शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 तरूण मतदार ठरविणार नवा खासदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 22:58 IST

रत्नागिरी : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील १८ ते ४० वयोगटातील तरूणांची ...

रत्नागिरी : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील १८ ते ४० वयोगटातील तरूणांची संख्या सुमारे पाच लाखाच्या आसपास असल्याने या तरूणांच्या मतदानात खासदार कोण, हे ठरविण्याचे सामर्थ्य आहे.मागील काही वर्षात निवडणुकीची टक्केवारी घसरत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मतदारांची नाव नोंदणीसाठी असलेली उदासीनता तसेच प्रत्यक्ष मतदानावेळी असलेली अनुपस्थिती, यामुळे मतदानाची टक्केवारी असमाधानकारक अशी आहे.मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून निवडणूक आयोगाकडून प्रयत्न होत आहेत. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाकडूनही विविध उपक्रम राबविले जात आहेत. गेल्या सप्टेंबरमध्ये जिल्हा प्रशासनाने आयोगाच्या सुचनेनुसार जिल्ह्यात मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम राबविला. यात मतदार यादीतील नावे वगळणे, दुरूस्ती तसेच नव्याने नाव समाविष्ट करणे, या तीन मुद्द्यांवर आधारित हा कार्यक्रम होता. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती करण्यात आली.जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्तिगतरित्या १८ ते १९ या वयोगटातील नवमतदारांशी संपर्क करून त्यांना त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे नवमतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासनाने मतदार जागृती होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविले. त्यामुळे विविध वयोगटातील मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.३१ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदारांच्या संख्येनुसार दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाच विधानसभा मतदार संघाची एकूण मतदार संख्या १३ लाख ९५ हजार ५३८ इतकी आहे. यात १८ ते १९ या वयोगटातील मतदार २६,७७४ इतके आहेत, तर २० ते २९ या वयोगटातील मतदारांची संख्या २ लाख २० हजार ९०३ इतकी आहे. १८ ते ३९ या वयोगटातील मतदारांची संख्या ४ लाख ९९ हजार ४०९ इतकी आहे. म्हणजेच या वयोगटातील मतदार एकूण संख्येच्या ३६ टक्के आहेत. त्यामुळे या मतदारांच्या मतांवर कोण खासदार निवडून येणार, हे ठरणार आहे.त्याचबरोबर ४० ते ५९ या वयोगटातील मतदारांची संख्या ४ लाख ८९ हजार इतकी आहे. त्यामुळे मतदारांची मतेही कोण खासदार होणार, हे ठरण्यासाठी निर्णायक ठरू शकतात. ६० ते ६९ वयोगटातील मतदारांची संख्या १ लाख ५२ हजार ३३७, ७० ते ७९ या वयोगटातील मतदारांची संख्या ९८,८२३, तर ८० वर्षांवरील मतदारांची संख्या ५५,९६८ इतकी आहे.या सर्वच वयोगटातील महिला मतदारांचा विचार करता १८ ते १९ वयोगटात महिला मतदार कमी असल्या तरी त्यापुढील सर्वच वयोगटात महिलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे खासदार निवडीत महिला मतदारांचा वाटाही खूप मोठा असेल, हे निश्चित आहे.उमेदवारांची : भीस्त तरूण मतदारांवरप्रचार यंत्रणांमध्ये तरूणवर्ग उत्साहाने काम करीत असतो. त्यामुळे उमेदवारांचेही विशेष लक्ष तरूण मतदारांवरच असते. यावेळीही सर्वच उमेदवारांनी तरुणांवर लक्ष केंद्रित केले आहे. सोशल मीडियाचा वापर करणारी पिढी सर्वाधिक याच वयोगटातील असल्याने उमेदवारांनीही चाळिशीच्या आतील मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न होत आहेत.महिला मतदारांचीही मते ठरणार निर्णायक...रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या एकूण १४ लाख ४० हजार ९६६ मतदारांपैकी महिला मतदार ७ लाख ३५ हजार ९९७ इतके, तर पुरूष मतदारांची संख्या ७ लाख ५ हजार ३५० इतकी आहे. साहजिकच महिलाची मते खासदार निवडीसाठी निर्णायक ठरणार आहेत.ज्येष्ठही ठरणार श्रेष्ठरत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघातील ७० वर्षापुढील मतदारांची संख्या १,५४,७९१ इतकी आहे. त्यामुळे अनेक पावसाळे पाहिलेल्या या मतदारांवरही उमेदवारांची भिस्त असणार आहे. मात्र, तरीही प्रचारासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना या वयोगटातील ज्येष्ठांना मतदानासाठी बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक