शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

हॉ टे ल्स

By admin | Updated: July 6, 2014 23:55 IST

पर्यटनकेंद्रीत संकल्प हवा...

रत्नागिरी : हॉटेल व्यवसायात वृध्दी आणायची असेल तर पर्यटन व्यवसाय वाढला पाहिजे. त्यासाठी अर्थसंकल्पात पर्यटनवाढीसाठी विशेष प्रयत्न दिसणे गरजेचे आहे. त्याचबरोबर हॉटेलसाठी विविध ‘संकल्प’ असणे गरजेचे असल्याचे मत जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे.आगामी अर्थसंकल्पाविषयी हॉटेल व्यावसायिकांच्या मनाचा कानोसा घेतला असता अनेकांनी पर्यटन वृध्दीवरच बोलणे पसंत केले. हॉटेल व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यासाठी पर्यटनाचा हातभार लागणे महत्त्वाचे आहे. या व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर परजिल्ह्यातील लोकं रत्नागिरीकडे वळतील आणि त्याचा फायदा हॉटेल व्यावसायिकांना मिळू शकेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. हॉटेल व्यावसायिकांसाठी जाचक कर आकारण्यात येत आहे. तो कमी होणे गरजेचे आहे. हा सेवाकर कमी झाल्यास सेवा देताना ग्राहकांना त्या अत्यल्प दरात देणे सोयीस्कर होईल, असे हॉटेल व्यावसायिकांना वाटते.केरळ, गोव्यासारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढले आहे. त्यामुळे तेथे हॉटेल व्यवसाय बहरलेला दिसून येतो. रत्नागिरीकडेही पर्यटन वाढत आहे. मात्र, ते म्हणावे तेवढ्या प्रमाणात वाढलेले नाही, त्यावर अर्थसंकल्पात भर दिला गेल्यास रत्नागिरी जिल्ह्यातही हॉटेल व्यवसायाला चांगले दिवस येतील, अशी आशा या व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सीआरझेडच्या कायद्यामुळे सागरकिनारी हॉटेल व्यवसाय उभारण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे कोकणला बीच लाभूनही त्याचा वापर करता येत नाही, त्यावरही उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.