शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

पाण्यामुळे उघड्या माळरानावर संसार

By admin | Updated: March 28, 2016 00:18 IST

कोंडमळा-धनगरवाडी : वीजबिल न भरल्याने योजना बंद; बोअरवेलला पाणीच नाही

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील सावर्डे - कोंडमळा - धनगरवाडी येथील पाणी प्रश्न सध्या गंभीर बनला आहे. यापूर्वी तेथील वाडीला अनारी-अडरे येथे राबवण्यात आलेल्या नळपाणी योजनेतून धनगरवाडा तसेच कोंडमळा गावाला पाणी पुरवले जात होते. पण, त्या योजनेच्या विजेचे बिल न भरल्याने ती योजना बंद झाली. त्यानंतर तेथील धनगरवाडीतील ग्रामस्थांनी पैसे काढून ठिकठिकाणी बोअरवेल खोदली आहे. पण, त्याला पाणीच नसल्याने त्या कोरड्याच राहिल्या आहेत. सध्या येथील कुटुंबाना पाण्याअभावी मोकळ्या माळरानावर संसार थाटावा लागत आहे.जिल्ह्यात पाण्याचे संकट जाणवू लागले आहे. उन्हाच्या कडाक्याबरोबर पाण्याचा दाह अधिक अधिक आहे. पाण्यासाठी ग्रामीण भागात मैलोन्मैलचा प्रवास करावा लागत आहे. दरवर्षी उन्हाळा आला की, कोंडमळा - धनगरवाडीतील ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळून जाते. याठिकाणी पन्नास घरांची वस्ती असून, सध्या तिथे पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. सध्या चिपळुणातून पाण्याचा टँकर विकत आणावा लागतो. एका टँकरला ३ हजार रुपये खर्च करावा लागतो. याठिकाणी सर्व राजकीय पक्षांचे नेते येऊन गेले, त्यांच्या आश्वासनाशिवाय दुसरे काहीच मिळाले नाही. आता आम्ही सध्या लहान मुलांच्या आंघोळीसाठी वापरलेले पाणी साठवून ते परत वापरात आणले जाते. आम्ही आमच्या पाण्याच्या प्रश्नासाठी अनेक वेळा तहसील कार्यालयात फेऱ्या मारल्या. परंतु तिथे आमची कुणीही दखल घेत नाही. आमच्याच बाबतीत असे का? असा सवाल येथील ग्रामस्थांनी केला आहे.हा समाज अनेक भागात दुसऱ्याची शेती करून आपला उदारनिर्वाह करीत असतो. दुग्ध व्यवसायावर या समाजाची अर्थव्यवस्था चालते. तूटपुंज्या मिळकतीवर घर चालवत असताना आपले राहाते घर सोडून पाण्याच्या शोधात जाण्याची वेळ येत आहे. दरवर्षी या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहायला मिळत आहे. पण, प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने धनगरवाड्यांमधील ग्रामस्थांना हलाखीतच आपले जीवन व्यथित करावे लागत आहे. (वार्ताहर)शिक्षणाचे पैसे पाण्याला : आजही मोलमजुरीमुलांच्या भविष्यासाठी व शिक्षणासाठी साठवून ठेवलेले पैसे पाण्यासाठी खर्च करावे लागत आहे. आता त्यांची मुले शिक्षणासाठी शाळेत जातात तर तिथे त्यांच्या फीचा प्रश्न निर्माण होत आहे. मोलमजुरी करून आणलेला पैसा मुलांच्या शिक्षणासाठी ठेवण्यात येत आहे. पण, हाच प्रश्न आता पाण्यासाठी खर्च करण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी पैसा आणायचा कुठून? असा प्रश्न आता उभा राहिला आहे.घर सोडून माळरानावर थाटला संसारआभाळाच्या छताखाली ऊन, वाऱ्याचे पांघरून घेत कोंडमळा सावर्डेच्या उघड्या माळरानावर संसार थाटून धनगर बांधव आपले जीवन व्यथित करीत आहेत. यंदाही वस्तीला आपले घर सोडण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती अडरे, अनारी, टेरव, सावर्डे, कोंडमळा येथील वस्त्यांमध्ये आहे.