शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

गणवेशासाठी यंदा होणार सत्वपरीक्षा

By admin | Updated: May 11, 2015 00:58 IST

सर्वशिक्षा अभियान : अनुदान मंजूर नसल्यामुळे उभा ठाकला प्रश्न

रत्नागिरी : सर्वशिक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश योजना राबवण्यात येते. मात्र, यावर्षी अद्याप संपूर्ण निधी मंजूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश कसे द्यायचे, हा प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे गणवेश वितरण प्रक्रिया लांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शासनाकडून इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थिनी तसेच एससी व एन. टी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वर्षाला दोन गणवेश देण्यात येतात. जिल्ह्यातील लाभार्थींची संख्या ७६ कोटी ४३८ इतकी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला ४०० रूपये याप्रमाणे शासनाकडून ३ कोटी १५ लाखांच्या निधीची प्रतीक्षा आहे. गतवर्षी शासनाकडून जिल्हा परिषदेकडे तीन टप्प्यात निधी प्राप्त झाला होता. जिल्हा परिषदेकडे आलेला निधी संबंधित शाळांकडे वर्ग केला जातो. शालेय व्यवस्थापन समितीतर्फे गणवेश शिवून घेण्यात येतात. मात्र, यावर्षी अद्याप निधी मंजूर न झाल्यामुळे गणवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वितरणाची दरवर्षी घोषणा करण्यात येते. मात्र, शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे दरवर्षीच ती बारगळते. गतवर्षी शासनाने तीन टप्यात निधी दिल्यामुळे जिल्हास्तरावर शिल्लक असलेल्या अनुदानातून लाभार्थी विद्यार्थ्याला किमान एक गणवेश मिळावा, अशी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, यावर्षी शिल्लक अनुदानातून गणवेश देण्यात यावेत, याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. केंद्राकडून वार्षिक आराखडा मान्यता नसल्यामुळे हा निधी बारगळला असल्याचे दिसून येते. यावर्षीसुध्दा ‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे गणवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार हे निश्चित आहे. कारण शालेय व्यवस्थापन समिती गणवेशासाठी ठेका देऊन प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मापाप्रमाणे शिवून घेते. अनेक शाळा तयार गणवेश खरेदी करणे उचित समजतात. मात्र, एकाच वेळी जिल्ह्यातील सर्व शाळांची मागणी असल्याने संबंधित ठेकेदारांकडून वेळेवर पूर्तता केली जात नाही. किमान महिना, दीड महिना लागतो. शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शालेय निधी खर्च करण्यात येत असताना त्यामध्ये दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. एकूणच वार्षिक परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या कळून येते. त्याप्रमाणे गणवेश निधी मंजूर करून वर्ग करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन गणवेशाचा लाभ मिळू शकेल. (प्रतिनिधी)