शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

रत्नागिरीतील तरुणांनी साकारले वाळूशिल्प

By admin | Updated: September 9, 2014 23:47 IST

अनोखा उपक्रम : विविध नेत्यांचे वाळूचे अर्धपुतळे

उमेश पाटणकर - रत्नागिरी -रत्नागिरीच्या मांडवी किनारी शहरातील आठ तरुणांनी एकत्र येऊन साकारलेले वालूका शिल्प पाहण्यास गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनंत चतुर्दशीचा मुहूर्त साधून भारतभूमीच्या प्रगतीसाठी हातभार लावणाऱ्या विविध नेत्यांचे वाळूचे अर्धपुतळे गणरायांच्या स्वागतासाठी सज्ज होते.मांडवी येथे राहणाऱ्या तरूणांना काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास नेहमीच लागलेला असतो. गणपती-नवरात्री या कालावधीत शाडूच्या मूर्ती घडवणे, हा यातील काहींचा छंदच. त्यांना आणखी काहींची अशी जोड मिळाली की, त्यातून रत्नागिरीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले. राजेश शिवलकर, अमित पेडणेकर, सुधीर जोशी, अभिषेक शिवलकर, अनिष शिवलकर, अमोल शिवलकर, परेश शिवलकर आणि प्रतीश शिवलकर अशी या तरूणांची नावे आहेत.सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन सुरु असताना हे सर्व मित्र एकत्र आले, अन वाळूशिल्प तयार करण्याचे ठरवले. राष्ट्रपुरुषांचे अर्धपुतळे वाळूत साकारण्याचे ठरले. समुद्रकिनारी शिल्प साकारताना वाऱ्याचा त्रास होणार होता. सोबत पावसाचा माराही होताच. तरीही डगमगून न जाता छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा तयार झाला. अन मागोमाग लोकमान्य टिळक, राणी लक्ष्मीबाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, शहीद भगतसिंग, पंडित जवाहरलाल नेहरु, लालबहादूर शास्त्री, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह दानशूर भागोजीशेठ कीर आदींचे अर्धपुतळे साकारले गेले.वाळूशिल्प सर्वांना पाहता यावे, यासाठी मांडवी धक्क्याच्या दिशेने दर्शनी भागात साकारण्यात आले होते. वाळू शिल्पाला वाऱ्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होत होता. मात्र, पावसाने दिवसभर विश्रांती घेतल्याने सर्व गणेशभक्तांना वाळूशिल्प डोळ्यात साठवता आले.