शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

कल्याणाच्या योजनांपासून कामगार दूरच

By admin | Updated: July 18, 2014 23:13 IST

सर्वांसाठी लाभ : केवळ उच्चभ्रूसाठी योजना नको...

संजय सुर्वे - शिरगाव महाराष्ट्र शासनाने राज्यातील विभागनिहाय कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याची घोषणा नुकतीच केली. मात्र, साठ वर्षांपूर्वीपासून कार्यरत असलेल्या कामगार कल्याण मंडळाच्या कार्यक्षमतेकडे व कार्यपद्धतीमधील त्रुटींकडे दुर्लक्ष केले आहे. अनेक योजना मोठ्या कंपनीतील कामगारांनाच लाभाच्या आहेत. कामगार कल्याण हा शब्दच तळागाळातील अनेक कामगारांना आजही ऐकून माहीत असल्याचे चित्र आहे. मंडळाकडून केवळ विविध कंपन्यांना माहीत व्हावे म्हणून कल्याण निधी भरण्याबाबत जाहिरात दिली जाते. तथापि कल्याण निधी न भरल्यास संबंधित कंपनीवर कोणतीच कारवाई होत नाही. अत्यल्प प्रमाणात असलेले कामगार कल्याण निरीक्षकांनाच कंपन्यांचे दफ्तर तपासण्याचे अधिकार आहेत. मात्र, छोट्या कंपन्यापर्यंत ते पोचतच नाहीत. पर्यायाने मालक व कामगारांनी वार्षिक दोनदा भरायची वर्गणी भरली नसेल तर शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक, असाध्य रोग सहाय्य यातील काहीच त्याला मिळत नाही. २५ हजारांपेक्षा जास्त वेतन घेणारे कामगार कायम याचा लाभ उठवतात. मात्र, कंत्राटी कामगार अत्यल्प वेतन घेत असताना त्याचे कुटुंबीय या लाभापासून वंचित राहत आहेत हे वास्तव आहे. या महिन्यात शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल करताना आपला मालक हा निधी भरत नसल्याचे कामगारांना समजले. पण, ज्या निमशासकीय मंडळांनी त्यांना कंत्राट दिले. त्यांनीही याबाबत अनास्था दाखवल्याची दुसरी बाजू पुढे आली आहे. आपल्या रोजगारावर गदा येईल म्हणून सगळेच गप्प राहतात. महाराष्ट्र कामगार मंडळाकडून सर्वाधिक कामगार संख्या अथवा औद्योगिक क्षेत्राचा सर्व्हे करुन कामगार कल्याण केंद्र सुरु करण्याची अपेक्षा कायम असते. पण, शासन दुर्लक्ष करते. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी पोफळी येथे ३५० कामगार कर्मचारी असताना स्वतंत्र कामगार कल्याण केंद्र सुरु आहे. तेथे कंत्राटी कामगारांचे कल्याण निधीकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे सभासद वाढत नाहीत. याउलट गाणे - खडपोली औद्योगिक वसाहतीत जे. के. फाईल्स, जे. के. तालाबोट, साफ ईस्ट, कृष्णा अ‍ॅण्टी आॅक्सिडंट, निप्रो ट्यूब ग्लासमधील कायम कामगार कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे १ हजार आहे, तर कंत्राटी कामगार सातशेहून अधिक आहेत. तथापि या क्षेत्रात कामगार कल्याण केंद्र सुरु करण्याची हालचाल नाही. साहजिकच मंडळाच्या सगळ्या योजना उच्चभ्रू वस्तीतच अडकल्या आहेत. कामगार मंत्री असताना हुसेन दलवाई यांनी चिपळूण येथे गट कार्यालय व केंद्र सुरु केले. आता कोकणातील चिपळूणचेच कामगार मंत्री भास्कर जाधव आहेत. त्यांनी प्रत्यक्ष मंडळाच्या योजनांची अंमलबजावणी होण्यास दबाव आणला आणि कल्याण निधीबाबतच्या कार्य पद्धतीत सुधारणा केल्यास अनेक गरजू कामगारांना लाभ होईल, अशी चर्चा कामगार वर्तुळात आहे.