शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

आपण आहात मुलांचे ‘रोल मॉडेल’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 15:26 IST

बघा, बरं जरा स्वत:ला तपासून..

ठळक मुद्देआपण जसे बोलू, जसे वागू तसाच संस्कार मुलांवर नकळतपणे होत असतो. त्यामुळे आपणच त्यांचे रोल मॉडेल असतो.मुलांना जर लहानपणापासून चांगल्या मॅनर्सची सवय लावली, तर तेही त्याचं अनुकरण करतात.वाचनसंस्कार ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक गोष्टी मुलं वाचनातून शिकतात.

- मयूर पठाडेमुलांच्या बाबतीत आपल्याकडे नेहमी दोन गोष्टी दिसतात. एकतर त्यांचे अति लाड, अति कौतुक नाहीतर मग प्रत्येक गोष्टीत त्यांना घालून पाडून बोलायचं. तुला अक्कलच नाही, एवढीशी गोष्ट सांगितली तरी कळत नाही.. तुला किती वेळा सांगायचं?.. अशी वाक्यं पालकांच्या तोंडून कायम निघत असतात. पण अशी वाक्यं मुलांसाठी खूपच घातक असतात, हे पालकांच्या लक्षातच येत नाही. काहींना वाटतं, रागावल्याशिवाय त्यांना कळतच नाही. त्याशिवाय ते वठणीवर येतच नाहीत.. पण मुलांना चांगल्या सवयी लावायच्या असतील, त्यांनी तुमचं ऐकावं, चांगल्याच गोष्टी कराव्यात, असं तुम्हाला वाटत असेल, तर त्यांना रागवण्यापेक्षा आणखीही काही गोष्टी आहेतच की.बघा, त्यांचा वापर करून. मुलांना चांगल्या सवयी नक्की लागतील. गेल्या भागात आपण त्याविषयी बोललो होतो, आता या आणखी काही गोष्टी.. आपल्या मुलांसाठी आणि आपल्यासाठीही..मुलांना चांगल्या सवयी कशा लागतात?१- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली मुलं ही ‘आपली’च असतात. ती आपलंच अनुकरण करीत असतात. आपण जसे बोलू, जसे वागू तसाच संस्कार त्यांच्यावर नकळतपणे होत असतो. त्यामुळे आपणच त्यांचे रोल मॉडेल असतो. हे रोल मॉडेल चांगलंच असलं पाहिजे याची काळजी आपण घेणं नितांत गरजेचं आहे. कारण आपण घरात जसे वागतो, त्याचंच अनुकरण मूल करीत असतं. त्यासाठी अगोदर आपली वागणूक आदर्श अशीच असली पाहिजे.२- मुलांना जर लहानपणापासून चांगल्या मॅनर्सची सवय लावली, तर तेही त्याचं अनुकरण करतात. साध्या साध्या गोष्टी.. थॅँक्यू, वेलकम, सॉरी.. हे किती साधे शब्द.. पण आपण ते घरात किती वेळा वापरतो? आपलं चुकलं तर किती वेळा ते आपण मान्य करतो, प्रत्येक लहान सहान गोष्टीत किती वेळा आपण दुसºयाचे आभार मानतो? आपण जर या गोष्टी करीत असलो, तर मुलंही आपोआपच या गोष्टी शिकतात.३- वाचनसंस्कार ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक गोष्टी मुलं वाचनातून शिकतात. मुलांना अगदी वाचता येत नसलं तरी त्यांना पुस्तकातल्या गोष्टी वाचून दाखवणं, त्याचा अर्थ सांगतानाच, त्यांना गंमतही वाटेल अशा पुस्तकांची निवड करणं, पुस्तकं कायम मुलांच्या अवतीभोवती असतील असं वातावरण निर्माण करणं, आपण स्वत:ही त्यात रमणं.. या गोष्टी मुलांवर उत्तम संस्कार करतात. अनेक गोष्टी आज इंटरनेट, टीव्हीवर उपलब्ध असल्या, तरी त्यासोबत वाचनाची गोडीही मुलांना लावणं महत्त्वाचं आहे.४- आपलं मूल प्रत्येकालाच आवडतं. त्यामुळे जे आपल्याला मिळालं नाही, ती ती प्रत्येक गोष्ट आपल्या मुलाला मिळाली पाहिजे असंही अनेक पालकांना वाटत असतं, त्यात वाईट काही नाही, पण ‘नकाराचा’ अर्थही मुलांना समजला पाहिजे. कोणती गोष्ट आपल्याला मिळेल आणि कितीही हट्ट धरला तरी एखादी गोष्ट मिळणार नाही म्हणजे नाही, हेही मुलांना कळलं पाहिजे. पण त्या ‘नाही’मध्येही तारतम्य असलं पाहिजे.अशा या काही साध्या, सोप्या गोष्टी, त्या आपण स्वत: करतानाच मुलांमध्येही त्याची आवड निर्माण करता येते. चांगल्या सवयी अशा आपोआप अंगी बानवल्या जातात. त्या कुठे विकत मिळत नाहीत आणि त्यासाठी शोधाशोधही करावी लागत नाही. त्या आपल्याच आसपास विखुरलेल्या असतात..