं मुलांना मिळायलाच हवीत.दृष्य प्रतिमा, गोष्टी.. यासारख्या माध्यमांतून जर मुलांना काही गोष्टी समजावता आल्या तर मुलांच्या मनावर त्या लवकर ठसतात आणि त्या त्यांच्या लक्षातही राहतात.लक्ष एकाग्र करता येऊ शकतील अशा गोष्टींचा चातुर्यानं वापर केला तर मुलांचा अटेन्शन स्पॅन वाढू शकतो.कोणतीही गोष्ट घाईघाईनं शिकवण्यापेक्षा सोप्याकडून अवघडकडे असाच प्रवास असला पाहिजे. काठिण्यपातळी हळूहळू वाढवत नेली पाहिजे.

- मयूर पठाडेआपल्या मुलांशी आपण कसं बोलतो? कायम वसावसा त्यांच्या अंगावर ओरडत असतो कि त्यांच्याशी प्रेमानं, त्यांना समजून घेऊन त्यांच्याशी संवाद साधत असतो? मुलांची आकलनक्षमता उत्तम असेल तर एकवेळ ठीक, पण मुलांचा आयक्यू जर कमी असेल, सर्वसाधारण मुलांपेक्षा त्यांची शिकण्याची गती कमी असेल, तर या मुलांसाठी असं वागणं फारच धोक्याचं ठरू शकतं. कारण त्यांची शिकण्याची क्षमता, इच्छा आणखीच कमी होऊ शकते.मुलांशी कायम त्याच भाषेत बोललं पाहिजे, जी त्यांना समजेल. यावर काही जण असंही म्हणतील, आजकालच्या पोरांना माराचीच भाषा समजते, त्याशिवाय ते वठणीवर येत नाहीत, पण धाकदपटशा कधीच कामाला येत नाही आणि त्याचा फारसा उपयोगही होत नाही. त्या वेळेपुरता कदाचित त्याचा ‘सकारात्मक’ परिणाम दिसू शकेल, पण अंतिमत: मुलांसाठी आणि पालकांसाठीही ते घातकच आहे, असा इशारा संशोधकांनी, अभ्यसकांनीही देऊन ठेवलाय.मुलांचे कोणतेही प्रश्न असोत, ते अगदीच किरकोळ असोत किंवा अवघड, आपल्यालाही न समजणारे.. ते टाळण्यापेक्षा त्यांची योग्य ती उत्तरं मुलांपर्यंतं पोहोचवणं मुलांच्या भवितव्यासाठी फारच उपयुक्त असतात. योग्य ती उत्तरं मुलांना मिळायलाच हवीत.दृष्य प्रतिमा, गोष्टी.. यासारख्या माध्यमांतून जर मुलांना काही गोष्टी समजावता आल्या तर मुलांच्या मनावर त्या लवकर ठसतात आणि त्या त्यांच्या लक्षातही राहतात.मुलांचा, त्यातही लहान मुलांचा आणि ही मुलं जर सर्वसाधारण मुलांपेक्षा कमी आयक्यू असलेली असतील, तर त्यांचा अटेन्शन स्पॅन, म्हणजे लक्ष एकाग्र करण्याची क्षमता खूपच कमी असते. त्यासाठी त्यांचे लक्ष एकाग्र करता येऊ शकतील अशा गोष्टींचा चातुर्यानं वापर केला तर त्यांचा अटेन्शन स्पॅनही वाढू शकतो.कोणतीही गोष्ट घाईघाईनं शिकवण्यापेक्षा सोप्याकडून अवघडकडे असाच प्रवास असला पाहिजे. काठिण्यपातळी हळूहळू वाढवत नेली पाहिजे.ज्यांची शैक्षणिक गती कमी आहे, ज्यांचा कमी आयक्यू आहे, अशा मुलांना बºयाचदा आपल्या बुटाच्या नाड्याही व्यवस्थित बांधता येत नाहीत. पण त्यावर चिडण्यापेक्षा त्यांची ही क्षमता विकसित करून मग तुलनेनं अधिक गोष्टी शिकवण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यासाठी संयम हवा आणि चिकाटीही. त्याला पर्याय नाही.