शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता चौपदरीकरणामुळे जिल्हा परिषदेला फटका, कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 11:08 IST

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदीकरणामध्ये जिल्हा परिदेषदेचे सुमारे २ कोटी ६७ लाख ३५ हजार ४८९ रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, अजूनही जिल्हा परिषदेच्या काही शाळांच्या इमारतींचे मुल्यांकन झालेले नाही. त्यामुळे या नुकसानामध्ये आणखी कोट्यवधी रुपयांची भर पडणार आहे.

ठळक मुद्देनिम्म्याहून अधिक रकमेची प्रतीक्षा, अजूनही काही इमारतींच्या मूल्यांकनाची प्रतीक्षाच शासनाकडून नुकसानाचे कोट्यवधी रुपये येणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचेही नुकसान

रत्नागिरी : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदीकरणामध्ये जिल्हा परिदेषदेचे सुमारे २ कोटी ६७ लाख ३५ हजार ४८९ रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, अजूनही जिल्हा परिषदेच्या काही शाळांच्या इमारतींचे मुल्यांकन झालेले नाही. त्यामुळे या नुकसानामध्ये आणखी कोट्यवधी रुपयांची भर पडणार आहे.मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम सध्या जोरात सुरु आहे. या चौपदरीकरणामध्ये अनेक घरे, रस्त्याच्या कडेची मोठमोठी झाडे, दुकाने आणि टपऱ्याही उद्ध्वस्त होणार आहेत. या चौपदरीकरणाला अनेक ठिकाणी विरोध झाला. त्यामुळे शासनाकडूनही मोबदल्याच्या रुपाने नुकसानग्रस्तांना त्या प्रमाणातच नुकसान भरपाई देण्यात येत आहे.

चौपदरीकरणामुळे विकासासाला चालना मिळणार असली तरी त्याचा फटका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना बसणार हे निश्चित आहे. या चौपदरीकरणासाठी ठिकठिकाणी मोठमोठे पूल उभारण्यात येत असून, त्यांच्या कामानाही शासनाकडून गती देण्यात आलेली आहे.चौपदरीकरणासाठी जमिनी ताब्यात घेताना गडगे (बांधलेले कुंपण) आणि झाडे तोडण्यात आले आहेत. महामार्गामध्ये येणाऱ्या शाळांसह मंदिरे, दर्गा, घरे, दुकाने व इतर इमारती असलेल्या जमिनींचे भूसंपादन करण्यात आलेले आहे. त्याचा मोबदला शासनाकडून अनेकांना मिळालेला आहे.

या मिळालेल्या मोबदल्यामुळे अनेक कुटुंबीय कोट्यधीश झाले आहेत. महामार्गाच्या कडेला असलेल्या शाळांच्या काही इमारती तोडण्यात आलेल्या असून, अजूनही बऱ्याच शाळांच्या इमारती तोडण्याचे काम सुरु आहे.महामार्गाच्या चौपदरीकरणारमध्ये गेलेल्या अनेक शाळांचे मुल्यांकन झालेले आहे, तर काही शाळांचे मुल्यांकन झालेले नाही. जिल्हा परिषदेचे या चौपदरीकरणामध्ये सुमारे २ कोटी ६७ लाख ३५ हजार ४८९ रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे.

नुकसानापोटी जिल्हा परिषदेला शासनाकडून १ कोटी २७ लाख ९४ हजार ३३७ रुपये प्राप्त झालेले आहेत. उर्वरित रक्कम लवकरच शासनाकडून देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे मुल्यांकन न झालेल्या शाळांची नुकसानभरपाईची रक्कम वाढून त्यामध्ये भर पडणार आहे.जिल्हा परिषदेच्या२० शाळारस्ता चौपदीकरणाचे काम करीत असतानाच जिल्ह्यातील रस्त्याच्या कडेला असलेल्या जिल्हा परिषदेच्या २० शाळांच्या इमारतींचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचेही नुकसान झालेले आहे. महामार्ग चौपदीकरणाच्या कामामध्ये बहुतांश शाळांच्या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी