शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही आघाडीचे सैनिक नाही, शिवसेनेचे सैनिक -अनंत गीते, वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 13:48 IST

Anant Geete Shiv Sena Ratnagiri- राज्यात असलेल्या तीन पक्षांच्या आघाडी सरकारमुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मात्र, हे सरकार केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहे, असे स्पष्ट करून आपण शिवसैनिक आहोत, आघाडी सैनिक नाही आहोत, असे विधान माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार अनंत गीते यांनी केले. शिवसेना नेते अनंत गीते यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

ठळक मुद्देतुम्ही आघाडीचे सैनिक नाही, शिवसेनेचे सैनिक ; गीते यांची स्पष्टोक्तीमहाआघाडी फक्त सत्तेसाठीच, वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या

असगोली/रत्नागिरी : राज्यात असलेल्या तीन पक्षांच्या आघाडी सरकारमुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मात्र, हे सरकार केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहे, असे स्पष्ट करून आपण शिवसैनिक आहोत, आघाडी सैनिक नाही आहोत, असे विधान माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार अनंत गीते यांनी केले. शिवसेना नेते अनंत गीते यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी मार्गदर्शन करताना गीते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर, जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत, उपतालुकाप्रमुख बाबू सावंत, चिपळूण तालुकाप्रमुख संदीप सावंत, पंचायत समिती सदस्या पूर्वी निमुणकर, रवींद्र आंबेकर, शृंगारतळी शहरप्रमुख नरेश पवार, नारायण गुरव, पाटपन्हाळे सरपंच संजय पवार व प्रमुख पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.भाषणाच्या सुरुवातीला अनंत गीते यांनी कोरोना काळातील प्रसंगांचा उल्लेख करून याची भयानकता व घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, राज्यातील तीन पक्षांचे आघाडी सरकार असल्यामुळे आपण नेमके कुणाशी लढायचे, असा प्रश्न सर्वांसमोरच आहे. या कारणाने शिवसैनिकांमध्ये काहीशी संभ्रमावस्था आहे. ती दूर करण्यासाठी मी आलो आहे.

हे सरकार केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहे. मात्र, आपण शिवसैनिकच आहोत, आघाडी सैनिक नाही असे स्पष्ट करून, पुढील कोणत्याही निवडणुकांत स्वबळावर आपण ताकद दाखविणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोठेही आघाडी झालेली मला पाहायला मिळालेली नाही. तसे मी स्वबळावर लढावे असे आदेशही दिले होते. त्यामुळेच राज्यात ३,३०० इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतल्या असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.ते म्हणाले की, शिवसेनेचा जो शाखाप्रमुख माझ्याकडे येईल आणि मला बोलेल की, हा मेळावा माझ्या गावी घ्या, त्याचवेळी मी त्याच्या गावामध्ये मेळावे घेईन. कुणावरही मेळाव्याची जबरदस्ती करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक तालुक्यामध्ये मी असे मेळावे घेऊन प्रमुख कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी संभ्रमावस्था आहे, ती दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी त्यांनी आमदार भास्कर जाधव यांनी आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवाचे कौतुक करून, असे महोत्सव शिवसेनेच्या माध्यमातून सर्वत्र होण्यासाठी आपण प्रयत्न करूया, असे सांगितले.म्हणून ते आले नाहीतअनंत गीते यांनी या मेळाव्यात आघाडी सरकारमधील कोणत्याही नेत्यावर भाष्य केले नाही. मात्र, आज अनेक नेत्यांचे दौरे या तालुक्यात होणार होते. मी येणार हे समजल्यावर ते आलेले नसावेत, असा चिमटा त्यांनी यावेळी काढला.

टॅग्स :Anant Geeteअनंत गीतेRatnagiriरत्नागिरीShiv Senaशिवसेना