शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

रस्ता चौपदरीकरणामुळे जिल्हा परिषदेला फटका, कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 11:08 IST

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदीकरणामध्ये जिल्हा परिदेषदेचे सुमारे २ कोटी ६७ लाख ३५ हजार ४८९ रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, अजूनही जिल्हा परिषदेच्या काही शाळांच्या इमारतींचे मुल्यांकन झालेले नाही. त्यामुळे या नुकसानामध्ये आणखी कोट्यवधी रुपयांची भर पडणार आहे.

ठळक मुद्देनिम्म्याहून अधिक रकमेची प्रतीक्षा, अजूनही काही इमारतींच्या मूल्यांकनाची प्रतीक्षाच शासनाकडून नुकसानाचे कोट्यवधी रुपये येणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचेही नुकसान

रत्नागिरी : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदीकरणामध्ये जिल्हा परिदेषदेचे सुमारे २ कोटी ६७ लाख ३५ हजार ४८९ रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, अजूनही जिल्हा परिषदेच्या काही शाळांच्या इमारतींचे मुल्यांकन झालेले नाही. त्यामुळे या नुकसानामध्ये आणखी कोट्यवधी रुपयांची भर पडणार आहे.मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम सध्या जोरात सुरु आहे. या चौपदरीकरणामध्ये अनेक घरे, रस्त्याच्या कडेची मोठमोठी झाडे, दुकाने आणि टपऱ्याही उद्ध्वस्त होणार आहेत. या चौपदरीकरणाला अनेक ठिकाणी विरोध झाला. त्यामुळे शासनाकडूनही मोबदल्याच्या रुपाने नुकसानग्रस्तांना त्या प्रमाणातच नुकसान भरपाई देण्यात येत आहे.

चौपदरीकरणामुळे विकासासाला चालना मिळणार असली तरी त्याचा फटका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना बसणार हे निश्चित आहे. या चौपदरीकरणासाठी ठिकठिकाणी मोठमोठे पूल उभारण्यात येत असून, त्यांच्या कामानाही शासनाकडून गती देण्यात आलेली आहे.चौपदरीकरणासाठी जमिनी ताब्यात घेताना गडगे (बांधलेले कुंपण) आणि झाडे तोडण्यात आले आहेत. महामार्गामध्ये येणाऱ्या शाळांसह मंदिरे, दर्गा, घरे, दुकाने व इतर इमारती असलेल्या जमिनींचे भूसंपादन करण्यात आलेले आहे. त्याचा मोबदला शासनाकडून अनेकांना मिळालेला आहे.

या मिळालेल्या मोबदल्यामुळे अनेक कुटुंबीय कोट्यधीश झाले आहेत. महामार्गाच्या कडेला असलेल्या शाळांच्या काही इमारती तोडण्यात आलेल्या असून, अजूनही बऱ्याच शाळांच्या इमारती तोडण्याचे काम सुरु आहे.महामार्गाच्या चौपदरीकरणारमध्ये गेलेल्या अनेक शाळांचे मुल्यांकन झालेले आहे, तर काही शाळांचे मुल्यांकन झालेले नाही. जिल्हा परिषदेचे या चौपदरीकरणामध्ये सुमारे २ कोटी ६७ लाख ३५ हजार ४८९ रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे.

नुकसानापोटी जिल्हा परिषदेला शासनाकडून १ कोटी २७ लाख ९४ हजार ३३७ रुपये प्राप्त झालेले आहेत. उर्वरित रक्कम लवकरच शासनाकडून देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे मुल्यांकन न झालेल्या शाळांची नुकसानभरपाईची रक्कम वाढून त्यामध्ये भर पडणार आहे.जिल्हा परिषदेच्या२० शाळारस्ता चौपदीकरणाचे काम करीत असतानाच जिल्ह्यातील रस्त्याच्या कडेला असलेल्या जिल्हा परिषदेच्या २० शाळांच्या इमारतींचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचेही नुकसान झालेले आहे. महामार्ग चौपदीकरणाच्या कामामध्ये बहुतांश शाळांच्या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी