शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

स्वत:च्या साखरपुड्याचे साहित्य घेऊन जाणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:28 IST

लांजा तालुक्यातील कुंभारवाडी येथे ट्रकच्या खाली येऊन झालेल्या अपघातात तरूणाचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकी ट्रकच्या चाकाखाली अडकून पडली ...

लांजा तालुक्यातील कुंभारवाडी येथे ट्रकच्या खाली येऊन झालेल्या अपघातात तरूणाचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकी ट्रकच्या चाकाखाली अडकून पडली हाेती. (छाया : अनिल कासारे)

लाेकमत न्यूज नेटवर्क

लांजा : आपल्या साखरपुड्याचे साहित्य घेऊन घरी जाणाऱ्या ओशी येथील २२ वर्षीय तरुणाची दुचाकी ट्रकखाली येऊन झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास मुंबई - गोवा महामार्गावर कुंभारवाडी येथे घडली. अक्षय केशव साेलीम (२२, रा. ओशी, लांजा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुदैवाने त्याच्या साेबत असणारा तरुण बचावला आहे.

हरचिरीजवळील ओशी येथील अक्षय केशव सोलीम याचा रविवारी सायंकाळी उपळे येथील मुलीशी साखरपुडा हाेता. साखरपुड्याला लागणारे साहित्य घेण्यासाठी अक्षय दुचाकी डिओ (क्र. एमएच ०८, एडब्लू ९४६६) वरून आपल्याच वाडीतील निलेश वासुदेव घाणेकर याला घेऊन लांजा येथे आला हाेता. वस्तूंची खरेदी करून तो वेगाने घरी निघाला हाेता. लांजा-कुंभारवाडी शिवा मेस्त्री यांच्या गॅरेजच्या पुढे आला असता मुंबईकडे जाणारे प्रथमेश दिनेश सावंत यांच्या इर्टिगा कारला (क्र. एमएच ०१ डीके ८३५७) ओव्हरटेक करीत असताना अक्षयच्या दुचाकीचा आरसा कारला लागून त्याचा ताेल गेला. त्यानंतरही त्याने गाडी सावरण्याचा प्रयत्न केला असता इर्टिगाला दुचाकी घासली गेली. त्याचवेळी उजव्या बाजूने संताेष सत्यवान रसाळ (रा. पूनस) हे ट्रकमध्ये (एमएच ०९, क्यू ५५२९) जांभा चिरा भरून लांजाकडे येत हाेते. इर्टिगा आणि ट्रकमधून आपण जाऊ असे वाटत असतानाच दुचाकी इर्टिगाला घासून ट्रकखाली गेली. यामध्ये अक्षयचा मृत्यू झाला. मागे बसलेला निलेश वासुदेव घाणेकर रस्त्याच्या डाव्या बाजूला फेकला गेल्याने तो बचावला. मात्र त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला व हाताच्या कोपराला किरकोळ दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, उपनिरीक्षक श्वेता पाटील, उपनिरीक्षक प्रशांत जाधव, हेडकाॅन्स्टेबल श्रीकांत जाधव, राजेंद्र कांबळे, तेजस मोरे, दत्ता शिंदे, चालक राजेंद्र देसाई यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता.

चाैकट

संसाराचे स्वप्न अर्धवटच

सात ते आठ महिन्यांपूर्वी अक्षय याने गाडी घेतल्याचे त्याच्या जवळच्या मित्रांनी सांगितले. अक्षयचा रविवारी सायंकाळी उपळे येथील मुलीशी साखरपुडा होता. तर लग्न बुधवार, दि. ७ एप्रिल रोजी होते. दोघांनी संसाराची रंगवलेली स्वप्न अतिघाई केल्याने धुळीला मिळाली. अक्षय याचे आईवडील तसेच मोठा असे छोटे कुटुंब आहे.