शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

तुमचं मूल स्पर्धेसाठी, करिअरसाठी खेळ खेळतं कि स्वत:च्या विकासासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 16:03 IST

जरा तपासा.. कदाचित आपणही त्याला त्यासाठी भरीस पाडलं असेल.. त्यात नुकसान सगळ्यांचंच आहे..

ठळक मुद्देआजकाल मुलांच्या बाबतीत भविष्यातील ‘स्पर्धेच्या’, करिअरच्या दृष्टीनं फायदा म्हणूनच पालकांकडून मुलांना स्पोर्टस्साठी आग्रह केला जातो.खेळातून नैसर्गिक पद्धतीनंच मुलांचा विकास झाला पाहिजे.मुलांनी खेळणं अत्यावश्यकच आहे, पण व्यक्तिगत स्पर्धेतून जर खेळाकडे पाहिलं जात असेल, तर त्यामुळे खेळाचं आणि मुलाचंही त्यात नुकसानच आहे.

- मयूर पठाडेतुमची मुलं कुठला खेळ खेळतात? मुळात एखादा खेळ खेळतात का? अर्थातच बरीच मुलं खेळतही असतील, पण मुलांना सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजेत आणि प्रत्येक गोष्टीत ते पुढेच असले पाहिजेत, तसंच खेळांतही त्यांनी पुढेच असलं पाहिजे, स्टेट लेवल, नॅशनल लेवलपर्यंत त्यांनी गेलं पाहिजे, कारण एकतर परीक्षेत त्याचा गुणांसाठी फायदा होतो, न जाणो, कदाचित त्यात गेलाच पुढे, तर भविष्यात सचिन तेंडुलकर, विराट कोहली किंवा सिंधू, सायना नाहीतर कदम्बी श्रीकांतही होईल, त्याचं करिअरच एकदम सुधरुन जाईल म्हणून त्याला तुम्ही एखाद्या स्पोटर््सला ‘टाकताहात’ का?..आजकाल बºयाच मुलांच्या बाबतीत भविष्यातील ‘स्पर्धेच्या’, करिअरच्या दृष्टीनं फायदा म्हणूनच पालकांकडून त्यांना स्पोर्टस्साठी आग्रह केला जातो. मुलांनी खेळणं अत्यावश्यकच आहे, कारण केवळ करिअरसाठी नाही, तर त्यांच्या आयुष्यासाठीही खेळ ही गोष्ट खूपच महत्त्वाची असते. मूल अनेक गोष्टी खेळाच्या माध्यमातूनच शिकत असतं. पण केवळ करिअरच्या दृष्टीनंच त्याकडे पाहिलं आणि त्यासाठीच मुलांच्या मागे दट्ट्या लावला तर त्याचा विपरितही परिणाम होऊ शकते. जी सोशल आणि सामाजिक स्किल्स मुलांनी आत्मसात करावीत, नैसर्गिक पद्धतीनं ती मुल्यं त्यांनी शिकावीत यासाठी खेळाचा आग्रह धरला जातो, ती सामाजिक स्किल्सच चुकीच्या पायावर उभी राहू शकतात. खेळाच्या माध्यमातून एकोपा, समंजसपणा, वैरभाव विसरणं, पराभवातूनही पुन्हा उभं राहण्याची सकारात्मक जिद्द आत्मसात करणं.. यासारखे जे गुण विकसित होतात.. त्यांनाच सुरुंग लागण्याची भीती केवळ करिअरसाठी खेळाची सक्ती करण्यानं होऊ शकते. केवळ मी, मला, मीच जिंकलं पाहिजे, मीच पुढे गेलं पाहिजे, तेही काहीही करुन अशा वृत्तीनं द्वेष, मत्सर, चिडचिडेपणा.. या गोष्टींत वाढच होते.त्यामुळे खेळा जरुर, त्यातल्या स्पर्धेचाही अनुभव जरुर घ्या, पण व्यक्तिगत स्पर्धेतून जर खेळाकडे पाहिलं जात असेल, तर त्यामुळे खेळाचं आणि मुलाचंही त्यात नुकसानच आहे, हे वेळीच लक्षात घ्यायला हवं..