शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

गणवेशासाठी यंदा होणार सत्वपरीक्षा

By admin | Updated: May 11, 2015 00:58 IST

सर्वशिक्षा अभियान : अनुदान मंजूर नसल्यामुळे उभा ठाकला प्रश्न

रत्नागिरी : सर्वशिक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश योजना राबवण्यात येते. मात्र, यावर्षी अद्याप संपूर्ण निधी मंजूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश कसे द्यायचे, हा प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे गणवेश वितरण प्रक्रिया लांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शासनाकडून इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थिनी तसेच एससी व एन. टी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वर्षाला दोन गणवेश देण्यात येतात. जिल्ह्यातील लाभार्थींची संख्या ७६ कोटी ४३८ इतकी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला ४०० रूपये याप्रमाणे शासनाकडून ३ कोटी १५ लाखांच्या निधीची प्रतीक्षा आहे. गतवर्षी शासनाकडून जिल्हा परिषदेकडे तीन टप्प्यात निधी प्राप्त झाला होता. जिल्हा परिषदेकडे आलेला निधी संबंधित शाळांकडे वर्ग केला जातो. शालेय व्यवस्थापन समितीतर्फे गणवेश शिवून घेण्यात येतात. मात्र, यावर्षी अद्याप निधी मंजूर न झाल्यामुळे गणवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वितरणाची दरवर्षी घोषणा करण्यात येते. मात्र, शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे दरवर्षीच ती बारगळते. गतवर्षी शासनाने तीन टप्यात निधी दिल्यामुळे जिल्हास्तरावर शिल्लक असलेल्या अनुदानातून लाभार्थी विद्यार्थ्याला किमान एक गणवेश मिळावा, अशी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, यावर्षी शिल्लक अनुदानातून गणवेश देण्यात यावेत, याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. केंद्राकडून वार्षिक आराखडा मान्यता नसल्यामुळे हा निधी बारगळला असल्याचे दिसून येते. यावर्षीसुध्दा ‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे गणवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार हे निश्चित आहे. कारण शालेय व्यवस्थापन समिती गणवेशासाठी ठेका देऊन प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मापाप्रमाणे शिवून घेते. अनेक शाळा तयार गणवेश खरेदी करणे उचित समजतात. मात्र, एकाच वेळी जिल्ह्यातील सर्व शाळांची मागणी असल्याने संबंधित ठेकेदारांकडून वेळेवर पूर्तता केली जात नाही. किमान महिना, दीड महिना लागतो. शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शालेय निधी खर्च करण्यात येत असताना त्यामध्ये दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. एकूणच वार्षिक परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या कळून येते. त्याप्रमाणे गणवेश निधी मंजूर करून वर्ग करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन गणवेशाचा लाभ मिळू शकेल. (प्रतिनिधी)