शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

आधार अपडेटसाठी तासनतास थांबावे लागते रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 13:20 IST

adhar Ratnagiri-काही वर्षांपासून आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले असून, सर्वच बाबींसाठी गरज लागत आहे. त्यामुळे आता अगदी नवजात बालकाचेही आधार कार्ड काढावे लागत आहे. त्यातच फोटो, नाव, पत्ता यात सातत्याने बदल करावा लागतो. तसेच पाच वर्षांनंतर पुन्हा आधार कार्ड अपडेट करावे लागत असल्याने आधार केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. परंतु आधार केंद्रांची संख्या कमी असल्याने नागरिकांना तासन‌्तास रांगेत अगदी लहान मुलांना घेऊन रखडावे लागत आहे.

ठळक मुद्देआधार अपडेटसाठी तासनतास थांबावे लागते रांगेतजिल्ह्यात आधार केंद्रांची संख्या अपुरी असल्याने जनतेचे हाल

शोभना कांबळेरत्नागिरी : काही वर्षांपासून आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले असून, सर्वच बाबींसाठी गरज लागत आहे. त्यामुळे आता अगदी नवजात बालकाचेही आधार कार्ड काढावे लागत आहे. त्यातच फोटो, नाव, पत्ता यात सातत्याने बदल करावा लागतो. तसेच पाच वर्षांनंतर पुन्हा आधार कार्ड अपडेट करावे लागत असल्याने आधार केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. परंतु आधार केंद्रांची संख्या कमी असल्याने नागरिकांना तासन‌्तास रांगेत अगदी लहान मुलांना घेऊन रखडावे लागत आहे.सुरुवातीला जेमतेम चार लाखांपर्यंत आधार कार्डचे काम झाले होते. त्यानंतर दुसरी एजन्सी नियुक्त करून आधार कार्ड बहुतांशी लोकांना देण्यात आले. मात्र, त्यानंतरही त्यात सातत्याने नाव, पत्ता बदलणे तसेच बालकांचे नवे आधार कार्ड काढणे यासाठी आधारकेंद्रांची गरज भासते. मात्र, जिल्ह्याच्या सुमारे १८ लाख लोकांसाठी केवळ ९५ आधारकेंद्रे सध्या सुरू आहेत. बंद असलेली केंद्रे सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.का करावे लागते आधार नुतनीकरणशालेय प्रवेश, शिष्यवृत्ती, विविध शासकीय लाभ, बँकांचे व्यवहार, रास्त धान्याच्या लाभासाठी आदी सर्व कारणांसाठी आता आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. पाच वर्षांनंतर आधार कार्ड अपडेट करावे लागते तसेच आधार कार्डवरील फोटो, नाव, पत्ता बदल करण्यासाठी जुने आधार कार्ड अपडेट करावे लागते.

शहरात किंवा ठरावीक ठिकाणीच आधारकेंद्रांची सुविधा उभारलेली आहे. त्यामुळे आम्हाला शहरात यावे लागते. तहसील कार्यालयात एकच आधारकेंद्र असल्याने आम्हाला आधारकार्डमध्ये बदल करावयाचा झाल्यास नाइलाजाने थांबून रहावे लागते.- अनामिका सावंत,गावडेआंबेरे

सरकारने सर्व वयोगटातील नागरिकांसाठी आधारकार्ड सक्तीचे केले आहे. मात्र, आधारकेंद्राची संख्या कमी असल्याने बराच वेळ रांगेत रहावे लागते. लहान मुलांचेही आधारकार्ड काढावे लागत असल्याने त्यासाठी बराच वेळ लागतो. आधारकेंद्रांची संख्या वाढवायला हवी.- संकेत हरमल, कोळंबे

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डRatnagiriरत्नागिरी