शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

मुलांना चांगल्या सवयी ‘आपोआप’ कशा काय लागतील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 15:23 IST

त्यात ‘कष्ट’ नाही, आनंद मात्र खूप आहे..

ठळक मुद्देमूल लहान असतानाच काही सवयी त्यांच्या अंगी बानवल्या पाहिजेत. आपण चांगल्या सवयींचा आग्रह का धरतो आहोेत, हेही मुलांना कळलं पाहिजे.मुलांनी चांगल्या गोष्टी केल्या की त्याचं बक्षीसही त्यांना लगेच मिळालं पाहिजे. शाबासकी देणं, त्यांचा पापा घेणं. प्रेमानं त्यांना मिठी मारणं, प्रोत्साहन म्हणून अगदी छोटीशी भेट कधीतरी देणं.. या गोष्टी मुलांसाठी जास्त प्रेरणादायी ठरतात.मुलांच्या प्रत्येक गोष्टीत पालकांनी इन्व्हॉल्व्ह असणं खूप महत्त्वाचं आहे.

- मयूर पठाडेया मुलांना वळण लावायचं तरी कसं? प्रत्येक पालकापुढे आज हा महत्त्वाचा प्रश्न असतो. याच प्रश्नानं ते वैतागलेलेही दिसतात. कारण प्रत्येक पालकाची तक्रार असते, मुलं अज्जिबात ऐकत नाहीत..मुलं ऐकत नाहीत.. हे कारण तसं म्हटलं तर फसवं आहे. कारण आपण अचानक कधीतरी उठतो आणि मुलांना शिस्त, सवयी लावायला पाहतो. कोणतीही गोष्ट अशी अचानक कधीच होत नाही. त्यासाठी ती अगोदर ‘मुरू’ द्यावी लागते. हळूहळू मग तशा सवयी अंगी रुळत जातात.मुलांना चांगल्या सवयी लावायच्या तर त्याला फार कष्ट लागतात असं नाही, पण त्यात कमालीचं सातत्य मात्र लागतं. तेवढं केलं तर मुलांना चांगल्या सवयी आपोआप लागतील.मुलांना कशा लावायच्या चांगल्या सवयी?१- मूल लहान असतानाच काही सवयी त्यांच्या अंगी बानवल्या पाहिजेत. अगदी कडेकोट शिस्त नाही, पण मुलांचा खेळण्याचा वेळ, स्क्रिनसमोरचा वेळ, अभ्यास किंवा इतर काही गोष्टी शिकण्यासाठीचा वेळ.. किमान ढोबळमानानं तरी ठरवून दिला पाहिजे. त्यासाठी अगदी दांडपट्टा घेऊन बसण्याची गरज नाही, पण सर्व गोष्टी होताहेत की नाहीत, याचा आग्रह पालकांनी धरला पाहिजे.२- आपण चांगल्या सवयींचा आग्रह का धरतो आहोेत, हेही मुलांना कळलं पाहिजे. त्याचे फायदे त्यांच्या लक्षात आणून दिले पाहिजेत. मुलांनाही मग हळूहळू त्याचं महत्त्व पटत जातं.३- मुलांनी चुकीच्या गोष्टी केल्या म्हणजे आपण त्यांना रागवतो, पण त्यांनी काही चांगल्या गोष्टी केल्या की त्याचं बक्षीसही त्यांना लगेच मिळालं पाहिजे. बक्षीस म्हणजे कुठली महागडी वस्तूच त्यांना आणून दिली पाहिजे असं नाही किंबहुना तसं करूही नये. पण मुलांच्या चांगल्या वागणुकीबद्दल त्यांना शाबासकी देणं, त्यांचा पापा घेणं. प्रेमानं त्यांना मिठी मारणं, प्रोत्साहन म्हणून अगदी छोटीशी भेट कधीतरी देणं.. या गोष्टी मुलांसाठी जास्त प्रेरणादायी ठरतात.४- मुलांच्या प्रत्येक गोष्टीत पालक म्हणून आपण इन्व्हॉल्व्ह असणं खूप महत्त्वाचं असतं. आपलं मूल शाळेतून आल्यावर त्याच्याजवळ बसून शाळेत आज काय काय झालं, तो काय शिकला हे त्याला विचारलं पाहिजे. आपण जे काही करतोय, त्यात आपल्या पालकांना रस आहे हे मुलांनाही कळलं पाहिजे. आपल्या मुलांचे मित्र कोण आहेत, कसे आहेत, घराबाहेर मुलगा काय करतो, यावर अगदी पाळत नाही ठेवली तरी आपलं मूल घरात आणि घराबाहेर काय करतं याकडे पालकांचं सकारात्मक लक्ष असलं पाहिजे.अशा काही गोष्टी केल्या तर मुलांना नक्कीच चांगल्या सवयी लागू शकतील. काहींना हे कष्टाचं काम वाटत असेल, पण एकदा का तुम्ही मुलांमध्ये रमलात की या साºया गोष्टी आनंदाच्या होऊन जातात.