शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

येरडव जलस्वराज्य योजनेचे वाजले तीनतेरा

By admin | Updated: September 16, 2014 23:22 IST

ग्रामस्थ तहानलेलेच : अद्याप पाणी नसल्याने घसा कोरडा

पाचल : राजापूर तालुक्यातील येरडव गावच्या जलस्वराज्य प्रकल्पाचे तीनतेरा वाजले आहेत. गेल्या ७ ते ८ वर्षांपासून हा जलस्वराज्य प्रकल्प कागदोपत्री पूर्ण आहे. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. तालुक्यातील प्रथम प्रकल्प म्हणून याची नोंद आहे. यावर शासनाने १८ लाख खर्च करुन आपले धोरण बजावले असतानासुद्धा येथील ग्रामस्थांनी १० टक्के लोकवाटा वर्गणी काढली. तरीही पाणी का नाही? असा ग्रामस्थ सवाल करत असताना जलस्वराज्यच्या समितीने आपल्या अनुषंगाने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे पाणी आपल्याला आता मिळणार नाही, याची खात्री या ग्रामस्थांना पटली आहे. अनेकवेळा या विषयांवर चर्चा होऊनही परिस्थिती जैसे थे आहे.येरडव - मुंबई मंडळाने दिलेल्या सहकार्याची न मिळालेली पोचपावती, समितीतल्या सदस्यांचा गैरसमज, ठेकेदाराने केलेल्या कामाचे मुल्यांकन न केल्यामुळे, गंजलेले पाईप, बंद पडलेला विद्युत पंप, महावितरण कंपनीने कापलेली वीजजोडणी यामुळे हा प्रकल्पाचे पाणी ग्रामस्थांना उपलब्ध होत नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले. यावर बऱ्याचवेळा तोडगा काढण्यात आला. पण अंमलबजावणी कोण करतोय? शासनाचा १८ लाख रुपयांचा निधी खर्च होऊन त्यावर ग्रामस्थांनी दिलेल्या १० टक्के वर्गणीनेही पाणी मिळत नसेल तर या जलस्वराज्य समितीचा आम्हाला काय उपयोग? असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. याविषयी सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात काही योजनांबाबत अनेकवेळा चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली मात्र या मागणीकडे लक्ष देण्यात आले नाही. येरडव येथील योजनेच्या कामात अनेक व्यवहार संशयास्पद स्थितीत असून जलस्वराज्य योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा हा हेतू डोळ््यासमोर ठेवून ही योजना पूर्ण व्हावी अशी मागणी केली होती. मात्र या योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. (वार्ताहर)