शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

तिवरेवासीयांचा यावर्षीचा पावसाळाही कंटेनरमध्येच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:14 IST

संदीप बांद्रे चिपळूण : तिवरे धरण फुटीत उद्ध्वस्त झालेल्या ५४ कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी पेढांबे ...

संदीप बांद्रे

चिपळूण : तिवरे धरण फुटीत उद्ध्वस्त झालेल्या ५४ कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी पेढांबे येथे २४ घरांची उभारणी करण्यात आली असून, या घरांचे ७० टक्के काम पूर्णत्वास गेले आहे. अजूनही या कामासाठी सप्टेंबरपर्यंत मुदत असल्याने तोपर्यंत काम पूर्ण न झाल्यास तूर्तास संबंधित कुटुंबीयांना यावर्षीचा पावसाळा कंटेनरमध्येच काढावा लागणार आहे.

तालुक्यातील तिवरे धरण २ जुलै २०१९ रोजी झालेल्या अतिवृष्टीत फुटले. या दुर्घटनेत तब्बल २३ जणांचा बळी गेला. तसेच ५४ कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. या दुर्घटनेत भेंदवाडीतील २२ घरे, जनावरांचे गोठे पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले. बाधितांचे तत्काळ तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी कंटेनर केबिनचा पर्याय निवडण्यात आला. या कंटेनरमध्ये आजही १५ कुटुंंबे राहत आहेत. त्यांना कायमस्वरूपी घरासाठी अलोरे येथे कोयना प्रकल्प वसाहतीत २४ घरे बांधण्याचे काम सुरू आहे.

दोन ठेकेदारांच्या माध्यमातून प्रत्येकी १२ घरे उभारण्यात येत आहेत. त्यासाठी सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे पहिल्या टप्प्यात पाच कोटींचा निधी प्राप्त झाला आहे, तर अजून सहा कोटी रुपये या संस्थेकडून प्रकल्पासाठी मंजूर केले आहेत. सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी या ‘सिद्धिविनायक नगरी’ पुनर्वसनासाठी मंजूर केला आहे. अजूनही पेढांबे येथे १६ कुटुंबीयांचे पुनर्वसन बाकी आहे. त्यासाठी दुसऱ्या टप्प्यात निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. याशिवाय तिवरे गावी उर्वरित १४ कुटुंबीयांचे पुनर्वसन होणार आहे. मात्र, अजूनही या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे या कुटुंबीयांनाही यावर्षीचा पावसाळा कंटेनरमध्येच काढावा लागणार आहे.

...................................

कंटेनरमधील जगणे झाले नकोसे

तिवरे धरण फुटीच्या घटनेनंतर तत्काळ कंटेनरची व्यवस्था करून तात्पुरते पुनर्वसन केले आहे. त्यानंतर आजतागायत येथील कुटुंबीय कंटेनरमध्येच राहत आहेत. वाढत्या उन्हामुळे या कंटेनरमधील जीवन नकोसे झाले आहे. तापलेल्या कंटेनरमध्ये गर्मी होत असल्याने हे कुटुंबीय हैराण झाले आहेत.

..............................

पुनर्वसन कुटुंबीयांनी भरले वीज बिल

गेले काही महिने वीज बिल शासनाने भरलेलेच नाही. त्यामुळे वीज बिल स्वरूपात ६९ हजार रुपये थकीत होते. महावितरणने वीज पुरवठा खंडित केला होता. ऐन उन्हाळ्याच्या कडाक्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने बाधित कुटुंब हैराण झाली होती. मात्र, आता त्यापैकी १० हजार रुपयांचे वीज बिल संबंधित कुटुंबीयांनी भरल्याने तूर्तास वीज पुरवठा पूर्ववत सुरू केला आहे.

.................................

धरणाच्या पुनर्बांधणीकडे दुर्लक्ष

तिवरे धरण फुटी प्रकरणी दोनवेळा चौकशी अहवाल तयार करण्यात आला असला तरी तो अद्याप उघड करण्यात आलेला नाही. त्यानंतर धरणाच्या परिसरातील माती, पाणी व कातळाची तपासणीही करण्यात आली. मात्र, अजूनही पुनर्बांधणीबाबत कोणत्याही हालचाली सुरू नाहीत. परिणामी पूर्व विभागातील पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या आहेत.

........................

तिवरे धरण फुटीच्या घटनेनंतर २१ महिन्यांचा कालावधी वाया गेला. मात्र, आता पेढांबे येथे सुरू असलेले पुनर्वसनाचे काम समाधानकारकपणे सुरू आहे. आतापर्यंत २४ घरांचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. अजूनही उर्वरित घरांचा प्रश्न कायम असून, तातडीने निविदा प्रक्रिया शासनाने राबविणे आवश्यक आहे.

- तानाजी चव्हाण, तिवरे

........................

तिवरे धरण फुटीतील ५४ कुटुंबीयांपैकी १४ कुटुंबांचे पुनर्वसन तिवरे येथेच केले जाणार आहे. अजूनही त्या कुटुंबीयांसाठी जागेचा शोध घेतला जात आहे. त्यावर वेळीच निर्णय घेऊन गावातील पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा. त्याचबरोबर धरणाच्या पुनर्बांधणीसाठी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. त्यावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना अडचणी आल्या आहेत.

- तुकाराम कानावजे, ग्रामस्थ, तिवरे.

.................................

अजूनही सप्टेंबरपर्यंत पेढांबे येथील कामाची मुदत आहे. २४ घरांचे स्लॅब व प्लास्टरचे काम पूर्ण झाले असले तरी अजूनही अंतर्गत काम शिल्लक आहे. कोणतीही गडबड न करता सावकाश काम केले जात आहे. त्यामुळे या कामासाठी वेळ जाणार आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत कामाची मुदत संपण्यापूर्वीच संबंधीत कुटुंबीयांच्या ताब्यात घरं देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- दशरथ दाभोळकर, ठेकेदार, खेर्डी, चिपळूण

फोटो- तिवरेतील दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचे पेढांबे येथे सुरू असलेले काम अंतिम टप्प्यात आले आहे.

सिंगल फोटो -

१) तानाजी चव्हाण २) तुकाराम कानावजे ३) ठेकेदार दशरथ दाभोळकर