शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

लग्न आॅनलाइन ठरवलं पण खात्रीचं काय?

By admin | Updated: April 4, 2017 15:54 IST

मॉर्डन स्वरूपाचे विवाह प्रस्ताव ही आता आपली लाइफ स्टाइल झाली आहे. पण म्हणून आॅनलाइन जोडीदार निवडून बिनधास्त लग्न करावं असं नाही. लग्नातले पाहण्या निरखण्याचे नियम इथेही आहेतच, पण थोडे वेगळे !

मॉर्डन स्वरूपाचे विवाह प्रस्ताव ही आता आपली लाइफ स्टाइल झाली आहे. पण म्हणून आॅनलाइन जोडीदार निवडून बिनधास्त लग्न करावं असं नाही. लग्नातले पाहण्या निरखण्याचे नियम इथेही आहेतच, पण थोडे वेगळे !

- आधुनिक प्रकारचे विवाह प्रस्ताव हे आजच्या बदलत्या जीवनशैलीचा एक परिणाम आहे हे खरं. बदलत्या जीवनशैलीबरोबर आपल्या लग्नपद्धतीही बदलल्या. तद्वत फेसबुकसारख्या समाजमाध्यमावर ओळख होऊन जुळलेले लग्न हा एक नवीन प्रकार आपल्या जीवनात रूढ होऊ पाहतोय. फेसबुक, इन्स्ट्राग्राम, व्हॉट्सअ‍ॅप यासारखी समाजमाध्यमं ही दैनंदिन जीवनातील नित्याची बाब झाली आहे. समाजमाध्यमं हाताळताना ओळख नसलेल्या नव-नवीन लोकांच्या संपर्कात येणं अपरिहार्य झालं आहे. आॅनलाइन ओळखीवरून ठरवलेल्या लग्नाला प्रतिष्ठा आणि स्टेटस मिळत आहे. पण यामुळे नात्यांमध्येही काही प्रश्न आणि तणाव निर्माण होत आहे. जितक्य जबाबदारीनं मुलं मुली स्वत:चा आॅनलाइन जोडीदार निवडतात तितक्याच जबाबदारीनं एकमेकांची खात्री करून ती आपल्या आई बाबांनाही वाटेल यासाठीचे मार्ग मुला मुलींनी जबाबदारीनं शोधायला हवेत. आणि आपली ही आॅनलाइन पसंती आपल्या आई बाबांना पटवून देताना मुल मुली आपण निवडलेल्या जोडीदाराला परत एकदा पारखू शकता. आपल्यासाठी तो /ती जोडीदार म्हणून योग्य आहे ना याची खात्री आई बाबांना देता देता ती स्वत:लाही नव्यानं होवू शकते. आॅनलाइन लग्न ठरवताना मुला मुलींनी हा विषय नीट समजून घेऊन काही नियम पाळायला हवेत. आॅनलाइन लग्न ठरवताना..*आॅनलाइन लग्न ठरवताना आपण निवडलेल्या जोडीदाराचे कोणते गुण पाहिलेत. त्याच्यातले दोष कोणते याबाबत आई बाबांना माहिती द्यावी. * आपण जोडीदार निवडून लग्न करण्याचा जो निर्णय घेतला या दरम्यानची स्वत:ची विचारप्रक्रिया काय होती, कोणत्या प्रोसेसमधून आपल्या तो /ती जोडीदार म्हणून आवडला किंव आवडली हे आई बाबांना नीट समजावून सांगावं. * एकमेकांबद्दल कोणती माहिती, कशी आणि कुठून मिळवली याबाबत आई बाबांना सविस्तर सांगावं. * मुला मुलींनी आई बाबांना आपल्या फेसबुक पेजवर आणि अकाऊंटवर नेवून आपण परस्परांना शेअर केलेली माहिती वाचावयास द्यावी. दोन्हीकडचे कॉमन फ्रेंडस बघून त्यातील आई बाबांना हवे असलेल्यांचे नंबर द्यावेत. आई बाबांनी अशा कॉमन फ्रेंडसना फोन करून निवडलेल्या मुला/मुलीविषयी काही माहिती घ्यायची असेल तर चिडचिड न करता. त्याला विरोध न करता आई बाबांना ते करू द्यावं. आई बाबा ते का करता आहेत हे हवं तर त्यांच्याशी शांतपणे बोलून समजून घ्यावं. * आई बाबांना जर मुलांनी निवडलेल्या जोडीदाराच्या घरी जावून त्याची पाशर््वभूमी समजून घ्यायची असेल तर त्यांना ते अवश्य करू द्यावं. उलट स्वत: पुढाकार घेवून मुला मुलींनी परस्परांच्या आई वडिलांना एकमेकांच्या घरी बोलायला आमंत्रित करायला हवं. * आई बाबांना प्रत्यक्ष भेटीत आपण निवडलेला जोडीदार कसा वाटला याबाबतची त्यांची मतं त्यांच्याशी शांतपणे बोलून समजून घ्यावीत. काही विरोधी मतं असतील तर ती तशी का? हे थोडा वेळ घेवून स्वत:ही ती तपासून पहावीत. आपल्याला मिळालेली माहिती आणि आई बाबांना मिळालेली माहिती यात काही फरक आहे का? कोणता? का? याबाबतही मुलांनी थोडी जागरूकता दाखवून खात्री करून घ्यावी.* आपण निवडलेल्या जोडीदाराबद्दल जर आई बाबांची लवकर खात्री पटत नसेल तर मुलांनी थोडा धीर धरावा. आई बाबांना त्यांचा वेळ घेवू द्यावा. त्यांना त्यांचा निर्णय देण्यासाठी घाई करू नये. * आॅनलाइन निवडलेल्या जोडीदाराशी प्रत्यक्ष लग्न ठरल्यानंतर जर आई बाबांना किंवा स्वत: मुला मुलींना काही शंका आल्यास थोडं थांबून घेवून मनातली शंका आधी दूर करावी. * लग्न ही जबाबदारीनंच ठरवण्याची गोष्ट आहे, भेट कुठं झाली यापेक्षा अनुरुपता तपासून पाहणं जास्त महत्वाचं आहे.