शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तुमचं मूल स्पर्धेसाठी, करिअरसाठी खेळ खेळतं कि स्वत:च्या विकासासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 16:03 IST

जरा तपासा.. कदाचित आपणही त्याला त्यासाठी भरीस पाडलं असेल.. त्यात नुकसान सगळ्यांचंच आहे..

ठळक मुद्देआजकाल मुलांच्या बाबतीत भविष्यातील ‘स्पर्धेच्या’, करिअरच्या दृष्टीनं फायदा म्हणूनच पालकांकडून मुलांना स्पोर्टस्साठी आग्रह केला जातो.खेळातून नैसर्गिक पद्धतीनंच मुलांचा विकास झाला पाहिजे.मुलांनी खेळणं अत्यावश्यकच आहे, पण व्यक्तिगत स्पर्धेतून जर खेळाकडे पाहिलं जात असेल, तर त्यामुळे खेळाचं आणि मुलाचंही त्यात नुकसानच आहे.

- मयूर पठाडेतुमची मुलं कुठला खेळ खेळतात? मुळात एखादा खेळ खेळतात का? अर्थातच बरीच मुलं खेळतही असतील, पण मुलांना सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजेत आणि प्रत्येक गोष्टीत ते पुढेच असले पाहिजेत, तसंच खेळांतही त्यांनी पुढेच असलं पाहिजे, स्टेट लेवल, नॅशनल लेवलपर्यंत त्यांनी गेलं पाहिजे, कारण एकतर परीक्षेत त्याचा गुणांसाठी फायदा होतो, न जाणो, कदाचित त्यात गेलाच पुढे, तर भविष्यात सचिन तेंडुलकर, विराट कोहली किंवा सिंधू, सायना नाहीतर कदम्बी श्रीकांतही होईल, त्याचं करिअरच एकदम सुधरुन जाईल म्हणून त्याला तुम्ही एखाद्या स्पोटर््सला ‘टाकताहात’ का?..आजकाल बºयाच मुलांच्या बाबतीत भविष्यातील ‘स्पर्धेच्या’, करिअरच्या दृष्टीनं फायदा म्हणूनच पालकांकडून त्यांना स्पोर्टस्साठी आग्रह केला जातो. मुलांनी खेळणं अत्यावश्यकच आहे, कारण केवळ करिअरसाठी नाही, तर त्यांच्या आयुष्यासाठीही खेळ ही गोष्ट खूपच महत्त्वाची असते. मूल अनेक गोष्टी खेळाच्या माध्यमातूनच शिकत असतं. पण केवळ करिअरच्या दृष्टीनंच त्याकडे पाहिलं आणि त्यासाठीच मुलांच्या मागे दट्ट्या लावला तर त्याचा विपरितही परिणाम होऊ शकते. जी सोशल आणि सामाजिक स्किल्स मुलांनी आत्मसात करावीत, नैसर्गिक पद्धतीनं ती मुल्यं त्यांनी शिकावीत यासाठी खेळाचा आग्रह धरला जातो, ती सामाजिक स्किल्सच चुकीच्या पायावर उभी राहू शकतात. खेळाच्या माध्यमातून एकोपा, समंजसपणा, वैरभाव विसरणं, पराभवातूनही पुन्हा उभं राहण्याची सकारात्मक जिद्द आत्मसात करणं.. यासारखे जे गुण विकसित होतात.. त्यांनाच सुरुंग लागण्याची भीती केवळ करिअरसाठी खेळाची सक्ती करण्यानं होऊ शकते. केवळ मी, मला, मीच जिंकलं पाहिजे, मीच पुढे गेलं पाहिजे, तेही काहीही करुन अशा वृत्तीनं द्वेष, मत्सर, चिडचिडेपणा.. या गोष्टींत वाढच होते.त्यामुळे खेळा जरुर, त्यातल्या स्पर्धेचाही अनुभव जरुर घ्या, पण व्यक्तिगत स्पर्धेतून जर खेळाकडे पाहिलं जात असेल, तर त्यामुळे खेळाचं आणि मुलाचंही त्यात नुकसानच आहे, हे वेळीच लक्षात घ्यायला हवं..