शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात लसीकरणात झिरो वेस्टेज अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST

रत्नागिरी : काेरोनावरील लसीकरण मोहिमेत डोस वाया जाण्याचे प्रमाण अधिक असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा ...

रत्नागिरी : काेरोनावरील लसीकरण मोहिमेत डोस वाया जाण्याचे प्रमाण अधिक असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी ‘झिरो वेस्टेज’ अभियान हाती घेतले आहे.

कोरोनावरील लसीच्या व्हायलमधील जादाची मात्रा लाभार्थ्यांसाठी वापरली जाणार असून, लसीकरण केंद्रावर १० जण उपस्थित असतील तरच व्हायल फोडाव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच व्हायलमधील जादा मात्रेमुळे अधिक लोकांना लस देता येणार असल्याचे डॉ. जाखड यांनी यावेळी सांगितले. दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे सुरुवातीला लस घेण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाईन नोंदणीही हाऊसफुल्ल होत असल्याने लोकांची धावपळ उडत आहे. सध्या मागणी जास्त आणि लस कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीला व्हायल फोडल्यानंतर लाभार्थी कमी असल्यामुळे डोस वाया जात होते. व्हायल फोडल्यानंतर ते चार तासच वापरू शकतो. डोस वाया जाण्याचे प्रमाण दोन ते तीन टक्के होते. सध्या ते एक टक्क्यापेक्षाही खाली आले आहे. हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जाखड यांच्या सूचनेनुसार ‘झिरो वेस्टेज’ अभियान आखण्यात आले आहे. केरळमध्ये हे अभियान राबविण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात काही ठिकाणी सुरू आहे. रत्नागिरीतही त्याचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. एका व्यक्तीला मात्रा देताना सिरीनमध्ये ०.५ मिली लस भरली जाते. हे करीत असताना एखाद दुसरा थेंब वाया जाण्याची शक्यता असते. कोविशिल्ड लसीच्या व्हायल बनवताना १० टक्के अधिक मात्रा कंपनीतून ठेवण्यात आल्या आहेत. अनेक वेळा एका व्हायलमध्ये १० जणांना मात्रा दिली की एक मात्रा शिल्लक राहते. ती मात्रा वाया जाते. शिल्लक मात्रेचा वापर जादा व्यक्तीसाठी केला तर वाया जाण्याच्या प्रमाणावर नियंत्रण राहील आणि लोकांना लस देता येईल, असा विचार करूनच लसीकरण केंदांना सूचना देण्यात आल्या आहेत.