शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

रत्नागिरी जिल्ह्यात लसीकरणात झिरो वेस्टेज अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST

रत्नागिरी : काेरोनावरील लसीकरण मोहिमेत डोस वाया जाण्याचे प्रमाण अधिक असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा ...

रत्नागिरी : काेरोनावरील लसीकरण मोहिमेत डोस वाया जाण्याचे प्रमाण अधिक असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी ‘झिरो वेस्टेज’ अभियान हाती घेतले आहे.

कोरोनावरील लसीच्या व्हायलमधील जादाची मात्रा लाभार्थ्यांसाठी वापरली जाणार असून, लसीकरण केंद्रावर १० जण उपस्थित असतील तरच व्हायल फोडाव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच व्हायलमधील जादा मात्रेमुळे अधिक लोकांना लस देता येणार असल्याचे डॉ. जाखड यांनी यावेळी सांगितले. दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे सुरुवातीला लस घेण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाईन नोंदणीही हाऊसफुल्ल होत असल्याने लोकांची धावपळ उडत आहे. सध्या मागणी जास्त आणि लस कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीला व्हायल फोडल्यानंतर लाभार्थी कमी असल्यामुळे डोस वाया जात होते. व्हायल फोडल्यानंतर ते चार तासच वापरू शकतो. डोस वाया जाण्याचे प्रमाण दोन ते तीन टक्के होते. सध्या ते एक टक्क्यापेक्षाही खाली आले आहे. हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जाखड यांच्या सूचनेनुसार ‘झिरो वेस्टेज’ अभियान आखण्यात आले आहे. केरळमध्ये हे अभियान राबविण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात काही ठिकाणी सुरू आहे. रत्नागिरीतही त्याचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. एका व्यक्तीला मात्रा देताना सिरीनमध्ये ०.५ मिली लस भरली जाते. हे करीत असताना एखाद दुसरा थेंब वाया जाण्याची शक्यता असते. कोविशिल्ड लसीच्या व्हायल बनवताना १० टक्के अधिक मात्रा कंपनीतून ठेवण्यात आल्या आहेत. अनेक वेळा एका व्हायलमध्ये १० जणांना मात्रा दिली की एक मात्रा शिल्लक राहते. ती मात्रा वाया जाते. शिल्लक मात्रेचा वापर जादा व्यक्तीसाठी केला तर वाया जाण्याच्या प्रमाणावर नियंत्रण राहील आणि लोकांना लस देता येईल, असा विचार करूनच लसीकरण केंदांना सूचना देण्यात आल्या आहेत.