शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

स्वत:च्या साखरपुड्याचे साहित्य घेऊन जाणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:28 IST

लांजा तालुक्यातील कुंभारवाडी येथे ट्रकच्या खाली येऊन झालेल्या अपघातात तरूणाचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकी ट्रकच्या चाकाखाली अडकून पडली ...

लांजा तालुक्यातील कुंभारवाडी येथे ट्रकच्या खाली येऊन झालेल्या अपघातात तरूणाचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकी ट्रकच्या चाकाखाली अडकून पडली हाेती. (छाया : अनिल कासारे)

लाेकमत न्यूज नेटवर्क

लांजा : आपल्या साखरपुड्याचे साहित्य घेऊन घरी जाणाऱ्या ओशी येथील २२ वर्षीय तरुणाची दुचाकी ट्रकखाली येऊन झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास मुंबई - गोवा महामार्गावर कुंभारवाडी येथे घडली. अक्षय केशव साेलीम (२२, रा. ओशी, लांजा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुदैवाने त्याच्या साेबत असणारा तरुण बचावला आहे.

हरचिरीजवळील ओशी येथील अक्षय केशव सोलीम याचा रविवारी सायंकाळी उपळे येथील मुलीशी साखरपुडा हाेता. साखरपुड्याला लागणारे साहित्य घेण्यासाठी अक्षय दुचाकी डिओ (क्र. एमएच ०८, एडब्लू ९४६६) वरून आपल्याच वाडीतील निलेश वासुदेव घाणेकर याला घेऊन लांजा येथे आला हाेता. वस्तूंची खरेदी करून तो वेगाने घरी निघाला हाेता. लांजा-कुंभारवाडी शिवा मेस्त्री यांच्या गॅरेजच्या पुढे आला असता मुंबईकडे जाणारे प्रथमेश दिनेश सावंत यांच्या इर्टिगा कारला (क्र. एमएच ०१ डीके ८३५७) ओव्हरटेक करीत असताना अक्षयच्या दुचाकीचा आरसा कारला लागून त्याचा ताेल गेला. त्यानंतरही त्याने गाडी सावरण्याचा प्रयत्न केला असता इर्टिगाला दुचाकी घासली गेली. त्याचवेळी उजव्या बाजूने संताेष सत्यवान रसाळ (रा. पूनस) हे ट्रकमध्ये (एमएच ०९, क्यू ५५२९) जांभा चिरा भरून लांजाकडे येत हाेते. इर्टिगा आणि ट्रकमधून आपण जाऊ असे वाटत असतानाच दुचाकी इर्टिगाला घासून ट्रकखाली गेली. यामध्ये अक्षयचा मृत्यू झाला. मागे बसलेला निलेश वासुदेव घाणेकर रस्त्याच्या डाव्या बाजूला फेकला गेल्याने तो बचावला. मात्र त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला व हाताच्या कोपराला किरकोळ दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, उपनिरीक्षक श्वेता पाटील, उपनिरीक्षक प्रशांत जाधव, हेडकाॅन्स्टेबल श्रीकांत जाधव, राजेंद्र कांबळे, तेजस मोरे, दत्ता शिंदे, चालक राजेंद्र देसाई यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता.

चाैकट

संसाराचे स्वप्न अर्धवटच

सात ते आठ महिन्यांपूर्वी अक्षय याने गाडी घेतल्याचे त्याच्या जवळच्या मित्रांनी सांगितले. अक्षयचा रविवारी सायंकाळी उपळे येथील मुलीशी साखरपुडा होता. तर लग्न बुधवार, दि. ७ एप्रिल रोजी होते. दोघांनी संसाराची रंगवलेली स्वप्न अतिघाई केल्याने धुळीला मिळाली. अक्षय याचे आईवडील तसेच मोठा असे छोटे कुटुंब आहे.