शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना चांगल्या सवयी ‘आपोआप’ कशा काय लागतील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 15:23 IST

त्यात ‘कष्ट’ नाही, आनंद मात्र खूप आहे..

ठळक मुद्देमूल लहान असतानाच काही सवयी त्यांच्या अंगी बानवल्या पाहिजेत. आपण चांगल्या सवयींचा आग्रह का धरतो आहोेत, हेही मुलांना कळलं पाहिजे.मुलांनी चांगल्या गोष्टी केल्या की त्याचं बक्षीसही त्यांना लगेच मिळालं पाहिजे. शाबासकी देणं, त्यांचा पापा घेणं. प्रेमानं त्यांना मिठी मारणं, प्रोत्साहन म्हणून अगदी छोटीशी भेट कधीतरी देणं.. या गोष्टी मुलांसाठी जास्त प्रेरणादायी ठरतात.मुलांच्या प्रत्येक गोष्टीत पालकांनी इन्व्हॉल्व्ह असणं खूप महत्त्वाचं आहे.

- मयूर पठाडेया मुलांना वळण लावायचं तरी कसं? प्रत्येक पालकापुढे आज हा महत्त्वाचा प्रश्न असतो. याच प्रश्नानं ते वैतागलेलेही दिसतात. कारण प्रत्येक पालकाची तक्रार असते, मुलं अज्जिबात ऐकत नाहीत..मुलं ऐकत नाहीत.. हे कारण तसं म्हटलं तर फसवं आहे. कारण आपण अचानक कधीतरी उठतो आणि मुलांना शिस्त, सवयी लावायला पाहतो. कोणतीही गोष्ट अशी अचानक कधीच होत नाही. त्यासाठी ती अगोदर ‘मुरू’ द्यावी लागते. हळूहळू मग तशा सवयी अंगी रुळत जातात.मुलांना चांगल्या सवयी लावायच्या तर त्याला फार कष्ट लागतात असं नाही, पण त्यात कमालीचं सातत्य मात्र लागतं. तेवढं केलं तर मुलांना चांगल्या सवयी आपोआप लागतील.मुलांना कशा लावायच्या चांगल्या सवयी?१- मूल लहान असतानाच काही सवयी त्यांच्या अंगी बानवल्या पाहिजेत. अगदी कडेकोट शिस्त नाही, पण मुलांचा खेळण्याचा वेळ, स्क्रिनसमोरचा वेळ, अभ्यास किंवा इतर काही गोष्टी शिकण्यासाठीचा वेळ.. किमान ढोबळमानानं तरी ठरवून दिला पाहिजे. त्यासाठी अगदी दांडपट्टा घेऊन बसण्याची गरज नाही, पण सर्व गोष्टी होताहेत की नाहीत, याचा आग्रह पालकांनी धरला पाहिजे.२- आपण चांगल्या सवयींचा आग्रह का धरतो आहोेत, हेही मुलांना कळलं पाहिजे. त्याचे फायदे त्यांच्या लक्षात आणून दिले पाहिजेत. मुलांनाही मग हळूहळू त्याचं महत्त्व पटत जातं.३- मुलांनी चुकीच्या गोष्टी केल्या म्हणजे आपण त्यांना रागवतो, पण त्यांनी काही चांगल्या गोष्टी केल्या की त्याचं बक्षीसही त्यांना लगेच मिळालं पाहिजे. बक्षीस म्हणजे कुठली महागडी वस्तूच त्यांना आणून दिली पाहिजे असं नाही किंबहुना तसं करूही नये. पण मुलांच्या चांगल्या वागणुकीबद्दल त्यांना शाबासकी देणं, त्यांचा पापा घेणं. प्रेमानं त्यांना मिठी मारणं, प्रोत्साहन म्हणून अगदी छोटीशी भेट कधीतरी देणं.. या गोष्टी मुलांसाठी जास्त प्रेरणादायी ठरतात.४- मुलांच्या प्रत्येक गोष्टीत पालक म्हणून आपण इन्व्हॉल्व्ह असणं खूप महत्त्वाचं असतं. आपलं मूल शाळेतून आल्यावर त्याच्याजवळ बसून शाळेत आज काय काय झालं, तो काय शिकला हे त्याला विचारलं पाहिजे. आपण जे काही करतोय, त्यात आपल्या पालकांना रस आहे हे मुलांनाही कळलं पाहिजे. आपल्या मुलांचे मित्र कोण आहेत, कसे आहेत, घराबाहेर मुलगा काय करतो, यावर अगदी पाळत नाही ठेवली तरी आपलं मूल घरात आणि घराबाहेर काय करतं याकडे पालकांचं सकारात्मक लक्ष असलं पाहिजे.अशा काही गोष्टी केल्या तर मुलांना नक्कीच चांगल्या सवयी लागू शकतील. काहींना हे कष्टाचं काम वाटत असेल, पण एकदा का तुम्ही मुलांमध्ये रमलात की या साºया गोष्टी आनंदाच्या होऊन जातात.