शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

हॉ टे ल्स

By admin | Updated: July 6, 2014 23:55 IST

पर्यटनकेंद्रीत संकल्प हवा...

रत्नागिरी : हॉटेल व्यवसायात वृध्दी आणायची असेल तर पर्यटन व्यवसाय वाढला पाहिजे. त्यासाठी अर्थसंकल्पात पर्यटनवाढीसाठी विशेष प्रयत्न दिसणे गरजेचे आहे. त्याचबरोबर हॉटेलसाठी विविध ‘संकल्प’ असणे गरजेचे असल्याचे मत जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे.आगामी अर्थसंकल्पाविषयी हॉटेल व्यावसायिकांच्या मनाचा कानोसा घेतला असता अनेकांनी पर्यटन वृध्दीवरच बोलणे पसंत केले. हॉटेल व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यासाठी पर्यटनाचा हातभार लागणे महत्त्वाचे आहे. या व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर परजिल्ह्यातील लोकं रत्नागिरीकडे वळतील आणि त्याचा फायदा हॉटेल व्यावसायिकांना मिळू शकेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. हॉटेल व्यावसायिकांसाठी जाचक कर आकारण्यात येत आहे. तो कमी होणे गरजेचे आहे. हा सेवाकर कमी झाल्यास सेवा देताना ग्राहकांना त्या अत्यल्प दरात देणे सोयीस्कर होईल, असे हॉटेल व्यावसायिकांना वाटते.केरळ, गोव्यासारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढले आहे. त्यामुळे तेथे हॉटेल व्यवसाय बहरलेला दिसून येतो. रत्नागिरीकडेही पर्यटन वाढत आहे. मात्र, ते म्हणावे तेवढ्या प्रमाणात वाढलेले नाही, त्यावर अर्थसंकल्पात भर दिला गेल्यास रत्नागिरी जिल्ह्यातही हॉटेल व्यवसायाला चांगले दिवस येतील, अशी आशा या व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सीआरझेडच्या कायद्यामुळे सागरकिनारी हॉटेल व्यवसाय उभारण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे कोकणला बीच लाभूनही त्याचा वापर करता येत नाही, त्यावरही उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.