शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

मुलांची बलस्थानं तुम्हाला माहीत आहेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 12:58 IST

नंतर डोक्याला कटकट होण्यापेक्षा आत्ताच घ्या समजून..

ठळक मुद्देआपल्या मुलाची बलस्थानं आणि कमजोरी माहीत करून घ्या. मुलांची बलस्थानं एकदा लक्षात आली की त्याचाच वापर करून त्यांच्या कमजोरींवरही मात करता येऊ शकते.आपलं मूल व्हिज्युअल लर्नर आहे कि आॅडिटरी लर्नर आहे.. त्याला पाहून जास्त कळतं, ऐकून कि लिहून?.. हे एकदा कळलं की खूप गोष्टी सोप्या होतात.मूल कोणत्याही प्रकारचं असो, पालक म्हणून तुम्हाला खूप संयम ठेवावा लागतो आणि मूल जसं आहे तसं त्याला स्वीकारण्याची हिंमतही ठेवावी लागते.

- मयूर पठाडेमूल कोणत्याही प्रकारचं असो, बुद्धिमान, सर्वसाधारण किंवा गतिमंद. पालकांना काही गोष्टी कराव्याच लागतात. जेव्हा मूल कमी बुद्धिमान असेल, त्याची आकलनक्षमता, आयक्यू जर कमी असेल, अशावेळी तर पालकांची कसोटीच लागते. त्यामुळे आपलं मूल कसं आहे हे आधी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार मग प्रयत्न केले पाहिजेत.आपल्या मुलाचा आयक्यू जर सर्वसाधारण पातळीपेक्षा कमी असेल तर पालकांना मग जास्तच जागरूक राहावं लागतं.त्यासाठी काय करायचं? सर्वच पालकांसाठी, त्यातही कमी आकलनक्षमता असलेल्या मुलांसाठी खाली दिलेल्या टिप्स खूपच महत्त्वाच्या आहेत.आपल्या मुलाचे स्ट्रॉँग पॉर्इंट्स आणि विक पॉर्इंट्स अगोदर शोधा आणि मग त्याप्रमाणे आपली कृती करा. मुलांची बलस्थानं एकदा लक्षात आली की त्याचाच वापर करून मग त्यांच्या कमजोरींवरही मात करता येऊ शकते.आपलं मूल कोणत्या प्रकारचं आहे, म्हणजे त्याची तो व्हिज्युअल लर्नर आहे कि आॅडिटरी लर्नर आहे.. त्याला पाहून जास्त कळतं, ऐकून कि लिहून?.. हे एकदा कळलं की खूप गोष्टी सोप्या होतात.एक गोष्ट मात्र एकदम नक्की, तुमचं मूल कोणत्याही प्रकारचं असो, ते अगदी बुद्धिवान असो वा गतिमंद, पालक म्हणून तुम्हाला खूप संयम ठेवावा लागतो, मुलांना समजून घ्यावं लागतं आणि आपलं मूल जसं आहे तसं त्याला स्वीकारण्याची हिंमतही ठेवावी लागते. या गोष्टी सांगायला सोप्या, पण अनुकरण करायला निश्चितच अवघड आहेत, पण त्यासाठीचे प्रयत्न पालकांना करायलाच हवेत.अनेकदा आपण मुलांवर ओरडतो, एकच गोष्ट किती वेळा तुला सांगायची? कळत नाही का?.. खरं तर चांगल्या गोष्टी मुलांवर बिंबवायच्या असतील आणि त्या त्यांच्या अंगवळणी पाडायच्या असतील, तर मुलांना वारंवार आणि प्रेमानं, त्यांना समजून घेवून सांगणं गरजेचंच आहे. या गोष्टी कल्या तर मूल आणि पालक यांच्यातील नातेसंबंधांचा गोडवा कायम बहरत राहील.