शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

रत्नागिरी जिल्ह्यात लसीकरणात झिरो वेस्टेज अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST

रत्नागिरी : काेरोनावरील लसीकरण मोहिमेत डोस वाया जाण्याचे प्रमाण अधिक असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा ...

रत्नागिरी : काेरोनावरील लसीकरण मोहिमेत डोस वाया जाण्याचे प्रमाण अधिक असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी ‘झिरो वेस्टेज’ अभियान हाती घेतले आहे.

कोरोनावरील लसीच्या व्हायलमधील जादाची मात्रा लाभार्थ्यांसाठी वापरली जाणार असून, लसीकरण केंद्रावर १० जण उपस्थित असतील तरच व्हायल फोडाव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच व्हायलमधील जादा मात्रेमुळे अधिक लोकांना लस देता येणार असल्याचे डॉ. जाखड यांनी यावेळी सांगितले. दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे सुरुवातीला लस घेण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाईन नोंदणीही हाऊसफुल्ल होत असल्याने लोकांची धावपळ उडत आहे. सध्या मागणी जास्त आणि लस कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीला व्हायल फोडल्यानंतर लाभार्थी कमी असल्यामुळे डोस वाया जात होते. व्हायल फोडल्यानंतर ते चार तासच वापरू शकतो. डोस वाया जाण्याचे प्रमाण दोन ते तीन टक्के होते. सध्या ते एक टक्क्यापेक्षाही खाली आले आहे. हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जाखड यांच्या सूचनेनुसार ‘झिरो वेस्टेज’ अभियान आखण्यात आले आहे. केरळमध्ये हे अभियान राबविण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात काही ठिकाणी सुरू आहे. रत्नागिरीतही त्याचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. एका व्यक्तीला मात्रा देताना सिरीनमध्ये ०.५ मिली लस भरली जाते. हे करीत असताना एखाद दुसरा थेंब वाया जाण्याची शक्यता असते. कोविशिल्ड लसीच्या व्हायल बनवताना १० टक्के अधिक मात्रा कंपनीतून ठेवण्यात आल्या आहेत. अनेक वेळा एका व्हायलमध्ये १० जणांना मात्रा दिली की एक मात्रा शिल्लक राहते. ती मात्रा वाया जाते. शिल्लक मात्रेचा वापर जादा व्यक्तीसाठी केला तर वाया जाण्याच्या प्रमाणावर नियंत्रण राहील आणि लोकांना लस देता येईल, असा विचार करूनच लसीकरण केंदांना सूचना देण्यात आल्या आहेत.